शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पैसे भरूनही टँकर येत नाही; हजारो महिलांचे टँकरकडे दिवसरात्र डोळे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 15:22 IST

फोन केला तर टँकर पाठविल्याचे सांगितले जाते; पण टँकर काही येत नाही.

ठळक मुद्देवीजपुरवठा बंद असल्याने टँकरमध्ये पाणी भरणा बंद पडला होता.अनेक भागातील पाणीपुरवठा ठप्प झाल्याने विविध भागांतील नागरिक जलकुंभावर

औरंगाबाद : ‘दिवसा तर वाट पाहतोच परंतु रात्री ११ वाजेपर्यंत रांगा लावून टँकरची वाट पाहत बसतो. मात्र, फेरीचा दिवस असूनही पाण्याचे टँकर येत नाही. फोन केला तर टँकर पाठविल्याचे सांगितले जाते; पण टँकर काही येत नाही. नागरिकांचे पाणी व्यावसायिकांना विकण्याचा सर्रास उद्योग सुरू आहे, असा आरोप करीत सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारीही (दि.३०) विविध भागातील नागरिकांनी सिडको, एन-५ येथील जलकुंभावर संताप व्यक्त केला. 

जलवाहिनी नसलेल्या भागांमध्ये महानगरपालिका टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करते. त्यासाठी नागरिकांकडून दर तीन महिन्यांनी पैसे भरले जातात; परंतु पैसे भरूनदेखील सहा-सहा दिवस टँकर फिरकत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या सहा दिवसांपासून टँकर आलेला नसल्याने मंगळवारी सकाळी ११ वाजता हनुमाननगर येथील महिलांनी एन-५ येथील जलकुंभ गाठले. याठिकाणी महापालिकेचा एकही कर्मचारी हजर नसल्याचे पाहून महिलांनी एकच संताप व्यक्त केला. अशा परिस्थितीत टँकरला डिझेलपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला, टँकरचालकाला महिलांनी घेराव घालत जाब विचारला. मात्र, त्यांनी आपली कशीबशी सुटका करून घेतली. यापाठोपाठ विश्रांतीनगर येथील नागरिकही याठिकाणी दाखल झाले.

या भागात चार दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नव्हता. त्यानंतर भारतनगर, राजनगर, शिवनेरी कॉलनी, गजानननगर, चिकलठाणा भागातील नागरिकांनीही संताप व्यक्त करीत याठिकाणी धाव घेतली. टँकर कधी पाठविता, अशी विचारणा नागरिकांकडून होत होती; परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी मनपाचे कोणीही अधिकारी हजर नव्हते. येथील शिपायाने वीजपुरवठा बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर महिला संताप व्यक्त करीत माघारी फिरल्या. पाणी मात्र मिळालेच नाही. 

टँकरच्या रांगा, टँकरचालकांना विचारणावीजपुरवठा बंद असल्याने टँकरमध्ये पाणी भरणा बंद पडला होता. परिणामी, टँकरच्या रांगा लागलेल्या होत्या. विविध भागांतून येणारे नागरिक टँकरचालकांना विचारणा करीत होते; परंतु टँकरचालक नागरिकांच्या घोळक्यातून सुटका करून घेत होते.

टँकरचालकांचे थंब घ्यावेज्या वसाहतींसाठी टँकर निघते, त्या भागात टँकर पोहोचत नाही. ते मध्येच कुठेतरी रिकामे होते. त्यामुळे एखाद्या वसाहतीसाठी टँकर रवाना होण्यापूर्वी टँकरचालकांचे हाताचे थंब घ्यावे, म्हणजे टँकर त्याच भागात पोहोचेल आणि मध्येच कुठे गायब होणार नाही, असे नागरिकांनी म्हटले. 

पाच दिवस लोटलेपैसे भरूनही पाण्याचे टँकर येत नाही. पाच दिवस उलटले तरीही टँकर आलेले नाही. रांगा लावून वाट पाहण्याची वेळ येत आहे. नागरिकांना पाठविण्यात येणारे टँकर कोणाला तरी विकले जात असल्याची शंका वाटते. भरण्यात येणाऱ्या पैशांच्या तुलनेत किमान १५ ड्रम पाणी मिळाले पाहिजे; परंतु ११ ते १२ ड्रमच पाणी मिळते.- बेबी खंडारे, हनुमाननगर

पाण्याविना दिवससहा-सहा दिवस टँकर येत नाही. आता आज वीजपुरवठा बंद असल्याने एकही टँकर भरणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आजचा दिवसही पाण्याविना गेला. किमान उद्या तरी टँकर येतील, अशी अपेक्षा आहे.    - सी.एस. शिंदे, गजानननगर 

या भागातील नागरिक आले जलकुंभावर :भारतनगरहनुमाननगरविश्रांतीनगरराजनगरशिवनेरी कॉलनीजयभवानीनगरचिकलठाणा

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईcidco aurangabadसिडको औरंगाबाद