शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

पैसे भरूनही टँकर येत नाही; हजारो महिलांचे टँकरकडे दिवसरात्र डोळे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 15:22 IST

फोन केला तर टँकर पाठविल्याचे सांगितले जाते; पण टँकर काही येत नाही.

ठळक मुद्देवीजपुरवठा बंद असल्याने टँकरमध्ये पाणी भरणा बंद पडला होता.अनेक भागातील पाणीपुरवठा ठप्प झाल्याने विविध भागांतील नागरिक जलकुंभावर

औरंगाबाद : ‘दिवसा तर वाट पाहतोच परंतु रात्री ११ वाजेपर्यंत रांगा लावून टँकरची वाट पाहत बसतो. मात्र, फेरीचा दिवस असूनही पाण्याचे टँकर येत नाही. फोन केला तर टँकर पाठविल्याचे सांगितले जाते; पण टँकर काही येत नाही. नागरिकांचे पाणी व्यावसायिकांना विकण्याचा सर्रास उद्योग सुरू आहे, असा आरोप करीत सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारीही (दि.३०) विविध भागातील नागरिकांनी सिडको, एन-५ येथील जलकुंभावर संताप व्यक्त केला. 

जलवाहिनी नसलेल्या भागांमध्ये महानगरपालिका टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करते. त्यासाठी नागरिकांकडून दर तीन महिन्यांनी पैसे भरले जातात; परंतु पैसे भरूनदेखील सहा-सहा दिवस टँकर फिरकत नसल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या सहा दिवसांपासून टँकर आलेला नसल्याने मंगळवारी सकाळी ११ वाजता हनुमाननगर येथील महिलांनी एन-५ येथील जलकुंभ गाठले. याठिकाणी महापालिकेचा एकही कर्मचारी हजर नसल्याचे पाहून महिलांनी एकच संताप व्यक्त केला. अशा परिस्थितीत टँकरला डिझेलपुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याला, टँकरचालकाला महिलांनी घेराव घालत जाब विचारला. मात्र, त्यांनी आपली कशीबशी सुटका करून घेतली. यापाठोपाठ विश्रांतीनगर येथील नागरिकही याठिकाणी दाखल झाले.

या भागात चार दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नव्हता. त्यानंतर भारतनगर, राजनगर, शिवनेरी कॉलनी, गजानननगर, चिकलठाणा भागातील नागरिकांनीही संताप व्यक्त करीत याठिकाणी धाव घेतली. टँकर कधी पाठविता, अशी विचारणा नागरिकांकडून होत होती; परंतु त्यांना उत्तर देण्यासाठी मनपाचे कोणीही अधिकारी हजर नव्हते. येथील शिपायाने वीजपुरवठा बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर महिला संताप व्यक्त करीत माघारी फिरल्या. पाणी मात्र मिळालेच नाही. 

टँकरच्या रांगा, टँकरचालकांना विचारणावीजपुरवठा बंद असल्याने टँकरमध्ये पाणी भरणा बंद पडला होता. परिणामी, टँकरच्या रांगा लागलेल्या होत्या. विविध भागांतून येणारे नागरिक टँकरचालकांना विचारणा करीत होते; परंतु टँकरचालक नागरिकांच्या घोळक्यातून सुटका करून घेत होते.

टँकरचालकांचे थंब घ्यावेज्या वसाहतींसाठी टँकर निघते, त्या भागात टँकर पोहोचत नाही. ते मध्येच कुठेतरी रिकामे होते. त्यामुळे एखाद्या वसाहतीसाठी टँकर रवाना होण्यापूर्वी टँकरचालकांचे हाताचे थंब घ्यावे, म्हणजे टँकर त्याच भागात पोहोचेल आणि मध्येच कुठे गायब होणार नाही, असे नागरिकांनी म्हटले. 

पाच दिवस लोटलेपैसे भरूनही पाण्याचे टँकर येत नाही. पाच दिवस उलटले तरीही टँकर आलेले नाही. रांगा लावून वाट पाहण्याची वेळ येत आहे. नागरिकांना पाठविण्यात येणारे टँकर कोणाला तरी विकले जात असल्याची शंका वाटते. भरण्यात येणाऱ्या पैशांच्या तुलनेत किमान १५ ड्रम पाणी मिळाले पाहिजे; परंतु ११ ते १२ ड्रमच पाणी मिळते.- बेबी खंडारे, हनुमाननगर

पाण्याविना दिवससहा-सहा दिवस टँकर येत नाही. आता आज वीजपुरवठा बंद असल्याने एकही टँकर भरणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आजचा दिवसही पाण्याविना गेला. किमान उद्या तरी टँकर येतील, अशी अपेक्षा आहे.    - सी.एस. शिंदे, गजानननगर 

या भागातील नागरिक आले जलकुंभावर :भारतनगरहनुमाननगरविश्रांतीनगरराजनगरशिवनेरी कॉलनीजयभवानीनगरचिकलठाणा

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater scarcityपाणी टंचाईcidco aurangabadसिडको औरंगाबाद