शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

‘पाणी नाही, किमान वीज तरी द्या!’; शहरात रोजच होतेय दिवसा अन् रात्री बेरात्री वीज ‘गुल’

By संतोष हिरेमठ | Updated: May 24, 2023 18:39 IST

ऐन उन्हाळ्यात हा प्रकार होत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ ओढावते आहे.

छत्रपती संभाजीनगर : जगाच्या नकाशावर औद्योगिकनगरी, पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरात नागरिकांना आठवड्यातून जेमतेम तासभर पाणी मिळते, पण या शहरात अखंडित वीजपुरवठाही होत नसल्याची चिंताजनक परिस्थिती आहे. शहरात कधीही अचानक वीजपुरवठा खंडित होतो. त्यातही गेल्या पाच दिवसांपासून रोज दिवसा व रात्रीही वीज ‘गुल’ होत आहे. महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरात १८ मेपासून दररोज रात्री वीज गुल होते आहे. ऐन उन्हाळ्यात हा प्रकार होत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ ओढावते आहे. मुंबई, पुण्यात वीज जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही, उन्हाळा असो की पावसाळा छत्रपती संभाजीनगरातच वारंवार वीज का ‘गुल’ होते, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरवर्षी मान्सूनपूर्व कामे केली जातात. परंतु, पहिल्या पावसापासून वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडतो. किमान यंदा तरी पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहण्याची अपेक्षा आहे.

जुनी यंत्रणा बदलावीमहावितरणने देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. विद्युत वाहिन्यांसह इतर यंत्रणा जुनी आहे. उन्हाळ्यात भार वाढतो. परंतु, त्या प्रमाणात देखभाल-दुरुस्ती होत नाही. त्यातून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराविषयी महावितरणच्या अभियंत्यांशी वारंवार संपर्क साधण्यात आला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.- हेमंत कपाडिया, ऊर्जा मंच

लहान-मोठ्या उद्योगांना फटकावीजपुरवठा खंडित होण्याचा फटका २४ तास प्राेसेसिंग असलेल्या उद्योगांना बसतो. वीज गेल्यानंतर प्रोसेसिंग थांबते आणि कच्च्या मालाचे नुकसान होते. त्यासोबत लहान-मोठ्या उद्योगांनाही नेहमीच फटका बसतो. अशावेळी महावितरणकडे तक्रार केली तर उडवाउडवीचे उत्तर मिळते.- वसंत वाघमारे, अध्यक्ष, वाळूज इंडस्ट्रियल असोसिएशन

कधीही जाते वीजवारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होतो. पाणी येण्याच्या वेळेतही वीज जाते. त्याचाही फटका बसतो. गेल्या काही दिवसांपासून रात्री वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे.- दीपक संभेराव, वीज ग्राहक

शहरातील वीज ग्राहक- घरगुती- २,९६,११४- व्यावसायिक-३४,५५६- औद्योगिक- ९,७०३- दिवाबत्ती-१,४५९- शेतीपंप-२,१७९- पाणीपुरवठा - १०५- इतर २,३६१एकूण : ३,३४,४७७

- पाणीपुरवठा-४६- महिन्यांचे वीज बिलिंग-सुमारे १६८ कोटी रुपये.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीजtourismपर्यटन