शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणी नाही, किमान वीज तरी द्या!’; शहरात रोजच होतेय दिवसा अन् रात्री बेरात्री वीज ‘गुल’

By संतोष हिरेमठ | Updated: May 24, 2023 18:39 IST

ऐन उन्हाळ्यात हा प्रकार होत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ ओढावते आहे.

छत्रपती संभाजीनगर : जगाच्या नकाशावर औद्योगिकनगरी, पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरात नागरिकांना आठवड्यातून जेमतेम तासभर पाणी मिळते, पण या शहरात अखंडित वीजपुरवठाही होत नसल्याची चिंताजनक परिस्थिती आहे. शहरात कधीही अचानक वीजपुरवठा खंडित होतो. त्यातही गेल्या पाच दिवसांपासून रोज दिवसा व रात्रीही वीज ‘गुल’ होत आहे. महावितरणच्या कारभाराविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शहरात १८ मेपासून दररोज रात्री वीज गुल होते आहे. ऐन उन्हाळ्यात हा प्रकार होत असल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ ओढावते आहे. मुंबई, पुण्यात वीज जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही, उन्हाळा असो की पावसाळा छत्रपती संभाजीनगरातच वारंवार वीज का ‘गुल’ होते, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरवर्षी मान्सूनपूर्व कामे केली जातात. परंतु, पहिल्या पावसापासून वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडतो. किमान यंदा तरी पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत राहण्याची अपेक्षा आहे.

जुनी यंत्रणा बदलावीमहावितरणने देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही. विद्युत वाहिन्यांसह इतर यंत्रणा जुनी आहे. उन्हाळ्यात भार वाढतो. परंतु, त्या प्रमाणात देखभाल-दुरुस्ती होत नाही. त्यातून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकाराविषयी महावितरणच्या अभियंत्यांशी वारंवार संपर्क साधण्यात आला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही.- हेमंत कपाडिया, ऊर्जा मंच

लहान-मोठ्या उद्योगांना फटकावीजपुरवठा खंडित होण्याचा फटका २४ तास प्राेसेसिंग असलेल्या उद्योगांना बसतो. वीज गेल्यानंतर प्रोसेसिंग थांबते आणि कच्च्या मालाचे नुकसान होते. त्यासोबत लहान-मोठ्या उद्योगांनाही नेहमीच फटका बसतो. अशावेळी महावितरणकडे तक्रार केली तर उडवाउडवीचे उत्तर मिळते.- वसंत वाघमारे, अध्यक्ष, वाळूज इंडस्ट्रियल असोसिएशन

कधीही जाते वीजवारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार होतो. पाणी येण्याच्या वेळेतही वीज जाते. त्याचाही फटका बसतो. गेल्या काही दिवसांपासून रात्री वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे.- दीपक संभेराव, वीज ग्राहक

शहरातील वीज ग्राहक- घरगुती- २,९६,११४- व्यावसायिक-३४,५५६- औद्योगिक- ९,७०३- दिवाबत्ती-१,४५९- शेतीपंप-२,१७९- पाणीपुरवठा - १०५- इतर २,३६१एकूण : ३,३४,४७७

- पाणीपुरवठा-४६- महिन्यांचे वीज बिलिंग-सुमारे १६८ कोटी रुपये.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीजtourismपर्यटन