शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

समृद्धी महामार्गावर नसणार ‘टोल प्लाझा’चा अडथळा; मात्र प्रवास असेल खर्चीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 16:00 IST

Samrudhi Highway : ‘नागपूर ते मुंबई’ हे ७०१ किमीचे अंतर असून, ताशी १५० किमी या वेगाने वाहन धावण्याची क्षमता या महामार्गाची असेल.

- विजय सरवदेऔरंगाबाद : समृद्धी महामार्गाचे (Samrudhi Highway) काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या शीघ्रगती महामार्गावरून वाहनधारकांना विनाअडथळा प्रवास करता यावा, यासाठी महामार्गावर कुठेही ‘टोल प्लाझा’ नसेल (No 'Toll Plaza' obstruction on Samrudhi Highway). महामार्गावरून बाहेर पडताना इंटरचेंजच्या ठिकाणी ‘सर्व्हिस रोड’वर टोलबूथ असणार आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गावर सध्या ४ ठिकाणी टोल प्लाझा चालविण्यासाठी निविदा प्रक्रियेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) मुख्यालयस्तरावर सुरू आहे.

नागपूर ते मुंबई’ हे ७०१ किमीचे अंतर असून, ताशी १५० किमी या वेगाने वाहन धावण्याची क्षमता या महामार्गाची असेल. या समृद्धी महामार्गावर एकूण २४ ठिकाणी इंटरचेंजेस आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या चार ठिकाणी इंटरचेंजेस उभारण्याचे कामही अंतिम टप्प्यात असून, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत इंटरचेंज उभारण्यासाठी भूसंपादनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. इंटरचेंजपासूनच वाहनधारकांना या महामार्गावर प्रवेश करता येईल व बाहेरही पडता येणार आहे. या महामार्गावर अन्य कोठूनही प्रवेश करता येणार नाही किंवा बाहेरही पडता येणार नाही. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महामार्गावरील प्रवास वाहनधारकांना चांगलाच खर्चीक ठरणार आहे. १.६५ रुपये प्रतिकिमी या दराने टोल आकारण्यात येणार आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गावर ‘एक्झिस्ट बेस टोल’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. ज्यामुळे वाहनधारकांना विनाअडथळा अखंडपणे प्रवास करता येईल. सध्या राज्यामध्ये ‘एन्ट्रिबेस टोल’ अर्थात महामार्गावरून प्रवास करतानाच टोलसाठी थांबावे लागते. अनेकदा टोल प्लाझावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. या महामार्गाची संकल्पना मुळातच ‘सुपर एक्स्प्रेस-वे’ (शीघ्रगती महामार्ग) असल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना टोलसाठी कुठेही थांबावे लागणार नाही. या महामार्गावर जेथून प्रवेश केला, तिथे संबंधित वाहनांची नोंद होईल व जिथे ते बाहेर पडेल तिथे ‘सर्व्हिस रोड’वर उभारण्यात आलेल्या टोलबूथवर प्रवास केलेल्या किलोमीटरनुसार ‘फास्ट टॅग’द्वारे आपोआप टोलची रक्कम कपात केली जाईल. सध्या टोल प्लाझा व पंप चालवण्यास देण्यासाठी ‘एमएसआरडीसी’च्या मुख्यालयस्तरावर निविदाप्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे ५० ते ६० किलोमीटर अंतरावर पेट्रोलपंप असेल. पेट्रोल उत्पादक कंपन्यांनाच या महामार्गावर पंप चालविण्यासाठी दिले जाणार आहेत.

असा आहे समृद्धी महामार्ग: - जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग- एकूण १२० मीटर रुंदीचा ६ पदरी रस्ता असेल- पोखरी शिवारात २९० मीटर लांबीचा बोगदा अंतिम टप्प्यात- सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, जांबरगाव या ५ ठिकाणी इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात- महामार्गालगतच्या गावांमधील पादचाऱ्यांसाठी, वाहनांसाठी व प्राण्यांसाठी एकूण १२५ अंडरपास- जिल्ह्यात औरंगाबाद, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील ७१ गावांमधून गेला समृद्धी महामार्ग

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादnagpurनागपूर