शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नळाला नाही पाणी अन पाणीपट्टी ३० हजारी; सात वर्षांपासून पाण्याच्या प्रतीक्षेतील नागरिक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 17:12 IST

सुरेवाडी गल्ली नंबर १ मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी २०१२ मध्ये नळ कनेक्‍शन घेतले होते.

ठळक मुद्देसुरेवाडी गल्ली नंबर १ मध्ये सुरुवातीला एक वर्ष नागरिकांना पाणीही मिळाले.२०१३ पासून नळाला पाणी येणे बंद झाले. अलीकडेच सर्व नागरिकांना २५ ते ३० हजार रुपये पाणीपट्टी दिली

औरंगाबाद : जाधववाडी परिसरातील सुरेवाडी येथील गल्ली नंबर १ मध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या नळाला ७ वर्षांपासून एक थेंबही पाणी आलेले नाही. महापालिकेकडून आता नागरिकांना २५ ते ३० हजार रुपयांचे पाणीपट्टी बिल देण्यात आल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. संतप्त नागरिकांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सुरेवाडी गल्ली नंबर १ मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी २०१२ मध्ये नळ कनेक्‍शन घेतले होते. सुरुवातीला एक वर्ष नागरिकांना पाणीही मिळाले. २०१३ पासून नळाला पाणी येणे बंद झाले. परिसरातील सर्व नागरिकांनी महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंत्यांपर्यंत पाणी येत नसल्याच्या तक्रारी केल्या. वेळोवेळी अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणीसुद्धा केली. मागील सात वर्षांमध्ये नागरिकांना अजिबात पाणी मिळाले नाही. पाणी मिळावे यासाठी नागरिकांनी अनेकदा महापालिकेच्या कार्यालयाचे उंबरठे झिजविले. अलीकडेच सर्व नागरिकांना २५ ते ३० हजार रुपये पाणीपट्टी भरा, असे बिल महापालिकेकडून देण्यात आले.

महापालिकेकडून प्राप्त झालेले बिल पाहून नागरिक अवाक्‌ झाले. मंगळवारी महिला आणि नागरिकांनी महापालिका मुख्यालयात धाव घेतली. प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. पाणीपट्टी रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी महिलांनी केली. महापालिकेने पाणीपट्टी माफ न केल्यास परिसरातील सर्व नागरिक लोकशाही मार्गाने आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी पुष्पा चौधरी, सुवर्णा काथार, सुदर्शना पवार, इंदूबाई चौधरी, भागीरथी खंडागळे, कांताबाई कोंडके, किरण वाघ, संगीता तुपे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकर