शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

देवगिरी किल्ल्यालगत रोप-वे करता येत नाही, अजिंठा लेणीत होणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 19:36 IST

पर्यटनाला चालना देण्यासाठी, तसेच रस्त्यावर होणारी रहदारी कमी करण्यासाठी आता रोप-वे उभारण्याचा मुद्दा पुढे आला.

औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटनस्थळ परिसरात रोप-वे उभारण्याच्या प्रयत्नांना वेग आला असून, शुक्रवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यालगत रोप-वे करता येत नाही. अजिंठा व्ह्यू पॉइंट ते लेण्यांपर्यंत रोप-वे होणे शक्य आहे, असा प्राथमिक सर्व्हे आला आहे. औरंगाबाद लेणी ते हनुमान टेकडी ते गणपती टेकडी व इतर ठिकाणी सर्व्हे करा, अशा सूचना राज्यमंत्री डॉ. कराड यांनी शुक्रवारी बैठकीत केल्या.

डॉ. कराड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, ऑस्ट्रियातील शिष्टमंडळासोबत दिल्लीत प्राथमिक चर्चा झाली आहे. म्हैसमाळ, दौलताबाद, औरंगाबाद लेणी, हनुमान टेकडी, गणपती टेकडी, अजिंठा लेणी येथील भाैगोलिक अभ्यास केल्यानंतर रोप-वे कुठे उभारता येईल, हे ठरेल. यासाठी भारतातील २ आणि ऑस्ट्रियातील १ कंपनी रोप-वे उभारण्याच्या अनुषंगाने सर्व्हे करणार आहे.औरंगाबाद जिल्हा चारही बाजूंनी ऐतिहासिक स्मारकांनी वेढलेला आहे.

अजिंठा, वेरूळ लेणी ही जागतिक वारसा स्थळे या जिल्ह्यात आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी, तसेच रस्त्यावर होणारी रहदारी कमी करण्यासाठी आता रोप-वे उभारण्याचा मुद्दा पुढे आला. रोप-वे उभारण्याप्रकरणी दिल्लीतील कार्यालयात ऑस्ट्रियाचे प्रतिनिधी पीटर वॉलमन, स्टेन्बर्ग डनियल यांच्या उपस्थितीत भरत पाटील, प्रफुल चौधरी, प्रदीप सोदी, हिमांशू पृथ्वी यांची बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. रोप-वे उभारण्यासाठी युरोपियन तंत्रज्ञान वापरले जाणार असून, येणाऱ्या काळात औरंगाबादेत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना त्याचा फायदा होईल, असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन