शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

देवगिरी किल्ल्यालगत रोप-वे करता येत नाही, अजिंठा लेणीत होणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 19:36 IST

पर्यटनाला चालना देण्यासाठी, तसेच रस्त्यावर होणारी रहदारी कमी करण्यासाठी आता रोप-वे उभारण्याचा मुद्दा पुढे आला.

औरंगाबाद : जिल्ह्यातील पर्यटनस्थळ परिसरात रोप-वे उभारण्याच्या प्रयत्नांना वेग आला असून, शुक्रवारी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली. दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यालगत रोप-वे करता येत नाही. अजिंठा व्ह्यू पॉइंट ते लेण्यांपर्यंत रोप-वे होणे शक्य आहे, असा प्राथमिक सर्व्हे आला आहे. औरंगाबाद लेणी ते हनुमान टेकडी ते गणपती टेकडी व इतर ठिकाणी सर्व्हे करा, अशा सूचना राज्यमंत्री डॉ. कराड यांनी शुक्रवारी बैठकीत केल्या.

डॉ. कराड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, ऑस्ट्रियातील शिष्टमंडळासोबत दिल्लीत प्राथमिक चर्चा झाली आहे. म्हैसमाळ, दौलताबाद, औरंगाबाद लेणी, हनुमान टेकडी, गणपती टेकडी, अजिंठा लेणी येथील भाैगोलिक अभ्यास केल्यानंतर रोप-वे कुठे उभारता येईल, हे ठरेल. यासाठी भारतातील २ आणि ऑस्ट्रियातील १ कंपनी रोप-वे उभारण्याच्या अनुषंगाने सर्व्हे करणार आहे.औरंगाबाद जिल्हा चारही बाजूंनी ऐतिहासिक स्मारकांनी वेढलेला आहे.

अजिंठा, वेरूळ लेणी ही जागतिक वारसा स्थळे या जिल्ह्यात आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी, तसेच रस्त्यावर होणारी रहदारी कमी करण्यासाठी आता रोप-वे उभारण्याचा मुद्दा पुढे आला. रोप-वे उभारण्याप्रकरणी दिल्लीतील कार्यालयात ऑस्ट्रियाचे प्रतिनिधी पीटर वॉलमन, स्टेन्बर्ग डनियल यांच्या उपस्थितीत भरत पाटील, प्रफुल चौधरी, प्रदीप सोदी, हिमांशू पृथ्वी यांची बैठक घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. रोप-वे उभारण्यासाठी युरोपियन तंत्रज्ञान वापरले जाणार असून, येणाऱ्या काळात औरंगाबादेत येणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना त्याचा फायदा होईल, असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ajantha - Elloraअजंठा वेरूळAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन