शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

औरंगाबाद परिमंडळात कृषी संजीवनी योजनेला झटका; शेतकर्‍यांकडे २,३१८ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 15:54 IST

कृषी पंपाकडे असलेल्या वीज बिलाची थकबाकी टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ३ लाख ३२ हजार १० कृषीपंप ग्राहकांपैकी अवघ्या ३ हजार ९७७ ग्राहकांनीच या योजनेचा लाभ घेतला.

औरंगाबाद : कृषी पंपाकडे असलेल्या वीज बिलाची थकबाकी टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ३ लाख ३२ हजार १० कृषीपंप ग्राहकांपैकी अवघ्या ३ हजार ९७७ ग्राहकांनीच या योजनेचा लाभ घेतला. उर्वरित ३ लाख २८ हजार ३३ ग्राहकांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे. 

महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळांतर्गत या जिल्ह्यात २ लाख १३ हजार १६७ कृषीपंपांचे ग्राहक असून, त्यांच्याकडे १३६६.८८ कोटी रुपये एवढी थकबाकी आहे. जालना जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ८४३ कृषीपंप ग्राहकांकडे ९५१.८० कोटी रुपयांची मूळ थकबाकी आहे. राज्य शासनाने कृषीपंपधारक शेतकर्‍यांना बिलांच्या अदायगीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी ही योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत ज्या शेतकर्‍यांकडे ३० हजार रुपयांपर्यंत बिलाची मूळ रक्कम थकबाकी आहे, अशा शेतकर्‍यांनी ५ हप्त्यांमध्ये, तर ज्यांच्याकडे ३० हजारापेक्षा अधिक बिल थकलेले असेल, त्यांनी १० हप्त्यांत मूळ रक्कम भरायची होती. यासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती; परंतु या योजनेला शेतकर्‍यांकडून अतिशय कमी प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून कृषीपंप ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. याशिवाय नादुरुस्त रोहित्र (डीपी) बदलण्यासाठी महावितरणने त्या परिसरातील ७० टक्के कृषीपंपांना कपॅसिटर बसविल्याशिवाय ते दुरुस्त केले जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 

दरमहा ० ते ३० युनिट एवढीच रीडिंग असलेले घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांची संख्या शहरात ३१,४३८, जिल्ह्यातील ग्रामीण भागात १,४८,०१० आणि जालना जिल्ह्यात ४७,९०८ एवढी आहे. महावितरणने प्रामुख्याने या ग्राहकांचे मीटर तपासणे, घरातील विद्युतभार तपासणे, थकबाकी वसूल करणे, विद्युत पुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे. या ग्राहकांचे मीटर बदलण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. 

३५ हजार आधुनिक मीटर या संदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकारांना सांगितले की, सध्या ३५ हजार आधुनिक मीटर प्राप्त झाले असून, या मीटरवर रिमोट अथवा अन्य छेडछाडीचा परिणाम होत नाही. आणखी ३५ हजार मीटर येणार आहेत. संशयास्पद अथवा कमी रीडिंग असलेले मीटर बदलून तेथे हे मीटर बसविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. ज्यामुळे वीज गळती कमी होऊ शकेल.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरी