शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

औरंगाबाद परिमंडळात कृषी संजीवनी योजनेला झटका; शेतकर्‍यांकडे २,३१८ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 15:54 IST

कृषी पंपाकडे असलेल्या वीज बिलाची थकबाकी टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ३ लाख ३२ हजार १० कृषीपंप ग्राहकांपैकी अवघ्या ३ हजार ९७७ ग्राहकांनीच या योजनेचा लाभ घेतला.

औरंगाबाद : कृषी पंपाकडे असलेल्या वीज बिलाची थकबाकी टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती; परंतु परिमंडळांतर्गत औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील ३ लाख ३२ हजार १० कृषीपंप ग्राहकांपैकी अवघ्या ३ हजार ९७७ ग्राहकांनीच या योजनेचा लाभ घेतला. उर्वरित ३ लाख २८ हजार ३३ ग्राहकांनी या योजनेकडे पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे. 

महावितरणच्या औरंगाबाद परिमंडळांतर्गत या जिल्ह्यात २ लाख १३ हजार १६७ कृषीपंपांचे ग्राहक असून, त्यांच्याकडे १३६६.८८ कोटी रुपये एवढी थकबाकी आहे. जालना जिल्ह्यातील १ लाख १८ हजार ८४३ कृषीपंप ग्राहकांकडे ९५१.८० कोटी रुपयांची मूळ थकबाकी आहे. राज्य शासनाने कृषीपंपधारक शेतकर्‍यांना बिलांच्या अदायगीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी ही योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत ज्या शेतकर्‍यांकडे ३० हजार रुपयांपर्यंत बिलाची मूळ रक्कम थकबाकी आहे, अशा शेतकर्‍यांनी ५ हप्त्यांमध्ये, तर ज्यांच्याकडे ३० हजारापेक्षा अधिक बिल थकलेले असेल, त्यांनी १० हप्त्यांत मूळ रक्कम भरायची होती. यासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती; परंतु या योजनेला शेतकर्‍यांकडून अतिशय कमी प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून कृषीपंप ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. याशिवाय नादुरुस्त रोहित्र (डीपी) बदलण्यासाठी महावितरणने त्या परिसरातील ७० टक्के कृषीपंपांना कपॅसिटर बसविल्याशिवाय ते दुरुस्त केले जाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. 

दरमहा ० ते ३० युनिट एवढीच रीडिंग असलेले घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांची संख्या शहरात ३१,४३८, जिल्ह्यातील ग्रामीण भागात १,४८,०१० आणि जालना जिल्ह्यात ४७,९०८ एवढी आहे. महावितरणने प्रामुख्याने या ग्राहकांचे मीटर तपासणे, घरातील विद्युतभार तपासणे, थकबाकी वसूल करणे, विद्युत पुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम सुरू केली आहे. या ग्राहकांचे मीटर बदलण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. 

३५ हजार आधुनिक मीटर या संदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी पत्रकारांना सांगितले की, सध्या ३५ हजार आधुनिक मीटर प्राप्त झाले असून, या मीटरवर रिमोट अथवा अन्य छेडछाडीचा परिणाम होत नाही. आणखी ३५ हजार मीटर येणार आहेत. संशयास्पद अथवा कमी रीडिंग असलेले मीटर बदलून तेथे हे मीटर बसविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. ज्यामुळे वीज गळती कमी होऊ शकेल.

टॅग्स :mahavitaranमहावितरणFarmerशेतकरी