शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राष्ट्रपती राजवट नाही, राज्यात येत्या २६ नोव्हेंबरला सरकार स्थापन होईल: संजय शिरसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 13:38 IST

विरोधकांच्या वल्गना पूर्ण होणार नाहीत, असा इशारा देखील संजय शिरसाट यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर: जम्मू काश्मीर आणि हरियाणा सोबत राज्यातील विधानसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला नाही. यामुळे राज्यात काही काळ राष्ट्रपती राजवट लागेल आणि डिसेंबरमध्ये नवीन विधानसभा अस्तित्वात येईल अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नाही, तर येत्या २६ नोव्हेंबरला सरकार स्थापन होईल, असा दावा आज शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला. विरोधकांच्या वल्गना पूर्ण होणार नाहीत, असा इशारा देखील शिरसाट यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेस संबोधित करताना दिला.

आमदार शिरसाट पुढे म्हणाले, बदलापूर येथील घटनेत अत्याचार करणाऱ्यांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहजे. कायदा गेला उडत. सरकार कारवाई करेल मात्र एक निर्णय घेण्याची गरज आहे. महिलेवर अत्याचार होत असेल तर जरब बसला पाहिजे. आता सहनशिलतेचा अंत झाला आहे. या घटनेचे कुणी राजकारण करू नका, यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहजे. नराधमाला ठेचायची वेळ आली तर सुरुवात आम्ही करू, आरोपी भेटलं तर त्याला रस्त्यात ठेचा.यासाठी कायदा हातात घेतला तर चालेल, असा संताप शिरसाट यांनी व्यक्त केला. तसेच सरकार काम करत आहे. लिंगपिसाट लोकांवर कठोर कारवाई झाली पाहजे. यावर प्रकरणी आरोप करून प्रसिध्दी घ्या, मात्र या विषयाचं राजकारण करू नका, असे विरोधकांना आवाहनही आ. शिरसाट यांनी केले.

...म्हणून विरोधकांना त्रास होतोयलाडकी बहिण योजना अनेक वर्ष सत्तेत असलेल्या, जनतेला केवळ प्रलोभन देणाऱ्या लोकांना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेली चपराक आहे. बहिणीच्या खात्यात पैसे जात आहेत तर यांची पोटदुखी होत आहे, असा आरोप आ. शिरसाट यांनी केले. रक्षाबंधन पूर्वी पैसे द्यायचे होते. २ कोटी महिलांच्या खात्यात एकाच वेळी पैसे आल्याने विरोधकांना त्रास होत आहे. मात्र, आमच्या बहिणींना यामुळे आत्मविश्वास आला यात आमचं यश आहे, असेही शिरसाट म्हणाले. 

रामगिरी महाराज यांच्या पाठीशीरामगिरी महाराजांनी काय चुकीचं बोलले. ते संबंधित ग्रंथाच्या आधारावर बोलले आहेत. एखाद्या समाजाचा दबाव चालणार नाही. महाराज चुकीचं बोलले नाहीत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे शिरसाट यांनी जाहीर केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSanjay Shirsatसंजय शिरसाटShiv Senaशिवसेनाvidhan sabhaविधानसभा