शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

‘या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचे नाही’; सतीश चव्हाण यांची घणाघाती टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:45 IST

‘या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचे नाही. मराठा आरक्षण यांना सहज देता आले असते; परंतु राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून ते प्रकरण न्यायप्रविष्ट करून टाकण्यात आले. अशा तिखट शब्दांत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

औरंगाबाद : ‘या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचे नाही. मराठा आरक्षण यांना सहज देता आले असते; परंतु राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून ते प्रकरण न्यायप्रविष्ट करून टाकण्यात आले. धनगर आरक्षणाच्या बाबतीतही तेच घडतेय. आता महादेव जानकरसुद्धा तोंड लपवून फिरताहेत. धनगर समाजाच्या मेळाव्यांना जायचे टाळताहेत. मुस्लिम आरक्षण तर यांना द्यायचेच नाही, अशा तिखट शब्दांत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

उद्यापासून सुरू होणाऱ्या नागपूरच्या पावसाळी अधिवेशनास रवाना होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यासाठी संघभूमी नागपूर येथून केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यासाठी नागपूरला पावसाळी अधिवेशन घेतले जात आहे. मात्र, चार वर्षांत औरंगाबादला मंत्रिमंडळाची एक बैठक घ्यायला यांना वेळ मिळाला नाही. दरवर्षी हे बैठक घेऊ शकले नाहीत, अशी खंत व्यक्त करून चव्हाण यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व योजना नागपूरला पळविण्याच्या मागे आहेत. स्पाचा साधा प्रस्तावही या सरकारने केंद्राकडे पाठवला नाही. आता याला तीन वर्षे झाली. आयआयएमही असेच पळविले गेले.खैरेंनी पिठाची गिरणी तरी आणली का ? कोण खैरे? हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली मते लुबाडण्याचा त्यांचा धंदा... चार-चार वेळा निवडून येऊनही यांनी एक साधी पिठाची गिरणी तरी आपल्या मतदारसंघात आणली का? त्यापेक्षा जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे बरे! त्यांनी तरी काही संस्था जालना मतदारसंघात आणून दाखविल्या, असे सांगत आ. सतीश चव्हाण आणखी म्हणाले की, यांनी चार निवडणुका अशाच जिंकल्या. फक्त चारच नावे घ्यायची. आई तुळजा भवानी, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे... यापलीकडे काही नाही. लोकसभेतही यांचा काहीच परफॉर्ममन्स नाही. पक्षाने आदेश दिल्यास मी खैरेंविरुद्ध निवडणूक लढवायला तयार असल्याची घोषणाही त्यांनी केली. 

विद्यापीठातील गैरव्यवहारावर आवाज उठविणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना त्वरित सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी करून चव्हाण यांनी विद्यापीठातील गैरव्यवहारप्रकरणी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे घोषित केले व विद्यापीठात सध्या कायदा पायदळी तुडवून कारभार चालू असल्याचा आरोप केला. विद्यापीठाला कुलगुरूंनी ५० वर्षे मागे नेले अशीही टीका त्यांनी केली.

टॅग्स :Satish Chavanसतीश चव्हाणState Governmentराज्य सरकारreservationआरक्षण