शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
6
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
7
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
8
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
9
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
10
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
11
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
12
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
13
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
14
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
15
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
16
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
17
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
18
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
19
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
20
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार

‘या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचे नाही’; सतीश चव्हाण यांची घणाघाती टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:45 IST

‘या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचे नाही. मराठा आरक्षण यांना सहज देता आले असते; परंतु राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून ते प्रकरण न्यायप्रविष्ट करून टाकण्यात आले. अशा तिखट शब्दांत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

औरंगाबाद : ‘या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचे नाही. मराठा आरक्षण यांना सहज देता आले असते; परंतु राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून ते प्रकरण न्यायप्रविष्ट करून टाकण्यात आले. धनगर आरक्षणाच्या बाबतीतही तेच घडतेय. आता महादेव जानकरसुद्धा तोंड लपवून फिरताहेत. धनगर समाजाच्या मेळाव्यांना जायचे टाळताहेत. मुस्लिम आरक्षण तर यांना द्यायचेच नाही, अशा तिखट शब्दांत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

उद्यापासून सुरू होणाऱ्या नागपूरच्या पावसाळी अधिवेशनास रवाना होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यासाठी संघभूमी नागपूर येथून केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यासाठी नागपूरला पावसाळी अधिवेशन घेतले जात आहे. मात्र, चार वर्षांत औरंगाबादला मंत्रिमंडळाची एक बैठक घ्यायला यांना वेळ मिळाला नाही. दरवर्षी हे बैठक घेऊ शकले नाहीत, अशी खंत व्यक्त करून चव्हाण यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व योजना नागपूरला पळविण्याच्या मागे आहेत. स्पाचा साधा प्रस्तावही या सरकारने केंद्राकडे पाठवला नाही. आता याला तीन वर्षे झाली. आयआयएमही असेच पळविले गेले.खैरेंनी पिठाची गिरणी तरी आणली का ? कोण खैरे? हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली मते लुबाडण्याचा त्यांचा धंदा... चार-चार वेळा निवडून येऊनही यांनी एक साधी पिठाची गिरणी तरी आपल्या मतदारसंघात आणली का? त्यापेक्षा जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे बरे! त्यांनी तरी काही संस्था जालना मतदारसंघात आणून दाखविल्या, असे सांगत आ. सतीश चव्हाण आणखी म्हणाले की, यांनी चार निवडणुका अशाच जिंकल्या. फक्त चारच नावे घ्यायची. आई तुळजा भवानी, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे... यापलीकडे काही नाही. लोकसभेतही यांचा काहीच परफॉर्ममन्स नाही. पक्षाने आदेश दिल्यास मी खैरेंविरुद्ध निवडणूक लढवायला तयार असल्याची घोषणाही त्यांनी केली. 

विद्यापीठातील गैरव्यवहारावर आवाज उठविणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना त्वरित सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी करून चव्हाण यांनी विद्यापीठातील गैरव्यवहारप्रकरणी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे घोषित केले व विद्यापीठात सध्या कायदा पायदळी तुडवून कारभार चालू असल्याचा आरोप केला. विद्यापीठाला कुलगुरूंनी ५० वर्षे मागे नेले अशीही टीका त्यांनी केली.

टॅग्स :Satish Chavanसतीश चव्हाणState Governmentराज्य सरकारreservationआरक्षण