शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

औरंगाबादमध्ये यापुढे कोणी यावे व दुकाने बंद करावीत, हे चालणार नाही; जिल्हा व्यापारी महासंघाशी करावी लागणार चर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 19:32 IST

कोणताही राजकीय पक्ष असो वा संघटना बाजारपेठ बंद पुकारण्यापूर्वी त्यांना जिल्हा व्यापारी महासंघासमोर भूमिका मांडावी लागणार आहे.

ठळक मुद्देमहासंघ बंदमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय घेईल.येत्या आठवड्यात महासंघाची बैठक घेऊन आचारसंहिता जाहीर करणार आहे. 

औैरंगाबाद : राजकीय पक्ष, संघटना अधूनमधून राज्य, देशव्यापी बंद पुकारत असतात. तसेच काही गुंडगिरी करणारेही जबरदस्ती करून दुकाने बंद करणे किंवा तोडफोड करण्याचे काम करीत असतात. आता यापुढे कोणी यावे व दुकाने बंद करावीत, असे चालणार नाही. कारण, कोणताही राजकीय पक्ष असो वा संघटना बाजारपेठ बंद पुकारण्यापूर्वी त्यांना जिल्हा व्यापारी महासंघासमोर भूमिका मांडावी लागणार आहे. त्यानंतर महासंघ बंदमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय घेईल. यासंदर्भात येत्या आठवड्यात महासंघाची बैठक घेऊन आचारसंहिता जाहीर करणार आहे. 

शहरात मागील पाच महिन्यांत दंगली, दगडफेक, जाळपोळ, आंदोलने यामुळे अनेक दिवस बाजारपेठ बंद राहिली. यात दुकानांचे, गाड्यांचे मोठे नुकसान झाले. शहरात कधी काय होईल, याचा नेम नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीतीमुळे बाहेरगावाचे ग्राहक शहरात खरेदीसाठी येणे टाळत आहेत. याचा मोठा फटका बाजारपेठेला बसला असून निम्म्याने उलाढाल घटली आहे. 

यासंदर्भात जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, देश व  राज्याचे हित लक्षात घेता, एखाद्या सामाजिक प्रश्नावर किंवा लोकहिताच्या विरोधातील घटनांवर कोणी बाजारपेठ बंद पुकाराला, तर सर्व व्यापारी आपली दुकाने बंद ठेवतात आणि ठेवत आली आहेत. मात्र, आता कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा संघटनेला बाजारपेठ बंद ठेवायची असले, तर सर्वप्रथम जिल्हा व्यापारी महासंघासमोर भूमिका मांडावी लागणार आहे. जर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचा मुद्दा पटला व तो शहराच्या वा देशहिताचा असेल तर महासंघ सर्व व्यापाऱ्यांना दुकाना बंद ठेवण्याचे आवाहन करेल. जर मुद्दा पटला नाही तर महासंघ बाजारपेठ बंद मान्य करणार नाही. यासंदर्भात येत्या आठवडाभरात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. त्यात या विषयावर आचारसंहिता तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

...तर नुकसानभरपाई वसूल करणार कोणत्या राजकीय पक्ष, संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या काळात दुकाने फोडणे, जाळणे अशा अप्रिय घटना घडल्या, तर त्याची संपूर्ण नुकसानभरपाई त्या पक्षाला किंवा संघटनेला द्यावी लागेल, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. न्यायालयीन निकालाचा आधार घेत जिल्हा व्यापारी महासंघ कोणत्याही व्यापाऱ्याचे नुकसान भरून देण्यासाठी न्यायालयात जाऊ शकते.  

टॅग्स :agitationआंदोलनbusinessव्यवसायMarketबाजार