शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

औरंगाबादमध्ये यापुढे कोणी यावे व दुकाने बंद करावीत, हे चालणार नाही; जिल्हा व्यापारी महासंघाशी करावी लागणार चर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 19:32 IST

कोणताही राजकीय पक्ष असो वा संघटना बाजारपेठ बंद पुकारण्यापूर्वी त्यांना जिल्हा व्यापारी महासंघासमोर भूमिका मांडावी लागणार आहे.

ठळक मुद्देमहासंघ बंदमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय घेईल.येत्या आठवड्यात महासंघाची बैठक घेऊन आचारसंहिता जाहीर करणार आहे. 

औैरंगाबाद : राजकीय पक्ष, संघटना अधूनमधून राज्य, देशव्यापी बंद पुकारत असतात. तसेच काही गुंडगिरी करणारेही जबरदस्ती करून दुकाने बंद करणे किंवा तोडफोड करण्याचे काम करीत असतात. आता यापुढे कोणी यावे व दुकाने बंद करावीत, असे चालणार नाही. कारण, कोणताही राजकीय पक्ष असो वा संघटना बाजारपेठ बंद पुकारण्यापूर्वी त्यांना जिल्हा व्यापारी महासंघासमोर भूमिका मांडावी लागणार आहे. त्यानंतर महासंघ बंदमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय घेईल. यासंदर्भात येत्या आठवड्यात महासंघाची बैठक घेऊन आचारसंहिता जाहीर करणार आहे. 

शहरात मागील पाच महिन्यांत दंगली, दगडफेक, जाळपोळ, आंदोलने यामुळे अनेक दिवस बाजारपेठ बंद राहिली. यात दुकानांचे, गाड्यांचे मोठे नुकसान झाले. शहरात कधी काय होईल, याचा नेम नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीतीमुळे बाहेरगावाचे ग्राहक शहरात खरेदीसाठी येणे टाळत आहेत. याचा मोठा फटका बाजारपेठेला बसला असून निम्म्याने उलाढाल घटली आहे. 

यासंदर्भात जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, देश व  राज्याचे हित लक्षात घेता, एखाद्या सामाजिक प्रश्नावर किंवा लोकहिताच्या विरोधातील घटनांवर कोणी बाजारपेठ बंद पुकाराला, तर सर्व व्यापारी आपली दुकाने बंद ठेवतात आणि ठेवत आली आहेत. मात्र, आता कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा संघटनेला बाजारपेठ बंद ठेवायची असले, तर सर्वप्रथम जिल्हा व्यापारी महासंघासमोर भूमिका मांडावी लागणार आहे. जर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचा मुद्दा पटला व तो शहराच्या वा देशहिताचा असेल तर महासंघ सर्व व्यापाऱ्यांना दुकाना बंद ठेवण्याचे आवाहन करेल. जर मुद्दा पटला नाही तर महासंघ बाजारपेठ बंद मान्य करणार नाही. यासंदर्भात येत्या आठवडाभरात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. त्यात या विषयावर आचारसंहिता तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

...तर नुकसानभरपाई वसूल करणार कोणत्या राजकीय पक्ष, संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या काळात दुकाने फोडणे, जाळणे अशा अप्रिय घटना घडल्या, तर त्याची संपूर्ण नुकसानभरपाई त्या पक्षाला किंवा संघटनेला द्यावी लागेल, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. न्यायालयीन निकालाचा आधार घेत जिल्हा व्यापारी महासंघ कोणत्याही व्यापाऱ्याचे नुकसान भरून देण्यासाठी न्यायालयात जाऊ शकते.  

टॅग्स :agitationआंदोलनbusinessव्यवसायMarketबाजार