शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

चंद्र-सूर्य असेपर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही; एकनाथ शिंदेंची ग्वाही

By बापू सोळुंके | Updated: April 25, 2024 18:27 IST

विरोधकांकडून अपप्रचार सुरू असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली

छत्रपती संभाजीनगर: देशाचे प्रधानमंत्री मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास ते संविधान बदलतील,असा अपप्रचार गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. मात्र जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत कोणीही संविधान बदलू शकत नाही, अशी ग्वाही मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

महायुतीचे औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज गुरूवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. रॅलीत सहभागी झाल्यानंतर त्यांनी जालना रोडवरील हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, आज येथे विविध धर्मगुरू येऊन भेटले. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात साधू,संतांची हत्या झाली. आपले सरकार आल्यावर सर्वप्रथम हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. सन २०१९ पूर्वी मोदींची स्तुती करणाऱ्या ठाकरे यांच्या अनेक ऑडिओ क्लीप आहेत. अगोदर स्तुती करणे आणि नंतर टीका करता. सरडे असतात तसे ते रंग बदलात, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. आता संविधान बदलले जाणार असा अपप्रचार विरोधक करीत आहेत, जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत कुणीही संविधान बदलणार नाही, कुणी यांच्या अपप्रचारावर विश्वास ठेवणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अवकाळी मुळे नुकसानग्रस्तांना मदतीचे निर्देशअवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे झालेली जिवित आणि वित्तीयहानीची तातडीने दखल घेण्यात आली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना पंचनामे करण्याचे आणि जेथे नुकसान झाले आहेत तेथे तातडीने नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना नमूद केले. तसेच जेथे पाणी टंचाई आहे,तेथे टँकरने पाणी पुरवठा करण्यात येई, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदे