शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
4
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
5
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
6
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
7
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
8
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
9
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
10
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
11
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
12
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
13
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
14
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
15
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
16
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
17
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
18
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
19
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
20
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

औरंगाबादेत गुंतवणुकीच्या घोषणाच; 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' अंतगर्त एकही करार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 13:53 IST

शासनासोबत झालेल्या सामंजस्य करारामध्ये १२ पैकी एकाही कंपनीने औरंगाबादेत गुंतवणुकीचा करार केलेला नाही.

ठळक मुद्दे‘डीएमआयसी’तील पायाभूत सुविधांचा उद्योगांसाठी प्राधान्याने विचार व्हायला हवा

औरंगाबाद : शेंद्रा- बिडकीन ‘डीएमआयसी’ या औद्योगिक वसाहतीत गुंतवणूक करण्यासाठी पाहणी करून गेलेल्या कंपन्या लवकरच येथे येतील, अशी अपेक्षा होती; परंतु मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत शासनासोबत झालेल्या सामंजस्य करारामध्ये १२ पैकी एकाही कंपनीने औरंगाबादेत गुंतवणुकीचा करार केलेला नाही. त्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या येथे येणार म्हणून केवळ घोषणाच ठरल्या की काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

यासंदर्भात येथील उद्योग क्षेत्रातही नाराजीचा सूर उमटला आहे. ‘लॉकडाऊन’नंतर आता गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बाब निश्चित चांगली असली, तरी ‘डीएमआयसी’च्या पार्श्वभूमीवर मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत केलेल्या कराराच्या वेळी एक-दोन कंपन्यांचा विचार औरंगाबादसाठी करायला हरकत नव्हती, असे मत येथील उद्योजकांनी व्यक्त केले आहे. 

औरंगाबादेत रशिया येथील एनएलएमके, चीन येथील बाहे मेडिकल या कंपन्यांनी मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. डेटॉल, हार्पिक उत्पादन असलेला रेकिट बेन्कीझर ग्रुप गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे. किया मोटार्सने येथे पाहणी केली आहे. औषधनिर्माण, अन्नप्रक्रिया, संरक्षण क्षेत्रात कार्यरत कंपन्यांशी चर्चा सध्या सुरू आहे. तथापि, हे उद्योग येथे येण्यासाठी सध्यापेक्षा वेगळे काय करता येईल, याचाही अभ्यास करावा लागेल; अन्यथा, ‘डीएमआयसी’मध्ये तयार असलेली ३ हजार एकर जागा आणि भविष्यात येणारी ७ हजार एकर जागा विकण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील, अशा भावना उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत. 

औरंगाबादचा विचार नक्कीच -सुभाष देसाई  राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, पालकमंत्री या नात्याने आपण नेहमीच औरंगाबादला प्राधान्य दिले आहे. येथे आपण व्हायरॉलॉजी लॅब आणली. कोविड हॉस्पिटल उभारले. कालचे जे फक्त १२ सामंजस्य करार झालेत, असे असंख्य करार होणार आहेत. त्यात औरंगाबादचासुद्धा नंबर आहे. हे सर्व खासगी उद्योग आहेत. गुंतवणूदार हे स्थळ निवडत असतात. या पुढच्या काळात औरंगाबादेत जास्तीत जास्त उद्योग आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. 

आपण कुठे कमी पडलो, याचा विचार व्हावा ‘सीआयआय’ या उद्योग संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी म्हणाले की, कालच्या सामंजस्य करारामध्ये औरंगाबादचा समावेश नाही. हे ‘डीएमआयसी’च्या दृष्टीने निराशाजनक असले, तरी आपण कुठे कमी पडलो आहोत, याचा विचार केला पाहिजे. औरंगाबाद हे आॅटोमोबाईल हब आहे. त्या दृष्टिकोनातून ग्रेट वॉल ही चीनची आॅटोमोटिव्ह कंपनी औरंगाबादेत येण्यास हरकत नव्हती. दुसरीकडे, महाराष्ट्रात डेटा सेंटरच्या इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात येत आहेत. यासाठी आपण स्ट्राँग फायबर कनेक्शन जर घेऊन येऊ शकलो, तर आयटी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबी येथे येऊ शकतात. या स्पर्धेत आपण कुठे कमी पडत आहोत, हे तपासून प्रयत्न करायला हवेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्रbusinessव्यवसाय