शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान : योगेंद्र यादव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:31 IST

लोकशाही, विविधतेतील एकता आणि विकास या स्तंभावर पहिल्यांदाच कधी नव्हे एवढा हल्ला करण्यात येत आहे.

ठळक मुद्देभारताच्या स्वधर्मावरील हल्ला परतवून लावासत्य, जमिनी या मुद्यांवर निवडणुका झाल्या पाहिजेत

औरंगाबाद :  ‘हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान’ असा नारा आज येथे स्वराज इंडियाचे नेते व सुप्रसिद्ध विचारवंत योगेंद्र यादव यांनी दिला व भारताच्या स्वधर्मावर कधी नव्हे एवढा हल्ला चढविण्यात आला असून, तो परतवून लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यशवंत कला महाविद्यालयात रात्री ते चळवळीतील कार्यकर्ते व पत्रकारांशी बोलत होते. उद्या दि. २० डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता देवगिरी महाविद्यालयात डॉ. आ. ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी गौरव समारंभ योगेंद्र यादव यांच्या हस्ते होत आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला यादव यांनी शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांशी हा संवाद साधला.

यादव यांनी सांगितले की, देशावर आज आलेले हे संकट साधारण नाही. भारताच्या स्वधर्मावर मोठा हल्ला होत आहे.भारतीय गणतंत्र वाचविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. लोकशाही, विविधतेतील एकता आणि विकास या स्तंभावर पहिल्यांदाच कधी नव्हे एवढा हल्ला करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर समग्र रणनीती आखण्याची गरज निर्माण झाली आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धर्माशी नाते सोडून आपण धर्मांधांना धुडगूस घालायला जणू वावच देत आहोत.

आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला हरवण्याची नितांत गरज आहे. हे आव्हान केवळ निवडणुकांपुरतेच मर्यादित नाही. १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांना हरवणे जसे अगत्याचे होते, तसेच आता नरेंद्र मोदी यांनाही हरवण्याची गरज आहे. मोदी यांच्या विरोधात महाआघाडी बनत आहे. पण तिच्याकडेही ध्येय, धोरण आणि कृती कार्यक्रम दिसून येत नाही. त्यांच्याकडेही कुठले स्वप्न नाही. मोदींनी निदान स्वप्न तरी दाखविले. अर्थात ही स्वप्ने खोटी  होती; पण राजकारणात स्वप्ने दाखवणे गरजेचे असते, असे यादव म्हणाले.

चेहरा, चरित्र आणि विश्वास याची निवडणुकीत आवश्यकता असते. परंतु मुद्यांशिवाय या निवडणुका लढविण्याचा सत्ताधारी व विरोधी पक्षांचा इरादा दिसतो. पण सत्य, जमिनी या मुद्यांवर निवडणुका झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही ना हिंदू, ना मुसलमान, बस किसान और नौजवान हा नारा देत असल्याचे यादव यांनी जाहीर केले.

अण्णा खंदारे, प्रा. एच. एम. देसरडा, अ‍ॅड. डी. आर. शेळके, सुभाष लोमटे, के. ई. हरदास, अड. अंकुश भालेकर,  प्रा. भारत शिरसाट, प्रा. प्रकाश शिरसाट, ज्ञानप्रकाश मोदाणी,  अ‍ॅड. प्रकाश परांजपे, अली खान, मेजर सुखदेव बन, शेख  खुर्रम, अय्युब खान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवSocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद