शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान : योगेंद्र यादव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:31 IST

लोकशाही, विविधतेतील एकता आणि विकास या स्तंभावर पहिल्यांदाच कधी नव्हे एवढा हल्ला करण्यात येत आहे.

ठळक मुद्देभारताच्या स्वधर्मावरील हल्ला परतवून लावासत्य, जमिनी या मुद्यांवर निवडणुका झाल्या पाहिजेत

औरंगाबाद :  ‘हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान’ असा नारा आज येथे स्वराज इंडियाचे नेते व सुप्रसिद्ध विचारवंत योगेंद्र यादव यांनी दिला व भारताच्या स्वधर्मावर कधी नव्हे एवढा हल्ला चढविण्यात आला असून, तो परतवून लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यशवंत कला महाविद्यालयात रात्री ते चळवळीतील कार्यकर्ते व पत्रकारांशी बोलत होते. उद्या दि. २० डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता देवगिरी महाविद्यालयात डॉ. आ. ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी गौरव समारंभ योगेंद्र यादव यांच्या हस्ते होत आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला यादव यांनी शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांशी हा संवाद साधला.

यादव यांनी सांगितले की, देशावर आज आलेले हे संकट साधारण नाही. भारताच्या स्वधर्मावर मोठा हल्ला होत आहे.भारतीय गणतंत्र वाचविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. लोकशाही, विविधतेतील एकता आणि विकास या स्तंभावर पहिल्यांदाच कधी नव्हे एवढा हल्ला करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर समग्र रणनीती आखण्याची गरज निर्माण झाली आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धर्माशी नाते सोडून आपण धर्मांधांना धुडगूस घालायला जणू वावच देत आहोत.

आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला हरवण्याची नितांत गरज आहे. हे आव्हान केवळ निवडणुकांपुरतेच मर्यादित नाही. १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांना हरवणे जसे अगत्याचे होते, तसेच आता नरेंद्र मोदी यांनाही हरवण्याची गरज आहे. मोदी यांच्या विरोधात महाआघाडी बनत आहे. पण तिच्याकडेही ध्येय, धोरण आणि कृती कार्यक्रम दिसून येत नाही. त्यांच्याकडेही कुठले स्वप्न नाही. मोदींनी निदान स्वप्न तरी दाखविले. अर्थात ही स्वप्ने खोटी  होती; पण राजकारणात स्वप्ने दाखवणे गरजेचे असते, असे यादव म्हणाले.

चेहरा, चरित्र आणि विश्वास याची निवडणुकीत आवश्यकता असते. परंतु मुद्यांशिवाय या निवडणुका लढविण्याचा सत्ताधारी व विरोधी पक्षांचा इरादा दिसतो. पण सत्य, जमिनी या मुद्यांवर निवडणुका झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही ना हिंदू, ना मुसलमान, बस किसान और नौजवान हा नारा देत असल्याचे यादव यांनी जाहीर केले.

अण्णा खंदारे, प्रा. एच. एम. देसरडा, अ‍ॅड. डी. आर. शेळके, सुभाष लोमटे, के. ई. हरदास, अड. अंकुश भालेकर,  प्रा. भारत शिरसाट, प्रा. प्रकाश शिरसाट, ज्ञानप्रकाश मोदाणी,  अ‍ॅड. प्रकाश परांजपे, अली खान, मेजर सुखदेव बन, शेख  खुर्रम, अय्युब खान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवSocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद