शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान : योगेंद्र यादव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 12:31 IST

लोकशाही, विविधतेतील एकता आणि विकास या स्तंभावर पहिल्यांदाच कधी नव्हे एवढा हल्ला करण्यात येत आहे.

ठळक मुद्देभारताच्या स्वधर्मावरील हल्ला परतवून लावासत्य, जमिनी या मुद्यांवर निवडणुका झाल्या पाहिजेत

औरंगाबाद :  ‘हिंदू ना मुसलमान, बस किसान और नौजवान’ असा नारा आज येथे स्वराज इंडियाचे नेते व सुप्रसिद्ध विचारवंत योगेंद्र यादव यांनी दिला व भारताच्या स्वधर्मावर कधी नव्हे एवढा हल्ला चढविण्यात आला असून, तो परतवून लावण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यशवंत कला महाविद्यालयात रात्री ते चळवळीतील कार्यकर्ते व पत्रकारांशी बोलत होते. उद्या दि. २० डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता देवगिरी महाविद्यालयात डॉ. आ. ह. साळुंखे यांचा अमृतमहोत्सवी गौरव समारंभ योगेंद्र यादव यांच्या हस्ते होत आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला यादव यांनी शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांशी हा संवाद साधला.

यादव यांनी सांगितले की, देशावर आज आलेले हे संकट साधारण नाही. भारताच्या स्वधर्मावर मोठा हल्ला होत आहे.भारतीय गणतंत्र वाचविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. लोकशाही, विविधतेतील एकता आणि विकास या स्तंभावर पहिल्यांदाच कधी नव्हे एवढा हल्ला करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर समग्र रणनीती आखण्याची गरज निर्माण झाली आहे. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली धर्माशी नाते सोडून आपण धर्मांधांना धुडगूस घालायला जणू वावच देत आहोत.

आगामी निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला हरवण्याची नितांत गरज आहे. हे आव्हान केवळ निवडणुकांपुरतेच मर्यादित नाही. १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांना हरवणे जसे अगत्याचे होते, तसेच आता नरेंद्र मोदी यांनाही हरवण्याची गरज आहे. मोदी यांच्या विरोधात महाआघाडी बनत आहे. पण तिच्याकडेही ध्येय, धोरण आणि कृती कार्यक्रम दिसून येत नाही. त्यांच्याकडेही कुठले स्वप्न नाही. मोदींनी निदान स्वप्न तरी दाखविले. अर्थात ही स्वप्ने खोटी  होती; पण राजकारणात स्वप्ने दाखवणे गरजेचे असते, असे यादव म्हणाले.

चेहरा, चरित्र आणि विश्वास याची निवडणुकीत आवश्यकता असते. परंतु मुद्यांशिवाय या निवडणुका लढविण्याचा सत्ताधारी व विरोधी पक्षांचा इरादा दिसतो. पण सत्य, जमिनी या मुद्यांवर निवडणुका झाल्या पाहिजेत म्हणून आम्ही ना हिंदू, ना मुसलमान, बस किसान और नौजवान हा नारा देत असल्याचे यादव यांनी जाहीर केले.

अण्णा खंदारे, प्रा. एच. एम. देसरडा, अ‍ॅड. डी. आर. शेळके, सुभाष लोमटे, के. ई. हरदास, अड. अंकुश भालेकर,  प्रा. भारत शिरसाट, प्रा. प्रकाश शिरसाट, ज्ञानप्रकाश मोदाणी,  अ‍ॅड. प्रकाश परांजपे, अली खान, मेजर सुखदेव बन, शेख  खुर्रम, अय्युब खान यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवSocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद