शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोणतेही सरकार, कोणीही प्रधानमंत्री असो, कोणीच संविधान बदलू शकत नाही: नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 20:06 IST

स्मार्ट शहर नव्हे तर खेडी सुद्धा स्मार्ट झाली पाहिजे ही संकल्पना प्रधानमंत्री मोदींची आहे: नितीन गडकरी

सिल्लोड ( छत्रपती संभाजीनगर) : कॉँग्रेस लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहे, भाजप सत्तेत आली तर प्रधानमंत्री मोदी संविधान बदलतील. मात्र, कोणतेही सरकार आले अन् कोणीही प्रधानमंत्री झाले तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील मूलभूत तत्व बदलूच शकत नाही. फक्त 'पार्ट-बी' मध्ये  दुरुस्ती होऊ शकते. त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यामुळे काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी न पडता भाजपचे जालना लोकसभा मतदार संघाचे  उमेदवार रावसाहेब दानवे यांना निवडून द्या असे आवाहन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

सिल्लोड येथे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता नीलम चौकातील जाहीर सभेत ते बोलत होते. गडकरी यांनी काँग्रेसचा समाचार घेतला, काँग्रेसने ८० वेळा चुकीच्या पद्धतीने संविधानाची मोडतोड केली. भाजप सरकार कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र काँग्रेस भाजपवर खोटे आरोप करत आहे. भाजप मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये पाठवतील असे म्हणत आहे. मात्र, त्यात तथ्य नाही देशाचा विकास करणे हाच प्रधानमंत्री मोदी यांचा ध्यास आहे. तरुणांना रोजगार देणे, शेतकरी अन्नदाता सोबत इंधनदाता, ऊर्जादाता कसा होईल यासाठी भाजप सरकार काम करत आहे. स्मार्ट शहर नव्हे तर खेडी सुद्धा स्मार्ट झाली पाहिजे ही संकल्पना प्रधानमंत्री मोदींची आहे, असेही गडकरी म्हणाले.

यावेळी रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार यांची भाषणे झाली. मंचावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अब्दुल समीर, विजय औताडे, इद्रिस मुलतानी, सांडू पा. लोखंडे, भाजप नेते सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोठे,अर्जुन पा गाढे, श्रीराम महाजन, भाजपचे तालुका अध्यक्ष अशोक गरुड, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष देविदास लोखंडे,  मकरंद कोरडे, विनोद मंडलेचा आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :jalna-pcजालनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Nitin Gadkariनितीन गडकरी