शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

कोरोना काळात भूखंड माफिया सुसाट; महापालिकेच्या अतिक्रमण विभागात तक्रारींचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 13:58 IST

मागील पाच महिन्यांपासून  अतिक्रमण हटाव विभागाची यंत्रणा एकदाही रस्त्यावर आली नाही.

ठळक मुद्दे तीन महिन्यात प्राप्त झाल्या ५८५ तक्रारी  मनपाकडून तक्रारींचे अद्याप निरसन नाही

औरंगाबाद : शहर कोरोना विषाणूमुळे त्रस्त असताना काही भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्लॉटिंग पाडून विक्रीही केली. मागील पाच महिन्यांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे, तसेच अनधिकृत बांधकामे करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे मार्च ते जुलै या कालावधीत तब्बल ५८५ तक्रारी प्राप्त झाल्या. महापालिकेने एकाही तक्रारीचे निरसन केले नाही.

शेजाऱ्याच्या जागेवर बांधकाम, दुसऱ्याच्या खुल्या प्लॉटवर बांधकाम, मूळ प्लॉटपेक्षा जास्तीचे बांधकाम, अशा असंख्य तक्रारी मागील पाच महिन्यांत महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाकडे आल्या आहेत. एप्रिल महिन्यात २२ तर मे महिन्यात २१ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मागील पाच महिन्यांपासून  अतिक्रमण हटाव विभागाची यंत्रणा एकदाही रस्त्यावर आली नाही. रविवारपासून बीड बायपासवर अतिक्रमणांवर कारवाई सुरू झाली.

कोविडचे काम प्राधान्याने पाच महिन्यांपासून महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोरोना विषाणूच्या निर्मूलनात व्यस्त आहे. नागरिकांनी अतिक्रमणे, तसेच अनधिकृत प्लॉटिंगबाबत तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने नंतर कारवाई निश्चित होणार आहे. कोविडच्या कामातून थोडीशी उसंत मिळताच अतिक्रमणे काढण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात येईल.- रवींद्र निकम, अतिरिक्त आयुक्त मनपा. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाRevenue Departmentमहसूल विभाग