शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रौत्सवात ना डीजे, ना ढोल; गरबा, दांडियाला नागरिक मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 19:42 IST

शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याची मंडळांची ग्वाही

ठळक मुद्देमंडळांचे यंदा सामाजिक उपक्रम रोजगारावर परिणाम

औरंगाबाद : अधिक मास संपून उद्या शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जसा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, तशीच सार्वजनिक  मंडळे नवरात्रौत्सव प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांची गरबा खेळण्याची ५९ वर्षांची परंपरा यंदा खंडित करावी लागत आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळे ६ ते १० फुटांपेक्षा जास्त देवीची मूर्ती बसवत नसत. यंदा मूर्तीची उंची ४ फूटच ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार रस्त्यावर, कडेला किंवा रिकाम्या जागेत मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात आले आहेत. यंदा नवरात्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे मंडप टाकताना त्याची काळजी घेण्यात आली आहे. मंडपात भाविक व कार्यकर्ते यांच्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोना व शासनाने घालून दिलेल्या अटी, नियमामुळे सार्वजनिक मंडळाची संख्या घटली आहे. काही जुन्या मंडळांनी परंपरा चालून ठेवण्यासाठी देवीची स्थपना करण्याचा निर्णय दोन दिवस अगोदर घेतला आहे. 

मंडळे घेणार खबरदारीशहर व परिसरातील विविध नवरात्रौत्सव मंडळांनी कोरोनाचा संसर्ग टाकण्यासाठी सरकारने दिलेल्या नियमनाचे पालन करण्याचे ठरवले आहे. अनेक ठिकाणी लहान मंडप उभारण्यात आला आहे. जास्तीत जास्त ५ कार्यकर्ते बसतील एवढीच जागा ठेवण्यात आली आहे. दररोज मंडपांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. आरती व भजनासाठी येणाऱ्यांना सॅनिटायझर ठेवण्यात येणार आहे.

मंडळांचे यंदा सामाजिक उपक्रम कोरोनामुळे सरकारने सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना आरोग्य विषयक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मंडळे फक्त देवीची मूर्तीची स्थापणार आहेत. सकाळी व संध्याकाळी देवीची आरती व दुपारी भजन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. काही मंडळे रक्तदान शिबीर घेणार आहेत.

रोजगारावर परिणामनवरात्रौत्सवात कर्णपुरा यात्रेत दीड हजार लोकांना हंगामी रोजगार मिळतो. त्यातून १२ कोटींची उलाढाल होते. यंदा यात्रा रद्द करण्यात आल्याने हा व्यवसाय बुडाला आहे. गरबा व दांडियाच्या आयोजनात ४ ते ५ कोटींची उलाढाल होत असते. ती यंदा होणार नाही.  

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अजूनही धार्मिक स्थळे बंद आहेत. कोरोनामुळे नवरात्रौत्सवात गरबा आयोजनाला परवानगी नाही. विनापरवानगी गरब्याचे आयोजन करणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हे दाखल केले जातील.  -डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

टॅग्स :Navratriनवरात्रीAurangabadऔरंगाबाद