शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

फुकटचे श्रेय नको - मेटे

By admin | Updated: July 14, 2014 01:00 IST

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका तर दूरच; पण ज्यांनी विरोध केला तेच आता सत्कार घेत फिरु लागले आहेत.

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणाची भूमिका तर दूरच; पण ज्यांनी विरोध केला तेच आता सत्कार घेत फिरु लागले आहेत. आरक्षणाचा लढा कोणी दिला हे जनतेला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे फुकटचे श्रेय घेऊ नका... अशा शब्दांत शिवसंग्रामचे अध्यक्ष व आ. विनायक मेटे यांनी नाव न घेता पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला. शिवसंग्रामच्या वतीने रविवारी येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मराठा आरक्षण आभार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. पंकजा मुंडे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, आ. बदामराव पंडित, माजी आ. राजेंद्र जगताप, जनार्दन तुपे, तानाजी शिंदे, जि.प. सदस्य डॉ. शालिनी कराड, बालासाहेब दोडतले, अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, राजेंद्र मस्के यांची उपस्थिती होती. आ. मेटे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षे झुंजावे लागले. गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महायुती स्थापन झाली. लोकसभा निवडणुकीत आघाडी सरकारला जनतेने नाकारले. त्यामुळे त्यांना आरक्षणाचा निर्णय घ्यावा लागला. गोपीनाथराव मुंडे यांनी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली. आरक्षण मिळाल्याचे पहायला ते हवे होते अशी भावना मेटे यांनी व्यक्त केली. मराठा समाजाला स्वतंत्र प्रर्वगात आरक्षण मिळाले आहे ते ओबीसीत मिळाले असते तर केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा झाला असता. आता केंद्रातील आरक्षणाचाही लाभ मिळावा, ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या शेतकऱ्यांना निवृत्तीवेतन मिळावे, अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आता संघर्ष करावा लागणार असल्याचे मेटे म्हणाले. आघाडी सरकारने शिवस्मारकाचा प्रश्न जाणीवपूर्वक रेंगाळत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्ता मिळवता मग त्यांचे स्मारक का उभारत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसंग्राम आता राजकीय पक्षशिवसंग्राम आतापर्यंत सामाजिक संघटना म्हणून काम करत होती. आता महायुतीचा घटकपक्ष म्हणून शिवसंग्राम काम करणार आहे. शिवसंग्राम या नावाने राजकीय पक्षासाठी रजिस्ट्रेशन केले असून लवकरच त्याला मान्यता मिळेल असेही ते म्हणाले.महायुतीचेच सहाही आमदार निवडून आणूलोकसभा निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे यांना अडचणीत आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला;पण विरोध करणारेच उताणे पडले. आता विधानसभा निवडणुकीत महायुतीचेच सहाही आमदार विधानसभेत पाठवून मुंडेंना खरी श्रद्धांजली अर्पण करा, अशी भावनिक साद मेटे यांनी घातली.यावेळी त्यांनी आता आतून एक, बाहेरुन एक काही नाही़ जे करायचे ते उघडपणे, असे सांगून शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचे नाव घेत हातात हात घालून लढाई लढू, असे म्हटले़ मराठा-वंजारा वाद संपला पाहिजे़ हा वाद पेटविणाऱ्यांना ओळखा, असे ते म्हणाले़यावेळी आ़ पंकजा मुंडे म्हणाल्या, मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी भूमिका गोपीनाथराव मुंडे यांनी घेतली होती़ आरक्षणामुळे समाजाच्या विकासाला गती येईल़ धनगर आरक्षणाबरोबरच गोरगरिबांच्या हितासाठी आता लढा देणार असल्याचे त्या म्हणाल्या़ जिल्ह्याच्या रेल्वेसाठी पुरवणी बजेटमध्ये जास्तीत जास्त निधीची मागणी करणार आहे़ महादेव जानकर, तानाजी शिंदे, राजेंद्र मस्के, माजी आ़ जगताप, जनार्दन तुपे, आ़ बदामराव पंडित, डॉ़ रमेश पानसंबळ यांची भाषणे झाली़ आऱ टी़ देशमुख, दिलीप गोरे, सुहास पाटील, आनंद जाधव, सर्जेराव तांदळे, रामहरी मेटे, नितीन कोटेचा, रमेश पोकळे, सचिन कोटूळे उपस्थित होते़ (प्रतिनिधी)गोपीनाथराव मुंडेंच्या आठवणीने गहिवरले सभागृहमहादेव जानकर यांनी आघाडी सरकारवर कडाडून हल्ला चढवला़ आरक्षण देण्यास कोणी हात धरला होता की पेनाची शाई संपली होती असे ते म्हणाले़जानकर यांचे भाषण सुरु असताना आ़ पंकजा मुंडे सभागृहात आल्या़ जानकर यांनी आपल्या भाषणात गोपीनाथराव मुंडे यांचा उल्लेख करताच आ़ पंकजा यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले़ यावेळी संपूर्ण सभागृह मुंडेंच्या आठवणींनी गहिवरले़महायुतीचे सहा आमदार निवडून आणा असे मेटेंनी म्हणताच बदामराव पंडित यांचे काय ? असा प्रश्न कार्यकर्त्यांनी विचारला़ यावर आ़ पंडितांनी स्मितहास्य केले़