शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

मनपा २०० कोटींच्या रस्त्यांचा प्रस्ताव देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:24 IST

शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने आणखी १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. महापालिका पुढील आठवड्यात रस्त्यांची यादीच शासनाकडे सादर करणार आहे. या प्रस्तावात मनपा २०० कोटी रुपयांची मागणी करणार आहे. ७५ कोटी रुपये शासनाने दुसºया टप्प्यात द्यावेत, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्दे१२५ कोटींची घोषणा : दुसऱ्या टप्प्यात ७५ कोटी द्या

औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी महाराष्टÑ शासनाने आणखी १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. महापालिका पुढील आठवड्यात रस्त्यांची यादीच शासनाकडे सादर करणार आहे. या प्रस्तावात मनपा २०० कोटी रुपयांची मागणी करणार आहे. ७५ कोटी रुपये शासनाने दुसºया टप्प्यात द्यावेत, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.जून २०१७ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपये दिले. या निधीतील रस्त्यांची कामे आता सुरू होत आहेत. या कामांचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्र्यांनी आणखी १२५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. ३ जानेवारी रोजी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली होती. मागील २३ दिवसांमध्ये मनपाला रस्त्यांची यादी तयार करता आली नाही. सर्वसाधारण सभेने रस्त्यांची यादी तयार करण्याचे अधिकार महापौर व इतर पदाधिकाºयांना दिले आहेत. सर्व पदाधिकारी बसून यादी तयार करायला तयार नाहीत. शिवसेना-भाजप युतीमधील अंतर्गत वाद याला कारणीभूत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येणाºया आठ दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांकडे यादी सादर करण्यात येणार आहे. यादीत २०० कोटींची मागणी करण्यात येईल.डिफर पेमेंटचे काम लांबणीवरराज्य शासनाने २०० कोटी रुपये देण्यास होकार दिला तर डिफर पेमेंटमधील ७५ कोटींच्या रस्त्यांचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे. १२५ कोटींच्या निधीतून नवीन रस्ते निवडून काम करण्याचा मनोदय मनपा पदाधिकाºयांचा आहे. डिफर पेमेंटची यादी भाजपने तयार केली होती. त्यामध्ये भाजप नगरसेवकांचे सर्वाधिक वॉर्ड आहेत. त्यामुळे या यादीला दुसºया टप्प्यात ठेवण्याचा विचार सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी करीत आहेत.आचारसंहितेचे सावटलोकसभा निवडणुकांसाठी लवकरच आचारसंहिता लागेल, अशी शक्यता आहे. मार्चमध्ये आचारसंहिता सुरू झाल्यास मनपाला निविदा काढता येणार नाहीत. आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य शासनाकडून १२५ आणि ७५ कोटींच्या रस्त्यांची मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर लगेचच निविदा प्रक्रियेला सुरुवात करावी लागणार आहे.सक्षम कार्यकारी अभियंत्याची गरजराज्य शासनाकडून प्राप्त निधीतील रस्त्यांची कामे करण्यासाठी मनपाने स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. यात एक कार्यकारी अभियंता, एक उपअभियंता, प्रकल्प सल्लागार समितीचा समावेश आहे. सक्षम कार्यकारी अभियंता या विभागाला नसल्याने १०० कोटींतील रस्त्यांच्या कामांसाठी प्रचंड विलंब होत आहे.-------------

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा