शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

औरंगाबाद शहरात शुक्रवार, शनिवारी निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:02 IST

पावसाळा सुरू झाला तरी शहरात भीषण पाणीटंचाई सुरूच आहे. मृग नक्षत्राचे दोन आठवडे उलटले तरी पावसाचा थांगपत्ता नाही. त्यातच शुक्रवार २१ जून रोजी महापालिकेने पाणीपुरवठ्यात तब्बल १२ तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार शहरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. खंडण काळात जायकवाडी, फारोळा येथे व्यापक प्रमाणात दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे१२ तासांचे शटडाऊन : मान्सूनपूर्व विविध कामांचा समावेश

औरंगाबाद : पावसाळा सुरू झाला तरी शहरात भीषण पाणीटंचाई सुरूच आहे. मृग नक्षत्राचे दोन आठवडे उलटले तरी पावसाचा थांगपत्ता नाही. त्यातच शुक्रवार २१ जून रोजी महापालिकेने पाणीपुरवठ्यात तब्बल १२ तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार शहरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. खंडण काळात जायकवाडी, फारोळा येथे व्यापक प्रमाणात दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.जायकवाडी, फारोळा येथे मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी किमान १२ तासांचे शटडाऊन द्यावे, अशी विनंती वीज वितरण कंपनीने महापालिकेकडे एप्रिल महिन्यात केली होती. ऐन उन्हाळ्यात मोठे शटडाऊन घेतल्यास शहरात पाण्यासाठी बरीच ओरड होईल, या भीतीने मनपा प्रशासनाने आजपर्यंत शटडाऊनला परवानगी दिली नव्हती. यंदा पावसाळा लांबला आहे. त्यामुळे २१ जून रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. वीज कंपनी जायकवाडी, फारोळा येथे मनपाला २४ तास वीज देण्यासाठी यंत्रणा उभारणार आहे. येथील ३३ के.व्ही. केंद्राचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. वीज कंपनीच्या खंडण काळात महापालिकाही अनेक कामे करणार आहे. ठिकठिकाणी असलेल्या गळत्या थांबविण्यात येणार आहेत. यंत्र सामुग्रीचीही दुरुस्ती या १२ तासांत होणार आहे. दुरुस्तीचे काम शुक्रवारी रात्री उशिरा संपल्यावर जायकवाडी येथून एकानंतर एक पाण्याचा उपसा करणाऱ्या मोटारी सुरूकरण्यात येतील. शहरात पहाटे पाणी येण्यास सुरुवात होईल. शनिवारी दिवसभर पाण्याच्या टाक्या भरण्यात येतील. शक्य झाल्यास काही वसाहतींना याच दिवशी पाणी देण्याचा प्रयत्न प्रशासन करणार असल्याचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी कळविले. रविवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. दोन दिवस औरंगाबादकरांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात