शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

औरंगाबाद शहरात शुक्रवार, शनिवारी निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:02 IST

पावसाळा सुरू झाला तरी शहरात भीषण पाणीटंचाई सुरूच आहे. मृग नक्षत्राचे दोन आठवडे उलटले तरी पावसाचा थांगपत्ता नाही. त्यातच शुक्रवार २१ जून रोजी महापालिकेने पाणीपुरवठ्यात तब्बल १२ तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार शहरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. खंडण काळात जायकवाडी, फारोळा येथे व्यापक प्रमाणात दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे१२ तासांचे शटडाऊन : मान्सूनपूर्व विविध कामांचा समावेश

औरंगाबाद : पावसाळा सुरू झाला तरी शहरात भीषण पाणीटंचाई सुरूच आहे. मृग नक्षत्राचे दोन आठवडे उलटले तरी पावसाचा थांगपत्ता नाही. त्यातच शुक्रवार २१ जून रोजी महापालिकेने पाणीपुरवठ्यात तब्बल १२ तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार शहरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. खंडण काळात जायकवाडी, फारोळा येथे व्यापक प्रमाणात दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.जायकवाडी, फारोळा येथे मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी किमान १२ तासांचे शटडाऊन द्यावे, अशी विनंती वीज वितरण कंपनीने महापालिकेकडे एप्रिल महिन्यात केली होती. ऐन उन्हाळ्यात मोठे शटडाऊन घेतल्यास शहरात पाण्यासाठी बरीच ओरड होईल, या भीतीने मनपा प्रशासनाने आजपर्यंत शटडाऊनला परवानगी दिली नव्हती. यंदा पावसाळा लांबला आहे. त्यामुळे २१ जून रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. वीज कंपनी जायकवाडी, फारोळा येथे मनपाला २४ तास वीज देण्यासाठी यंत्रणा उभारणार आहे. येथील ३३ के.व्ही. केंद्राचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. वीज कंपनीच्या खंडण काळात महापालिकाही अनेक कामे करणार आहे. ठिकठिकाणी असलेल्या गळत्या थांबविण्यात येणार आहेत. यंत्र सामुग्रीचीही दुरुस्ती या १२ तासांत होणार आहे. दुरुस्तीचे काम शुक्रवारी रात्री उशिरा संपल्यावर जायकवाडी येथून एकानंतर एक पाण्याचा उपसा करणाऱ्या मोटारी सुरूकरण्यात येतील. शहरात पहाटे पाणी येण्यास सुरुवात होईल. शनिवारी दिवसभर पाण्याच्या टाक्या भरण्यात येतील. शक्य झाल्यास काही वसाहतींना याच दिवशी पाणी देण्याचा प्रयत्न प्रशासन करणार असल्याचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी कळविले. रविवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. दोन दिवस औरंगाबादकरांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात