शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
5
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
6
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
7
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
8
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
9
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
10
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
11
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
12
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
13
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
14
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
15
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
16
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
17
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
18
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
19
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
20
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!

नव्या पाणी पुरवठा योजनेतून पहिल्या टप्प्यात मिळेल ४५१ एमएलडी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 19:26 IST

नवीन पाणीपुरवठा योजनेचे आयुक्तांनी महानगरपालिकेत केले सादरीकरण 

ठळक मुद्देनक्षत्रवाडीत सर्वात मोठा पाण्याचा एमबीआर दरमहा ८ कोटी विजेचा खर्च

औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजना बाजूला सारून महापालिकेने नवीन पाणीपुरवठा योजना तयार केली आहे. या योजनेचे सादरीकरण पंधरा दिवसांपूर्वी राज्य शासनाकडे करण्यात आले. शासनानेही योजनेला शंभर टक्के अनुदान देण्याचे मान्य केले आहे. आज मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी महापालिकेत पदाधिकारी, नगरसेवकांसमोर योजनेचे सादरीकरण केले. योजनेच्या पहिल्या टप्प्यात ४५१, तर दुसऱ्या टप्प्यात तब्बल ६०४ एमएलडी पाणी शहरात येणार आहे.

२०५० पर्यंत औरंगाबादसह आसपासच्या खेड्यांची लोकसंख्या किमान ३५ ते ४० लाख होणार आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी महापालिकेला मोठी पाणीपुरवठा योजना राबवावी लागेल. २०२० मध्ये नवीन योजना सुरू झाली तरी २०२३ पर्यंत काम पूर्ण होईल. २०५२ पर्यंत योजना सुरळीत राहावी यादृष्टीने डिझाईन तयार करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी आज मनपात सादरीकरण करताना दिली.

नवीन पाणीपुरवठा योजनेत जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत २५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकणे, शहरात २१०० किमीच्या अंतर्गत जलवाहिन्या टाकणे, नक्षत्रवाडी येथे नवीन एमबीआर बनविणे, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे आदी कामांचा समावेश आहे. ही योजना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाईल. पहिला टप्पा पंधरा वर्षांचा राहील. या टप्प्यात शहराला ४५१ एमएलडी पाणी मिळेल. त्यानंतर पुढील पंधरा वर्षांत शहराला ६०४ एमएलडी पाणी मिळेल. १६७३ कोटी योजनेचा प्राथमिक खर्च गृहीत धरण्यात आला आहे. पूर्वी समांतर जलवाहिनी योजना ११०० कोटींची होती. त्यात सातारा-देवळाईचा समावेश नव्हता.

सातारा देवळाईचा समावेशनवीन पाणीपुरवठा योजनेत सातारा देवळाईसह महापालिका हद्दीतील सर्व भागांचा समावेश करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत पालिका हद्दीचे क्षेत्रफळ १७६ वर्ग किमी एवढे आहे. या सर्व भागात एकूण २१०० किमीच्या अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येतील. 

मुख्य जलवाहिनीची किंमत ५३३ कोटीनवीन पाणीपुरवठा योजनेसाठी १६७३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये सर्वाधिक खर्च ५३३ कोटी रुपये मुख्य जलवाहिनीसाठी, २७३ कोटी अंतर्गत जलवाहिन्यांसाठी आणि २५४ कोटी शुद्धीकरण केंद्र व तेथून पुढे जलकुंभापर्यंत जलवाहिन्यांसाठी लागणार आहेत. 

एमजीपीकडून काम करण्यास हरकत नाहीनवीन पाणीपुरवठा योजनेचे काम कोणी करावे हा विषय नागरिकांना पाणी मिळणे गरजेचे आहे. पाणीपुरवठा योजनेवरून शिवसेना-भाजपमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. राज्यमंत्री अतुल सावे यांच्यावर आमचा विश्वास आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले. योजना कोणत्या संस्थेमार्फत राबवायची याचा निर्णय शासन घेईल, महाराष्टÑ जीवन प्राधिकरणकडूनही काम करून घेण्यास काहीच हरकत नाही, असे आयुक्तांनी नमूद केले. 

खासगीकरण नकोपाणीपुरवठा योजनेचे खाजगीकरण अजिबात होणार नाही. योजना पूर्णपणे शासनाच्या निधीतून राबविली जाणार असल्याची ग्वाही आयुक्तांनी दिली. ‘नो नेटवर्क एरिया’सह सातारा-देवळाई, शहराच्या वाढीव भागाला पाणी देण्याची तरतूद योजनेत करण्यात आली आहे, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले. 

नैसर्गिक स्रोत बळकट करानव्या योजनेत हर्सूलसह शहर परिसरातील नैसर्गिक स्रोतांचा विसर पडला आहे. त्यावर महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह माजी महापौर त्र्यंबक तुपे, भगवान घडमोडे, राजू शिंदे, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप यांच्यासह नगरसेवकांनी आक्षेप घेतला व सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. राजेंद्र जंजाळ यांनी नव्या योजनेबद्दल समाधान व्यक्त केले. 

१५ जुलैपर्यंत प्रस्ताव नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार दोन आठवड्यांत ही तांत्रिक मान्यता घेऊन १५ जुलैपर्यंत प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल, असे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले. 

जुनी ५६ एमएलडीची योजना बंद होणारशहराला सध्या पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही योजना जीर्ण झाल्या आहेत. १०० एमएलडी आणि ५६ एमएलडी अशा योजना आहेत. नवीन योजना अस्तित्वात आल्यानंतर ५६ एमएलडीची जुनी योजना बंद करण्यात येणार आहे, तर त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजना आणि १०० एमएलडीची पाणीपुरवठा योजना या दोनच योजना सुरू राहतील.

५०० रुपये पाणीपट्टी शहरात चार हजार रुपये पाणीपट्टी जास्तच वाटते. मात्र, पाणीपट्टी भरण्याचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे पाणीपुरवठा विभागाचा खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही. त्याचा आढावा घेऊन पाणीपट्टी कमी करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केला जाईल. चंदीगडमध्ये वर्षाला केवळ ५०० रुपये पाणीपट्टी असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.

अशी आहे, नवीन योजना

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणParallel Waterline Aurangabadसमांतर जलवाहिनी औरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकार