शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

९५ टक्के प्रवाशांचा आग्रह; ‘जनशताब्दी एक्सप्रेस’च्या आधी पहाटे मुंबईसाठी हवी नवी रेल्वेगाडी

By संतोष हिरेमठ | Updated: November 5, 2023 11:10 IST

प्रवाशांना मिळत नाही आरक्षण, सध्या सुरू असलेल्या रेल्वेची संख्या अपुरी

- संतोष हिरेमठ/सुमेध उघडेछत्रपती संभाजीनगर: मुंबईसाठी छत्रपती संभाजीनगरहून पूर्वीप्रमाणे पहाटे ६ वाजता रेल्वे पाहिजे. जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्याच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन वर्षभरापासून दुर्लक्ष करीत आहे. या रेल्वेची वेळ बदलता येत नसेल तर ‘जनशताब्दी एक्सप्रेस’आधी छत्रपती संभाजीनगरहून पहाटे मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरु केली पाहिजे, असे आग्रही मत ९५ टक्के प्रवाशांनी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात मांडले आहे.

मुंबईसाठी सध्या राज्यराणी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस धावतात. जनशताब्दी एक्स्प्रेस पूर्वी कोरोनापूर्वी पहाटे ६ वाजता छत्रपती संभाजीनगरहून सुटत असे आणि मुंबईत दुपारी एक वाजेपर्यंत पोहोचत असे. त्यामुळे मुंबईतील कामे आटोपून नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसने त्याच दिवशी परतीचा प्रवास प्रवाशांना करता येत असे; परंतु, ही रेल्वे आता छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ९.२० वाजता सुटते आणि दुपारी ४.२० वाजता मुंबईत पोहोचते. त्यातून जनशताब्दी एक्स्प्रेसने मुंबईत गेल्यानंतर मुक्काम केल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेसच्या आधी शहरातून मुंबईसाठी नवीन रेल्वेची आवश्यकता आहे का, यासंदर्भात सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रवाशांचे मत जाणून घेण्यात आले.

सर्वेक्षणात विचारलेले प्रश्न: छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे जाण्यासाठी सध्याच्या रेल्वे पुरेशा आहेत का?- हाेय-० टक्के- नाही-९५.७ टक्के- सांगता येत नाही-४.३ टक्के

छत्रपती संभाजीनगरहून जनशताब्दी एक्स्प्रेसच्या आधी सकाळच्या वेळेत नवीन रेल्वे सुरु व्हावी का?- हाेय-९५.७ टक्के- नाही-० टक्के- सांगता येत नाही-४.३ टक्के

सर्वेक्षणात कोणत्या वयोगटातील प्रवाशांचा सहभाग?- १८ ते ३५ वर्षे- १३ टक्के- ३६ ते ६० वर्षे - ७८.३ टक्के- ६१ ते ७५ वर्षे- ८.७ टक्के

सर्वेक्षणात प्रवाशांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया: - रेल्वे तर आणखी सुरू व्हावी, पण जनरल डब्बेदेखील वाढवावेत.- सकाळी मुंबईसाठी नवीन रेल्वे हवीच- वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करावी.- मुंबईसाठी सकाळी ६ वाजता नव्या रेल्वेची गरज.- मुंबईसाठी आणखी किमान २ रेल्वे तरी पाहिजे. एक सकाळी आणि एक संध्याकाळी.- नांदेड ते मुंबई अजून ४ रेल्वे पाहिजेत.- दिवसातून दोन रेल्वे असाव्यात. एक सकाळी ६ वाजता आणि दुसरी दुपारी १२ वाजता छत्रपती संभाजीनगरहून निघावी. परतीची वेळ दुपारी ३ आणि रात्री ९ वाजेची असावी.- जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदला.- मुळात मराठवाड्यातून मुंबई किंवा नाशिकला जाण्यासाठी कमी रेल्वे आहेत. रेल्वेचे आरक्षण भेटणे अवघड झाले आहे. अगदी आरक्षण असले तरी त्या बोगीत बसायला अवघड होते इतकी गर्दी असते.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन