शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

९५ टक्के प्रवाशांचा आग्रह; ‘जनशताब्दी एक्सप्रेस’च्या आधी पहाटे मुंबईसाठी हवी नवी रेल्वेगाडी

By संतोष हिरेमठ | Updated: November 5, 2023 11:10 IST

प्रवाशांना मिळत नाही आरक्षण, सध्या सुरू असलेल्या रेल्वेची संख्या अपुरी

- संतोष हिरेमठ/सुमेध उघडेछत्रपती संभाजीनगर: मुंबईसाठी छत्रपती संभाजीनगरहून पूर्वीप्रमाणे पहाटे ६ वाजता रेल्वे पाहिजे. जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्याच्या मागणीकडे रेल्वे प्रशासन वर्षभरापासून दुर्लक्ष करीत आहे. या रेल्वेची वेळ बदलता येत नसेल तर ‘जनशताब्दी एक्सप्रेस’आधी छत्रपती संभाजीनगरहून पहाटे मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरु केली पाहिजे, असे आग्रही मत ९५ टक्के प्रवाशांनी ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणात मांडले आहे.

मुंबईसाठी सध्या राज्यराणी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस धावतात. जनशताब्दी एक्स्प्रेस पूर्वी कोरोनापूर्वी पहाटे ६ वाजता छत्रपती संभाजीनगरहून सुटत असे आणि मुंबईत दुपारी एक वाजेपर्यंत पोहोचत असे. त्यामुळे मुंबईतील कामे आटोपून नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसने त्याच दिवशी परतीचा प्रवास प्रवाशांना करता येत असे; परंतु, ही रेल्वे आता छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ९.२० वाजता सुटते आणि दुपारी ४.२० वाजता मुंबईत पोहोचते. त्यातून जनशताब्दी एक्स्प्रेसने मुंबईत गेल्यानंतर मुक्काम केल्याशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेसच्या आधी शहरातून मुंबईसाठी नवीन रेल्वेची आवश्यकता आहे का, यासंदर्भात सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रवाशांचे मत जाणून घेण्यात आले.

सर्वेक्षणात विचारलेले प्रश्न: छत्रपती संभाजीनगरहून मुंबईकडे जाण्यासाठी सध्याच्या रेल्वे पुरेशा आहेत का?- हाेय-० टक्के- नाही-९५.७ टक्के- सांगता येत नाही-४.३ टक्के

छत्रपती संभाजीनगरहून जनशताब्दी एक्स्प्रेसच्या आधी सकाळच्या वेळेत नवीन रेल्वे सुरु व्हावी का?- हाेय-९५.७ टक्के- नाही-० टक्के- सांगता येत नाही-४.३ टक्के

सर्वेक्षणात कोणत्या वयोगटातील प्रवाशांचा सहभाग?- १८ ते ३५ वर्षे- १३ टक्के- ३६ ते ६० वर्षे - ७८.३ टक्के- ६१ ते ७५ वर्षे- ८.७ टक्के

सर्वेक्षणात प्रवाशांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया: - रेल्वे तर आणखी सुरू व्हावी, पण जनरल डब्बेदेखील वाढवावेत.- सकाळी मुंबईसाठी नवीन रेल्वे हवीच- वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करावी.- मुंबईसाठी सकाळी ६ वाजता नव्या रेल्वेची गरज.- मुंबईसाठी आणखी किमान २ रेल्वे तरी पाहिजे. एक सकाळी आणि एक संध्याकाळी.- नांदेड ते मुंबई अजून ४ रेल्वे पाहिजेत.- दिवसातून दोन रेल्वे असाव्यात. एक सकाळी ६ वाजता आणि दुसरी दुपारी १२ वाजता छत्रपती संभाजीनगरहून निघावी. परतीची वेळ दुपारी ३ आणि रात्री ९ वाजेची असावी.- जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदला.- मुळात मराठवाड्यातून मुंबई किंवा नाशिकला जाण्यासाठी कमी रेल्वे आहेत. रेल्वेचे आरक्षण भेटणे अवघड झाले आहे. अगदी आरक्षण असले तरी त्या बोगीत बसायला अवघड होते इतकी गर्दी असते.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन