शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

ऑरिक सिटीत केंद्राच्या धोरणानुसार नवीन उद्योगांना प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 13:22 IST

Auric City पालकमंत्री सुभाष देसाई यांची निती आयोगाचे अमिताभ कांत यांच्याकडे मागणी करणार

ठळक मुद्देऔरंगाबाद-शिर्डी रस्त्याचे काम रस्ते विकास महामंडळाकडे सोपविण्यात येणार आहे.शहरासाठी १६८० कोटींंची नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.

औरंगाबाद : ऑरिक सिटीत केंद्राच्या नवीन औद्योगिक धोरणानुसार मागणी केलेले उद्योग यावेत, अशी मागणी या अगोदरच करण्यात आलेली आहे. आता पुन्हा उद्या निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्याकडे आमचे अधिकारी यासंबंधीची मागणी करणार आहेत, अशी माहिती शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये केंद्र शासन पुरस्कृत इलेक्ट्रॉनिक पार्क, फूड पार्क तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग यावे म्हणून पाठपुरावा करण्यात आला आहे. अमिताभ कांत यांच्याकडे पुन्हा एकदा मागणी करण्यात येणार आहे, तर संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून चार कोटींचा निधी देण्यात आला आहे. लसीकरणासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, २१ जूनपासून केंद्राच्या नवीन धोरणानुसार प्रत्येकाला लस देण्यात येईल. जिल्ह्याचे उद्दिष्ट ३२ लाख ८७ हजार असून, ६ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी ३०० व्हेंटिलेटरसह खाटांची सुविधा करण्यात येत आहे. ११ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येतील. त्यातील ४ सुरू झाले आहेत. खासगी रुग्णालयांच्या बिल प्रकरणी अनेक तक्रारी होत्या. ५७ लेखापरीक्षक नेमून बिलांची तपासणी करण्यात आली. ९७ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. १५ रुग्णालयांनी जास्तीचे बिल वसूल केले होते. त्यांच्याकडून ६५ लाख रुपये वसूल केले. पत्रकार परिषदेला आमदार अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे उपस्थित होते.

नवीन पाणीपुरवठा योजना तीन वर्षांत पूर्ण होणारशहरासाठी १६८० कोटींंची नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. तीन वर्षांत ही योजना पूर्ण होईल. डिसेंबर २०२१ पर्यंत २०, मार्च २०२२ पर्यंत शहरासाठी अतिरिक्त ३० एमएलडी पाणी वाढविण्यात येईल. नवीन योजनेत शहराचा काेणताही भाग पाण्याविना राहणार नाही. खाम नदीपात्रात मनपाकडून सुरू असलेल्या कामाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.

औरंगाबाद-शिर्डीचे रस्त्याचे लवकरच कामऔरंगाबाद-शिर्डी रस्त्याचे काम रस्ते विकास महामंडळाकडे सोपविण्यात येणार आहे. ८८ कि.मी. रस्त्याचे काम झाल्यावर पर्यटक, भाविकांची सोय होईल. औरंगाबाद शहरालाही याचा फायदा होणार आहे. औरंगाबाद-पैठण रस्त्याचे कामाची वर्क ऑर्डर ऑक्टोबरपर्यंत दिली जाईल. नगरनाका ते केंब्रीज १४ कि.मी. रस्ता डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. बीड बायपासचे काम ऑगस्ट २१ मध्ये संपेल. फर्दापूर घाटातील रस्ता डिसेंबरपर्यंत होईल.

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीAurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाई