शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

ऑरिक सिटीत केंद्राच्या धोरणानुसार नवीन उद्योगांना प्राधान्य द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 13:22 IST

Auric City पालकमंत्री सुभाष देसाई यांची निती आयोगाचे अमिताभ कांत यांच्याकडे मागणी करणार

ठळक मुद्देऔरंगाबाद-शिर्डी रस्त्याचे काम रस्ते विकास महामंडळाकडे सोपविण्यात येणार आहे.शहरासाठी १६८० कोटींंची नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे.

औरंगाबाद : ऑरिक सिटीत केंद्राच्या नवीन औद्योगिक धोरणानुसार मागणी केलेले उद्योग यावेत, अशी मागणी या अगोदरच करण्यात आलेली आहे. आता पुन्हा उद्या निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्याकडे आमचे अधिकारी यासंबंधीची मागणी करणार आहेत, अशी माहिती शुक्रवारी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबई-दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये केंद्र शासन पुरस्कृत इलेक्ट्रॉनिक पार्क, फूड पार्क तसेच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग यावे म्हणून पाठपुरावा करण्यात आला आहे. अमिताभ कांत यांच्याकडे पुन्हा एकदा मागणी करण्यात येणार आहे, तर संत एकनाथ रंगमंदिराच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीकडून चार कोटींचा निधी देण्यात आला आहे. लसीकरणासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, २१ जूनपासून केंद्राच्या नवीन धोरणानुसार प्रत्येकाला लस देण्यात येईल. जिल्ह्याचे उद्दिष्ट ३२ लाख ८७ हजार असून, ६ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी ३०० व्हेंटिलेटरसह खाटांची सुविधा करण्यात येत आहे. ११ ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येतील. त्यातील ४ सुरू झाले आहेत. खासगी रुग्णालयांच्या बिल प्रकरणी अनेक तक्रारी होत्या. ५७ लेखापरीक्षक नेमून बिलांची तपासणी करण्यात आली. ९७ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. १५ रुग्णालयांनी जास्तीचे बिल वसूल केले होते. त्यांच्याकडून ६५ लाख रुपये वसूल केले. पत्रकार परिषदेला आमदार अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे उपस्थित होते.

नवीन पाणीपुरवठा योजना तीन वर्षांत पूर्ण होणारशहरासाठी १६८० कोटींंची नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. तीन वर्षांत ही योजना पूर्ण होईल. डिसेंबर २०२१ पर्यंत २०, मार्च २०२२ पर्यंत शहरासाठी अतिरिक्त ३० एमएलडी पाणी वाढविण्यात येईल. नवीन योजनेत शहराचा काेणताही भाग पाण्याविना राहणार नाही. खाम नदीपात्रात मनपाकडून सुरू असलेल्या कामाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.

औरंगाबाद-शिर्डीचे रस्त्याचे लवकरच कामऔरंगाबाद-शिर्डी रस्त्याचे काम रस्ते विकास महामंडळाकडे सोपविण्यात येणार आहे. ८८ कि.मी. रस्त्याचे काम झाल्यावर पर्यटक, भाविकांची सोय होईल. औरंगाबाद शहरालाही याचा फायदा होणार आहे. औरंगाबाद-पैठण रस्त्याचे कामाची वर्क ऑर्डर ऑक्टोबरपर्यंत दिली जाईल. नगरनाका ते केंब्रीज १४ कि.मी. रस्ता डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. बीड बायपासचे काम ऑगस्ट २१ मध्ये संपेल. फर्दापूर घाटातील रस्ता डिसेंबरपर्यंत होईल.

टॅग्स :Auric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीAurangabadऔरंगाबादSubhash Desaiसुभाष देसाई