शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
3
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
4
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
5
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
6
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
7
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
8
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
9
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
10
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
11
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
12
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
13
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
14
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
15
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
16
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
17
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
18
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
19
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
20
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग जगताच्या विकासाला नवी भरारी

By admin | Updated: August 24, 2014 01:49 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद औरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पाच्या कामाने आता वेग घेतला आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबादऔरंगाबाद : दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) प्रकल्पाच्या कामाने आता वेग घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत औरंगाबाद शेंद्रा ते बिडकीन पट्ट्यात भव्य अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे. ही वसाहत एकूण तीन फेजमध्ये उभी राहणार असून, पहिल्या फेजसाठीच्या भूसंपादनाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीच्या उभारणीला लवकरच सुरुवात होऊ शकणार आहे. डीएमआयसीमुळे केवळ औरंगाबादच नाही तर संपूर्ण मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नांमुळे औरंगाबादचा डीएमआयसी प्रकल्पात समावेश झाला. उद्योगमंत्री असताना त्यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील शेंद्रा ते बीडकीन पट्ट्यात तब्बल साडेदहा हजार हेक्टरवर आंतरराष्ट्रीय दर्जाची औद्योगिक वसाहत उभी राहणार आहे. त्यासाठी वर्षभरापासून भूसंपादनाची प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत करमाड येथील ५५५ हेक्टर आणि बिडकीन परिसरातील २,३५१ हेक्टर अशा एकूण २,९०० हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे भूसंपादनाची ही संपूर्ण प्रक्रिया फारसा विरोध न होता पार पडली. तसेच शेतकऱ्यांना जमिनीसाठी एकरी २३ लाख रुपयांचा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाला. आतापर्यंत १,२०० कोटींचा मोबदला डीएमआयसी प्रकल्पामुळे जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहेच; पण त्याआधी भूसंपादनाच्या मोबदल्यापोटीही मोठी रक्कम जिल्ह्यात येणार आहे. डीएमआयसीसाठी आतापर्यंत करमाड आणि बिडकीन येथील २,९०० हेक्टर जमीन संपादित झाली असून, तिच्या मोबदल्याची एकूण रक्कम १,६०० कोटी रुपये एवढी आहे. यापैकी आतापर्यंत करमाड येथे ३०० आणि बिडकीन येथे ९००, अशा एकूण १,२०० कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना वाटपही झाले आहे. शेंद्र्यात ‘स्मार्ट सिटी’डीएमआयसी प्रकल्पांतर्गत शेंद्रा येथे स्मार्ट सिटी उभारण्यात येणार आहे. ही स्मार्ट सिटी सुमारे साडेसहाशे हेक्टरवर उभारली जाणार असून, यामध्ये नागरी व पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हे शहर संपूर्णपणे पर्यावरणपूरक तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोयी-सुविधांनी युक्त असे असेल. त्यासाठी जपानच्या सहा कंपन्यांची मदत घेतली जाणार आहे. ज्यामध्ये संकल्पना व पर्यवेक्षणाचे काम जेजीसी कंपनी करीत आहे, तर पर्यवेक्षण व वॉटर प्लांटचे काम मुत्सुबिशी कॉर्पोरेशन करील. अर्बन प्लानिंग कन्सल्टेशनचे काम निक्कने सिक्केई कंपनी करील. ४माहिती तंत्रज्ञानाची जबाबदारी आयबीएम- जपान या कंपनीवर असेल. वॉटर ट्रीटमेंट प्लांटची जबाबदारी एब्रा इंजिनिअरिंगवर असेल, तर वॉटर कन्सल्टेशनचे काम योकाहामा सिटी ही कंपनी करणार आहे.उद्योजकांना मिळेल भरारीऔरंगाबादेतील उद्योजकांना सध्या फारशा मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. अशा प्रतिकूल परिस्थितीतही येथील उद्योजक जगभरात आपल्या गुणवत्तेच्या बाळावर अधिराज्य गाजवत आहेत. डीएमआयसी प्रकल्प सुरू झाल्यानंतर येथील उद्योजकांना भरारी घेण्यासाठी पंख लावल्यासारखे होईल. आॅटो इंडस्ट्री, औषधी कंपन्या सध्या आघाडीवर आहेत. बीअर कॅपिटल म्हणूनही औरंगाबादकडे बघितले जाते.