शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

नव्या औषधींमुळे मूत्रपिंडरोपण यशस्वी होण्याचे प्रमाण वाढले

By admin | Updated: September 24, 2016 00:30 IST

औरंगाबाद : कमी खर्चात, अधिक परिणामकारक व सुरक्षितपणे करता येईल, यावर तज्ज्ञांनी चर्चा केली.

औरंगाबाद : किडनीतील खड्यांवर लिथोट्रिप्सी, यूआरएस, लेझर अशा विविध प्रकारे उपचार करता येतात. यापैकी कोणत्याही प्रकारचा उपचार कमीत कमी खर्चात, अधिक परिणामकारक व सुरक्षितपणे करता येईल, यावर तज्ज्ञांनी चर्चा केली. नवीन प्रकारच्या औषधींमुळे मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.औरंगाबाद युरॉलॉजी असोसिएशनच्या वतीने आयोजित मूत्ररोग शल्यचिकित्सकांच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी विविध विषयांवर चर्चासत्र पार पडले. विविध उपचार पद्धतींवर आयोजित चर्चासत्रात पुणे येथील डॉ. जयदीप दाते, जामनगर येथील डॉ. उल्हास साठे, सोलापूर येथील डॉ. विजय राघोजी, मुंबई येथील डॉ. लालमलानी, अहमदाबाद येथील डॉ. कंदर पारीख यांनी मार्गदर्शन केले. १५ ते २० टक्के लोकांना मूतखड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते. परंतु अत्याधुनिक दुर्बिण आणि लेझर तंत्रज्ञानामुळे मूतखडा काढणे सोपे झाले आहे. दुर्बिणींचा आकार कमी झाल्यामुळे त्याचा मोठा फायदा होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मूत्रपिंडरोपणावरील चर्चासत्रात डॉ. राजापूरकर नडियाद, डॉ. ओझा, डॉ. ओसवा, डॉ. गणपुले यांचा सहभाग होता. किडनी, मूत्राशय, प्रोस्टेड ग्रंथींच्या कर्करोगावर डॉ. मकरंद कोचीकर यांनी मार्गदर्शन केले. परिषदेत विविध विषयांवर शोधनिबंधही सादर करण्यात आले. त्यातून नवीन संशोधनाचे आदान-प्रदान करण्यात आले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ.पुरुषोत्तम दरख, डॉ.अभय महाजन, डॉ. देवदत्त पळणीटकर, डॉ. विजय दहीफळे व औरंगाबाद युरॉलॉजी असोसिएशनचे सदस्य प्रयत्न करीत आहेत.