शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

नवीन कृषीपंपांना जोडणी मिळेना

By admin | Updated: May 22, 2014 00:32 IST

पालम : तालुक्यातील खडी येथील शेतकर्‍यांनी कृषी पंपांच्या नवीन जोडणीसाठी कोटेशन भरले आहे़

पालम : तालुक्यातील खडी येथील शेतकर्‍यांनी कृषी पंपांच्या नवीन जोडणीसाठी कोटेशन भरले आहे़ परंतु, कोटेशन भरून वर्षभराचा कालावधी लोटला तरीही नवीन जोडणी देण्यात आलेली नाही़ यामुळे शेतकर्‍यांच्या कृषी उत्पादनाला फटका बसत असून, शेतकर्‍यांनी वीज कंपनीकडे तक्रार केलेली आहे़ पालम तालुक्यातील ग्रामीण भागात कृषीपंपांना वीज जोडणी मिळावी यासाठी शेतकरी वर्गाने कोटेशन भरलेले आहे़ वीज चोरीविरूद्ध कारवाई करणार्‍या कंपनीला नवीन जोडणी देण्यासाठी वेळ मिळालेला नाही़ वीज कंपनीकडून वेळेत वीजजोडणी न दिल्याने शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे़ ग्रामीण भागातील ग्राहकांच्या मागणीकडे वीज कंपनीचे अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत़ नवीन वीज जोडणी देणे, नवीन विद्युत लाईन बसविणे, रोहित्र बसविणे, बिघाडांची दुरुस्ती करणे याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जात आहे़ विशेषत: वीज कंपनीकडून शेतकर्‍यांची नेहमीच या ना त्या कारणाने अडवणूक केली जात आहे़ शेतकर्‍यांना कोणी वाली नसल्याने अधिकारी शेतकर्‍यांशी हुज्जत घालत आहेत़ खडी येथे कृषीपंपांना जोडणी मिळावी, यासाठी शेतकर्‍यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे़ कागदपत्र व रक्कम भरून कोटेशन घेतले आहे़ परंतु, या शेतकर्‍यांच्या जोडणीकडे दुर्लक्ष केले जात आहे़ वर्षभरापासून शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना जोडणी देण्यासाठी पुरेसा वेळ कर्मचार्‍यांना मिळेला नाही़ याउलट नवीन जोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकर्‍यांना मात्र लवकर जोडणी देण्यात आली आहे़ शेतकरी या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी पालम येथील कार्यालयात आले होते़ कार्यालयात प्रमुख अधिकारी हजर नसल्याने परत जाण्याची वेळ शेतकर्‍यांवर येत आहे़ वीज कंपनीच्या प्रमुख अधिकार्‍यांच्या कक्षाला नेहमीच टाळे दिसत असल्याने तक्रारी करण्यासाठी येणार्‍या शेतकरी व ग्राहकांना कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागत आहेत़ (प्रतिनिधी)