शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ना दहावा-तेरावा, ना पिंडदान; कोरोनामुळे इथे माणुसकी आणि नात्यांची झाली राख...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:56 IST

कोरोनाने कुुटुंबापासून तोडून अवेळी या जगाचा निरोप घेण्यास भाग पाडले आणि मृत्यूनंतर नातेवाईकांनीही भीतीपोटी स्मशानातच ठेवले, असाच प्रकार सध्या घडतो आहे.

ठळक मुद्देमृतदेहाच्या अस्थी स्मशानातच पडूनसुरक्षासाधने स्मशानभूमीतच पडून 

- विकास राऊत 

औरंगाबाद : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर  शहरातील विविध भागांतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर काही मृतांची राख सावडली नाही, अस्थी विसर्जनही केले नाही. शिवाय दहावा, तेरावा आणि पिंडदानही झाले नाही. स्मशानजोगींना मृतदेहांच्या अस्थी, राख जतन करावी लागते आहे. कोरोनामुळे माणुसकी आणि नात्यांची राख झाल्याचे वैषम्यपूर्ण चित्र दिसू लागले आहे.  

कोरोनाने कुुटुंबापासून तोडून अवेळी या जगाचा निरोप घेण्यास भाग पाडले आणि मृत्यूनंतर नातेवाईकांनीही भीतीपोटी स्मशानातच ठेवले, असाच प्रकार सध्या घडतो आहे.  कोरोनामुळे  ज्यांचा बळी गेला त्यांच्यापैकी काही पार्थिवांवर मुकुंदवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतरच्या विधीविना त्या पार्थिवांच्या अस्थी व राख स्मशानातच पडून आहे. स्मशानजोगींनी नातेवाईकांना फोन करून राख विसर्जित करण्यासाठी घेऊन जा, हे सांगण्यासाठी संपर्क केला असता अनेकांनी राख नेण्यास नकार दिला. एक-दोन नातेवाईक आले, त्यांनी ती राख स्मशानभूमीतच एका बाजूला फेकून दिली. काही मृतदेहांची राख आम्हालाच विसर्जित करा म्हणून सांगण्यात आले, तर काहींनी तुम्ही आणि महापालिका याबाबत काय निर्णय घ्यायचा ते ठरवा, असे सांगून हात झटकले. शेवटी  माणुसकी म्हणून आम्हीच मृतदेहाच्या अस्थी, राख भरून ठेवली आहे. त्यावर मृताचे नाव टाकले आहे, अशी माहिती  शहरातील एका स्मशानभूमीतील स्मशानजोगीने दिली. 

स्मशानातही माणसेच राहतात पुंडलिकनगर, संजयनगर येथील कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहावर बेगमपुरा व इतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्यात आल्यानंतर मुकुंदवाडी स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत रुग्णवाहिनीतून मृतदेह आणला जातो. अंत्यसंस्कारानंतर आरोग्य कर्मचारी सुरक्षासाधने स्मशानभूमीतच फेकून देतात. स्मशानात माणसे राहतात, याचा ते विचारही करीत नाहीत. स्मशानजोगींना दिलेली सुरक्षासाधने कमी आहेत. कोरोनाग्रस्त मृतदेहावर अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमी सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे. जास्तीच्या पीपीई कीट प्रत्येक स्मशानजोगीकडे  देण्यात याव्यात. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह केव्हा आणणार, याबाबत काहीही माहिती नसते, अचानक रुग्णवाहिनी येते आणि धावपळ सुरू होते, असे एका स्मशानजोगीने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू