शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
8
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
9
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
10
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
11
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
12
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
13
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
14
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
15
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
16
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
17
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
18
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
19
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)
20
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

विद्यापीठाच्या विकासासाठी प्रशासनात सकारात्मक बदलाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 19:56 IST

विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती झाल्यापासून मागील आठ महिन्यांत त्यांनी प्रशासनावर चांगलाच वचक निर्माण केला होता.

- राम शिनगारे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केलेले विविध प्रश्न, समस्यांमध्ये प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची दिरंगाई, कामचुकारपणा प्रकर्षाने समोर आला. व्यवस्थापन परिषद, कुलगुरूंनी निर्णय घेतल्यानंतरही त्याची योग्यपणे अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे विद्यापीठाचा वेगाने विकास करण्यासाठी प्रशासनात सकारात्मक बदल केल्याशिवाय पर्याय नसल्याचेही स्पष्ट झाले.

विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. प्रमोद येवले यांची नियुक्ती झाल्यापासून मागील आठ महिन्यांत त्यांनी प्रशासनावर चांगलाच वचक निर्माण केला होता. सुरुवातीलाच एका उपकुलसचिवाची बदली उस्मानाबाद उपकेंद्रात केल्यानंतर अनेक कर्मचारी, अधिकारी वेळेवर कामे करू लागली होती. मात्र मागील दोन-तीन महिन्यांपासून ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होत आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होते की नाही, यावर देखरेख करण्याचे काम हे कुलसचिवांचे असते. व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्यार्थी कल्याण मंडळ आदी अधिकार मंडळांत कुलसचिव वा सचिव असतात. त्यांच्या नियंत्रणात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाते. मात्र, विद्यमान कुलसचिवांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे अधिसभेच्या बैठकीत दिसून आले. व्यवस्थापन परिषदेत घेतलेल्या निर्णयाची, स्थापन केलेल्या समितीची पत्रेही कुलसचिव कार्यालयाकडून संबंधितांना पोहोचली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला.

उच्चशिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या तैलचित्र अनावरण कार्यक्रमाच्या पत्रिकाच छापण्यात आल्या नाहीत. यात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असतील, मात्र अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्यांना याची माहिती कळविणे आवश्यक होते. याबाबत दिरंगाई झाल्याचे दिसून आले. याशिवाय इतर काही प्रकरणांत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कुलगुरूंना सदस्यांच्या आक्रमकतेपुढे माघार घ्यावी लागली. तरीही कुलगुरूंनी प्रशासनाला उघडे पडू दिले नाही. प्रशासनाची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. असे असले तरीही कुलगुरूंना प्रशासनातील कामचुकारांचा बचाव अधिक दिवस करता येणार नाही. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारावाच लागेल. यासाठी कुलसचिव सक्षम असणे गरजेचे आहे. या पदाच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. प्रशासनाची माहिती आणि अनुभवी व्यक्तीची निवड करण्याचे आव्हान कुलगुरूंपुढे असणार आहे. ही निवड करताना राज्य शासनासह विविध गटांचा दबाव झुगारण्याचीही गरज आहे. त्याशिवाय गुणवत्तेला प्राधान्य देता येणार नाही. यात कुलगुरू किती यशस्वी होतात ते निवडींवरून स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रProfessorप्राध्यापक