शहरं
Join us  
Trending Stories
1
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
2
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
3
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
4
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
5
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
6
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
7
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
8
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
9
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप
10
AUS vs IND 2nd ODI LIVE Streaming : टीम इंडियासाठी 'करो वा मरो'ची लढत! कशी पाहता येईल ही मॅच?
11
इंडिगो विमानाची वाराणसीत इमर्जन्सी लँडिंग, इंधनगळती झाल्याचे उघड, सर्व प्रवासी सुरक्षित
12
'आम्ही आमची धोरणं ठरवू; अमेरिकेवर अवलंबून राहण्याची गरज नाही', नेतन्याहूंची स्पष्टोक्ती
13
गे जोडीदाराने केला मित्राच्याच ६ वर्षांच्या लेकीवर बलात्कार, संतप्त पित्याने घेतला भयंकर बदला
14
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
15
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
16
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
17
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
18
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
19
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
20
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले

शहरातून मुंबईसाठी नव्या विमानसेवेची गरज स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 19:06 IST

पहिल्याच दिवशी १३० प्रवासी रवाना

ठळक मुद्दे सात दिवसांसाठी विमान

औरंगाबाद : हज यात्रेकरूंच्या परतीच्या प्रवासाच्या निमित्ताने एअर इंडियाकडून ७ दिवसांसाठी चालविण्यात येणाऱ्या औरंगाबाद-मुंबई विमानाला रविवारी (दि. १) पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या विमानाने १३० प्रवासी मुंबईला गेले. त्यामुळे शहरातून मुंबईसाठी नव्या विमानाची किती गरज आहे, हे समोर आले आहे.

हज यात्रेनिमित्त एअर इंडियाकडून ७ दिवसांसाठी दिल्ली-औरंगाबाद विमानसेवा चालविण्यात आली होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता यात्रेकरूंच्या परतीच्या प्रवासामुळे १ सप्टेंबरपासून ७ दिवसांसाठी एअर इंडियाकडून औरंगाबाद- मुंबई विमानसेवा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. १ सप्टेंबरनंतर आता ४ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३०, ५ सप्टेंबर रोजी पहाटे २.०५ वा., ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४५ वा., ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३५ वा., ८ व ९ सप्टेंबर रोजी सकाळी ५.३५ वाजता हे विमान राहील. 

या विमानसेवेच्या पहिल्याच दिवशी रविवारी १३० प्रवासी मुंबईला गेले. दुसऱ्या उड्डाणासाठी म्हणजे ४ सप्टेंबरला ७७ प्रवाशांची बुकिंग झालेली आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जेट एअरवेजच्या विमानसेवेमुळे औरंगाबादला सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत मुंबईची हवाई कनेक्टिव्हिटी होती. आता मुंबईसाठी एकमेव एअर इंडियाच्या विमानाचा आधार आहे. तेदेखील सायंकाळी. एकाच विमानामुळे अधिकच्या तिकिटदरालाही प्रवाशांना सामोरे जावे लागते. एअर इंडियाकडून १६ आॅक्टोबरपासून मुंबई - औरंगाबाद -उदयपूर अशी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा चालविण्यात येणार आहे. यामुळे उदयपूरसह मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. या विमानसेवेबरोबर मुंबईसाठी दररोज आणखी विमानसेवेची गरज असल्याचे सात दिवसांच्या विमानसेवेवरून स्पष्ट होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

‘इंडिगो’कडे लक्षइंडिगोने औरंगाबादहून विमानसेवा सुरूकरण्याची तयारी केली आहे. ‘इंडिगो’च्या कार्यालयासाठी प्राधिकरणाने जागा दिली असून, तेथे कार्यालय उभारणीचे काम सुरू आहे. या कंपनीकडून नेमकी कोणत्या शहरासाठी विमानसेवा सुरूकेली जाते, याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :airplaneविमानAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळpassengerप्रवासी