शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
2
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
3
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
4
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
5
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
6
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
7
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
8
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
9
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
10
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
12
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
13
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
14
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
15
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
16
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
17
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
18
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
19
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
20
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून मुंबईसाठी नव्या विमानसेवेची गरज स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 19:06 IST

पहिल्याच दिवशी १३० प्रवासी रवाना

ठळक मुद्दे सात दिवसांसाठी विमान

औरंगाबाद : हज यात्रेकरूंच्या परतीच्या प्रवासाच्या निमित्ताने एअर इंडियाकडून ७ दिवसांसाठी चालविण्यात येणाऱ्या औरंगाबाद-मुंबई विमानाला रविवारी (दि. १) पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या विमानाने १३० प्रवासी मुंबईला गेले. त्यामुळे शहरातून मुंबईसाठी नव्या विमानाची किती गरज आहे, हे समोर आले आहे.

हज यात्रेनिमित्त एअर इंडियाकडून ७ दिवसांसाठी दिल्ली-औरंगाबाद विमानसेवा चालविण्यात आली होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता यात्रेकरूंच्या परतीच्या प्रवासामुळे १ सप्टेंबरपासून ७ दिवसांसाठी एअर इंडियाकडून औरंगाबाद- मुंबई विमानसेवा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. १ सप्टेंबरनंतर आता ४ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३०, ५ सप्टेंबर रोजी पहाटे २.०५ वा., ६ सप्टेंबर रोजी सकाळी ८.४५ वा., ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३५ वा., ८ व ९ सप्टेंबर रोजी सकाळी ५.३५ वाजता हे विमान राहील. 

या विमानसेवेच्या पहिल्याच दिवशी रविवारी १३० प्रवासी मुंबईला गेले. दुसऱ्या उड्डाणासाठी म्हणजे ४ सप्टेंबरला ७७ प्रवाशांची बुकिंग झालेली आहे, अशी माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जेट एअरवेजच्या विमानसेवेमुळे औरंगाबादला सकाळी आणि सायंकाळच्या वेळेत मुंबईची हवाई कनेक्टिव्हिटी होती. आता मुंबईसाठी एकमेव एअर इंडियाच्या विमानाचा आधार आहे. तेदेखील सायंकाळी. एकाच विमानामुळे अधिकच्या तिकिटदरालाही प्रवाशांना सामोरे जावे लागते. एअर इंडियाकडून १६ आॅक्टोबरपासून मुंबई - औरंगाबाद -उदयपूर अशी आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा चालविण्यात येणार आहे. यामुळे उदयपूरसह मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. या विमानसेवेबरोबर मुंबईसाठी दररोज आणखी विमानसेवेची गरज असल्याचे सात दिवसांच्या विमानसेवेवरून स्पष्ट होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

‘इंडिगो’कडे लक्षइंडिगोने औरंगाबादहून विमानसेवा सुरूकरण्याची तयारी केली आहे. ‘इंडिगो’च्या कार्यालयासाठी प्राधिकरणाने जागा दिली असून, तेथे कार्यालय उभारणीचे काम सुरू आहे. या कंपनीकडून नेमकी कोणत्या शहरासाठी विमानसेवा सुरूकेली जाते, याकडे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :airplaneविमानAurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळpassengerप्रवासी