शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

विम्याचे पैसे, शिष्यवृत्ती घरकुल हवीय? पण हंगामी कामगार म्हणून नोंद केलीय का?

By साहेबराव हिवराळे | Updated: December 27, 2023 20:36 IST

‘हंगामी कामगार’ म्हणून जी नोंदणी असते, ती ‘नोंदणी’ शासनदरबारी असते. ती दरवर्षी करावीच लागते.

छत्रपती संभाजीनगर : हंगामी कामगारांना विविध योजनांपासून दूर राहावे लागत आहे. यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर असून अधिकृत नोंदणी करूनही आम्हाला त्या योजनांचा फायदा मिळत नसल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल या हंगामी कामगारांनी केला आहे.

कोणकोणत्या योजनांचा समावेश आहे?हंगामी कामगारांसाठी अपघात विमा, घरकुल योजना, मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना, आदी या योजना आहेत. या योजनांचे विविध फायदे, सवलती हंगामी कामगारांना मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.

कुटुंबीयांतूनही नाराजी‘हंगामी कामगार’ म्हणून जी नोंदणी असते, ती ‘नोंदणी’ शासनदरबारी असते. ती दरवर्षी करावीच लागते. ही नोंदणी ऑनलाइन किंवा ऑफलाइन करणे आवश्यक आहे; परंतु काही कारणाने ही नोंदणी झाली नाही की योजनांच्या फायद्यापासून वंचित राहावे लागते. अपघात विमा योजना ही खरे तर हंगामी कामगारांसाठी योग्य, अचूक आणि फायदेशीर योजना आहे. त्यासंबंधी तरी फायदा व्हावा असे कुटुंबीयांना वाटत असते; पण या योजनेच्या फायद्यांपासूनही वंचित राहावे लागते; कारण हंगामी कामगार म्हणून नोंद नसते. विमा योजनेत काम करताना अपघात झाल्यास विम्याचे २ लाख रुपये मिळत असतात; पण कागदपत्रांची पूर्तता नसल्याने या योजनेत नावनोंदणी करूनही फायदा होत नाही.

पुनर्नाेंदणी का नाही?- एकदा नोंदणी झाली की काम नसल्यास कामगार गावाकडे निघून जाणे.- दरवर्षी नोंदणी करावी लागतेच हे माहीत नसणे.- नोंदणी करताना आलेल्या जाचक अटी व नियमांची पूर्तता करता-करता नाकी नऊ येणे.- दुष्काळाच्या सावटामुळे खेड्यात गेलेल्या कामगारांना शेतावरून ‘मजूर’ पुन्हा शहरात परतले असले तरी पुन्हा नोंदणी न झाल्यामुळेही कामगार उपायुक्त मंडळाकडून मिळणाऱ्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.

अर्ज का टाळले जातात?वेळेच्या आत दरवर्षी पुनर्नाेंदणी करणे आवश्यक आहे. सर्व योजनांचा फायदा होऊ शकतो. विमा, शिष्यवृत्ती किंवा तत्सम कुठलीही योजना असो; हंगामी कामगार म्हणून नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. याशिवाय विमा असलेल्या तारखेत अपघात घडला असल्यास तो प्रामुख्याने मंजूर केला जातो. अपघात बांधकामावरच झालेला असावा अन्यथा तो निकषांत बसत नसल्याने तो डावलला जातो.- जी. बी. बोरसे, सहायक आयुक्त

पेंडिंग असलेले क्लेम मंजूर करावेतशहर व परिसरात अपघातादरम्यान झालेल्या घटनांतही मजुरांना त्यांचा विमा क्लेम मिळत नाही. अनेकदा कार्यालयात फेऱ्या मारूनही कर्मचारी अपुऱ्या संख्येमुळे तो डावलण्यात येतो. अधिकाऱ्यांना कळवूनही ते दुर्लक्ष करतात; त्यामुळे मजुरांच्या कुटुंबीयांना वंचित राहावे लागते.- प्रेम चव्हाण, कामगार नेते

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद