शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

विम्याचे पैसे, शिष्यवृत्ती घरकुल हवीय? पण हंगामी कामगार म्हणून नोंद केलीय का?

By साहेबराव हिवराळे | Updated: December 27, 2023 20:36 IST

‘हंगामी कामगार’ म्हणून जी नोंदणी असते, ती ‘नोंदणी’ शासनदरबारी असते. ती दरवर्षी करावीच लागते.

छत्रपती संभाजीनगर : हंगामी कामगारांना विविध योजनांपासून दूर राहावे लागत आहे. यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर असून अधिकृत नोंदणी करूनही आम्हाला त्या योजनांचा फायदा मिळत नसल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल या हंगामी कामगारांनी केला आहे.

कोणकोणत्या योजनांचा समावेश आहे?हंगामी कामगारांसाठी अपघात विमा, घरकुल योजना, मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना, आदी या योजना आहेत. या योजनांचे विविध फायदे, सवलती हंगामी कामगारांना मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.

कुटुंबीयांतूनही नाराजी‘हंगामी कामगार’ म्हणून जी नोंदणी असते, ती ‘नोंदणी’ शासनदरबारी असते. ती दरवर्षी करावीच लागते. ही नोंदणी ऑनलाइन किंवा ऑफलाइन करणे आवश्यक आहे; परंतु काही कारणाने ही नोंदणी झाली नाही की योजनांच्या फायद्यापासून वंचित राहावे लागते. अपघात विमा योजना ही खरे तर हंगामी कामगारांसाठी योग्य, अचूक आणि फायदेशीर योजना आहे. त्यासंबंधी तरी फायदा व्हावा असे कुटुंबीयांना वाटत असते; पण या योजनेच्या फायद्यांपासूनही वंचित राहावे लागते; कारण हंगामी कामगार म्हणून नोंद नसते. विमा योजनेत काम करताना अपघात झाल्यास विम्याचे २ लाख रुपये मिळत असतात; पण कागदपत्रांची पूर्तता नसल्याने या योजनेत नावनोंदणी करूनही फायदा होत नाही.

पुनर्नाेंदणी का नाही?- एकदा नोंदणी झाली की काम नसल्यास कामगार गावाकडे निघून जाणे.- दरवर्षी नोंदणी करावी लागतेच हे माहीत नसणे.- नोंदणी करताना आलेल्या जाचक अटी व नियमांची पूर्तता करता-करता नाकी नऊ येणे.- दुष्काळाच्या सावटामुळे खेड्यात गेलेल्या कामगारांना शेतावरून ‘मजूर’ पुन्हा शहरात परतले असले तरी पुन्हा नोंदणी न झाल्यामुळेही कामगार उपायुक्त मंडळाकडून मिळणाऱ्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.

अर्ज का टाळले जातात?वेळेच्या आत दरवर्षी पुनर्नाेंदणी करणे आवश्यक आहे. सर्व योजनांचा फायदा होऊ शकतो. विमा, शिष्यवृत्ती किंवा तत्सम कुठलीही योजना असो; हंगामी कामगार म्हणून नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. याशिवाय विमा असलेल्या तारखेत अपघात घडला असल्यास तो प्रामुख्याने मंजूर केला जातो. अपघात बांधकामावरच झालेला असावा अन्यथा तो निकषांत बसत नसल्याने तो डावलला जातो.- जी. बी. बोरसे, सहायक आयुक्त

पेंडिंग असलेले क्लेम मंजूर करावेतशहर व परिसरात अपघातादरम्यान झालेल्या घटनांतही मजुरांना त्यांचा विमा क्लेम मिळत नाही. अनेकदा कार्यालयात फेऱ्या मारूनही कर्मचारी अपुऱ्या संख्येमुळे तो डावलण्यात येतो. अधिकाऱ्यांना कळवूनही ते दुर्लक्ष करतात; त्यामुळे मजुरांच्या कुटुंबीयांना वंचित राहावे लागते.- प्रेम चव्हाण, कामगार नेते

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद