शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

विम्याचे पैसे, शिष्यवृत्ती घरकुल हवीय? पण हंगामी कामगार म्हणून नोंद केलीय का?

By साहेबराव हिवराळे | Updated: December 27, 2023 20:36 IST

‘हंगामी कामगार’ म्हणून जी नोंदणी असते, ती ‘नोंदणी’ शासनदरबारी असते. ती दरवर्षी करावीच लागते.

छत्रपती संभाजीनगर : हंगामी कामगारांना विविध योजनांपासून दूर राहावे लागत आहे. यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर असून अधिकृत नोंदणी करूनही आम्हाला त्या योजनांचा फायदा मिळत नसल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल या हंगामी कामगारांनी केला आहे.

कोणकोणत्या योजनांचा समावेश आहे?हंगामी कामगारांसाठी अपघात विमा, घरकुल योजना, मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना, आदी या योजना आहेत. या योजनांचे विविध फायदे, सवलती हंगामी कामगारांना मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.

कुटुंबीयांतूनही नाराजी‘हंगामी कामगार’ म्हणून जी नोंदणी असते, ती ‘नोंदणी’ शासनदरबारी असते. ती दरवर्षी करावीच लागते. ही नोंदणी ऑनलाइन किंवा ऑफलाइन करणे आवश्यक आहे; परंतु काही कारणाने ही नोंदणी झाली नाही की योजनांच्या फायद्यापासून वंचित राहावे लागते. अपघात विमा योजना ही खरे तर हंगामी कामगारांसाठी योग्य, अचूक आणि फायदेशीर योजना आहे. त्यासंबंधी तरी फायदा व्हावा असे कुटुंबीयांना वाटत असते; पण या योजनेच्या फायद्यांपासूनही वंचित राहावे लागते; कारण हंगामी कामगार म्हणून नोंद नसते. विमा योजनेत काम करताना अपघात झाल्यास विम्याचे २ लाख रुपये मिळत असतात; पण कागदपत्रांची पूर्तता नसल्याने या योजनेत नावनोंदणी करूनही फायदा होत नाही.

पुनर्नाेंदणी का नाही?- एकदा नोंदणी झाली की काम नसल्यास कामगार गावाकडे निघून जाणे.- दरवर्षी नोंदणी करावी लागतेच हे माहीत नसणे.- नोंदणी करताना आलेल्या जाचक अटी व नियमांची पूर्तता करता-करता नाकी नऊ येणे.- दुष्काळाच्या सावटामुळे खेड्यात गेलेल्या कामगारांना शेतावरून ‘मजूर’ पुन्हा शहरात परतले असले तरी पुन्हा नोंदणी न झाल्यामुळेही कामगार उपायुक्त मंडळाकडून मिळणाऱ्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.

अर्ज का टाळले जातात?वेळेच्या आत दरवर्षी पुनर्नाेंदणी करणे आवश्यक आहे. सर्व योजनांचा फायदा होऊ शकतो. विमा, शिष्यवृत्ती किंवा तत्सम कुठलीही योजना असो; हंगामी कामगार म्हणून नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. याशिवाय विमा असलेल्या तारखेत अपघात घडला असल्यास तो प्रामुख्याने मंजूर केला जातो. अपघात बांधकामावरच झालेला असावा अन्यथा तो निकषांत बसत नसल्याने तो डावलला जातो.- जी. बी. बोरसे, सहायक आयुक्त

पेंडिंग असलेले क्लेम मंजूर करावेतशहर व परिसरात अपघातादरम्यान झालेल्या घटनांतही मजुरांना त्यांचा विमा क्लेम मिळत नाही. अनेकदा कार्यालयात फेऱ्या मारूनही कर्मचारी अपुऱ्या संख्येमुळे तो डावलण्यात येतो. अधिकाऱ्यांना कळवूनही ते दुर्लक्ष करतात; त्यामुळे मजुरांच्या कुटुंबीयांना वंचित राहावे लागते.- प्रेम चव्हाण, कामगार नेते

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद