शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

ना.धों. महानोरांचा निर्णय अन् मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकांच्या सन्मान होऊ लागला

By राम शिनगारे | Updated: August 4, 2023 11:26 IST

नरहर कुरुंदकर यांच्या नावाने मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकास पुरस्कार देण्यास सुरुवात केली.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लेखकांना देशपातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत होते; मात्र मराठवाड्यातील साहित्यातील सर्वोच्च संस्था असलेली मराठवाडासाहित्य परिषद कोणत्याही साहित्यिकांचा सन्मान करीत नव्हती. ना.धों. महानोर हे ‘मसाप’चे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नरहर कुरुंदकर यांच्या नावाने मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकास पुरस्कार देण्यास सुरुवात केली. या पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरले व्यासंगी पत्रकार अनंत भालेराव व कवयित्री अनुराधा पाटील. हा निर्णय महानोर यांच्याच कार्यकारिणीने घेतला होता.

अंबाजोगाई येथे साहित्य संमेलन झाल्यानंतर अडचणीच्या प्रसंगामुळे ना.धों. महानाेर यांना ‘मसाप’चे अध्यक्षपद स्वीकारावे लागले होते. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ‘मसाप’मध्ये अनेक बदल घडवून आणले. सुरुवातीलाच त्यांनी मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकांचा सन्मान करण्यासाठी पुरस्कारांची सुरुवात केली. त्याशिवाय महानोरांच्या काळात ‘मसाप’च्या मुख्य कार्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने भव्यदिव्य सभागृहाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या जमवाजमवीला सुरुवात केली. त्यातून सभागृहाची पायाभरणी झाली.

पुढे या सभागृहाचे काम विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले. आज हे सभागृह साहित्याच्या प्रत्येक कार्यक्रमाचे साक्षीदार ठरत आहेत. त्याची सुरुवात महानोरांनीच केली. अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मराठवाडा साहित्य परिषदेच्या विकासामध्ये योगदान दिले. शासनदरबारी आवश्यक मदतीसाठी पाठपुरावा केला. महानोरांनी सुरू केलेल्या पुरस्कारानंतर ‘मसाप’तर्फे विविध पुरस्कार देण्याची परंपराही सुरू झाली. ही परंपरा अद्यापही कायम आहे. उलट त्यात भरच घालण्यात आली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाmarathiमराठी