शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

ना.धों. महानोरांचा निर्णय अन् मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकांच्या सन्मान होऊ लागला

By राम शिनगारे | Updated: August 4, 2023 11:26 IST

नरहर कुरुंदकर यांच्या नावाने मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकास पुरस्कार देण्यास सुरुवात केली.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लेखकांना देशपातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत होते; मात्र मराठवाड्यातील साहित्यातील सर्वोच्च संस्था असलेली मराठवाडासाहित्य परिषद कोणत्याही साहित्यिकांचा सन्मान करीत नव्हती. ना.धों. महानोर हे ‘मसाप’चे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नरहर कुरुंदकर यांच्या नावाने मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकास पुरस्कार देण्यास सुरुवात केली. या पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरले व्यासंगी पत्रकार अनंत भालेराव व कवयित्री अनुराधा पाटील. हा निर्णय महानोर यांच्याच कार्यकारिणीने घेतला होता.

अंबाजोगाई येथे साहित्य संमेलन झाल्यानंतर अडचणीच्या प्रसंगामुळे ना.धों. महानाेर यांना ‘मसाप’चे अध्यक्षपद स्वीकारावे लागले होते. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ‘मसाप’मध्ये अनेक बदल घडवून आणले. सुरुवातीलाच त्यांनी मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकांचा सन्मान करण्यासाठी पुरस्कारांची सुरुवात केली. त्याशिवाय महानोरांच्या काळात ‘मसाप’च्या मुख्य कार्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने भव्यदिव्य सभागृहाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या जमवाजमवीला सुरुवात केली. त्यातून सभागृहाची पायाभरणी झाली.

पुढे या सभागृहाचे काम विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले. आज हे सभागृह साहित्याच्या प्रत्येक कार्यक्रमाचे साक्षीदार ठरत आहेत. त्याची सुरुवात महानोरांनीच केली. अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मराठवाडा साहित्य परिषदेच्या विकासामध्ये योगदान दिले. शासनदरबारी आवश्यक मदतीसाठी पाठपुरावा केला. महानोरांनी सुरू केलेल्या पुरस्कारानंतर ‘मसाप’तर्फे विविध पुरस्कार देण्याची परंपराही सुरू झाली. ही परंपरा अद्यापही कायम आहे. उलट त्यात भरच घालण्यात आली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाmarathiमराठी