शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

ना.धों. महानोरांचा निर्णय अन् मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकांच्या सन्मान होऊ लागला

By राम शिनगारे | Updated: August 4, 2023 11:26 IST

नरहर कुरुंदकर यांच्या नावाने मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकास पुरस्कार देण्यास सुरुवात केली.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लेखकांना देशपातळीवरील अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत होते; मात्र मराठवाड्यातील साहित्यातील सर्वोच्च संस्था असलेली मराठवाडासाहित्य परिषद कोणत्याही साहित्यिकांचा सन्मान करीत नव्हती. ना.धों. महानोर हे ‘मसाप’चे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा नरहर कुरुंदकर यांच्या नावाने मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकास पुरस्कार देण्यास सुरुवात केली. या पहिल्या पुरस्काराचे मानकरी ठरले व्यासंगी पत्रकार अनंत भालेराव व कवयित्री अनुराधा पाटील. हा निर्णय महानोर यांच्याच कार्यकारिणीने घेतला होता.

अंबाजोगाई येथे साहित्य संमेलन झाल्यानंतर अडचणीच्या प्रसंगामुळे ना.धों. महानाेर यांना ‘मसाप’चे अध्यक्षपद स्वीकारावे लागले होते. त्यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ‘मसाप’मध्ये अनेक बदल घडवून आणले. सुरुवातीलाच त्यांनी मराठवाड्याच्या मातीतील साहित्यिकांचा सन्मान करण्यासाठी पुरस्कारांची सुरुवात केली. त्याशिवाय महानोरांच्या काळात ‘मसाप’च्या मुख्य कार्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने भव्यदिव्य सभागृहाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीच्या जमवाजमवीला सुरुवात केली. त्यातून सभागृहाची पायाभरणी झाली.

पुढे या सभागृहाचे काम विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले. आज हे सभागृह साहित्याच्या प्रत्येक कार्यक्रमाचे साक्षीदार ठरत आहेत. त्याची सुरुवात महानोरांनीच केली. अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मराठवाडा साहित्य परिषदेच्या विकासामध्ये योगदान दिले. शासनदरबारी आवश्यक मदतीसाठी पाठपुरावा केला. महानोरांनी सुरू केलेल्या पुरस्कारानंतर ‘मसाप’तर्फे विविध पुरस्कार देण्याची परंपराही सुरू झाली. ही परंपरा अद्यापही कायम आहे. उलट त्यात भरच घालण्यात आली आहे.

टॅग्स :literatureसाहित्यAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाmarathiमराठी