शहरं
Join us  
Trending Stories
1
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी
2
Rohit Arya: रोहित आर्याला मी वेगळे पैसे दिलेले, सरकारी बिलाशी संबंध नाही; दिपक केसरकरांची सारवासारव
3
तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद
4
कोणता झेंडा घेऊ हाती अशी मनसैनिकांची अवस्था, राज ठाकरे कन्फ्यूज नेते; शिंदेसेनेची बोचरी टीका
5
Lenskart IPO: महागडा आहे का लेन्सकार्टचा आयपीओ? व्हॅल्यूएशनवरुन उपस्थित होताहेत प्रश्न, एक्सपर्ट म्हणाले...
6
अँड्रॉइड की अ‍ॅपल, मोबाईल घोटाळे रोखण्यात कोणती सिस्टीम चांगली? गुगलने केला धक्कादायक खुलासा
7
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
8
सौदी अरेबिया फिफा विश्वचषकासाठी बांधणार 'स्काय स्टेडियम'; व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा?
9
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
10
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
11
Viral Video : व्वा! काय आयडिया आहे... मित्र फिरायला गेले अन् बिझनेस सुरू करून आले! होतंय कौतुक
12
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
13
IND W vs SA W: भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना ठरणार 'ऐतिहासिक'!
14
PhysicsWallah IPO: पुढच्या महिन्यात येतोय फिजिक्सवालाचा आयपीओ, ₹३८२० कोटी उभारणार, काय आहेत अधिक डिटेल्स?
15
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
16
WhatsApp वर येणार Facebook सारखं नवं फीचर; प्रोफाईलवर लावता येणार सुंदर कव्हर फोटो
17
धक्कादायक! रोहित आर्याने उर्मिला कोठारे, गिरीश ओक यांनाही स्टुडिओत बोलवलेलं, मुलांसोबत फोटोही काढले अन्...
18
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
20
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....

ना. धो. महानोर केवळ निसर्गाचे वर्णन करीत नाही, तर ते हा निसर्ग स्वत: जगले: नरेंद्र चपळगावकर

By बापू सोळुंके | Updated: August 4, 2023 12:18 IST

महाराष्ट्रातील शेती, संस्कृतीत ज्यांचे भावजीवन गुंतलेले होतं असा हा कवी, अनेक जाणत्या नेत्यांनाही आपला वाटत होता.

- न्या. नरेंद्र चपळगावकर, अ.भा. मराठीसाहित्य संमेलनाध्यक्ष

बी. रघुनाथ यांच्यानंतर ज्याला ग्रामीण जीवनाची आणि त्यातही मराठवाड्याच्या आणि आसपासच्या भागाची नाडी लक्षात आली आणि जी ज्याच्या जीवनाचा भाग बनली असे कवी म्हणजे ना.धों. महानोर. ग्रामीण भागातला कवी, मराठवाड्यातला कवी, अशा वेगवेगळ्या विशेषणाने आपण कवींची ओळख करून देतो, खरं म्हणजे माणसाची अशी ओळख फार मर्यादितरित्या उपयोगाला पडते. कवी म्हणून त्याचं सामर्थ्य हे अगदीच स्वतंत्र असते. अर्थात त्याच्या लेखनातून त्याला भोवतालचा निसर्ग आणि संस्कृती प्रकट होते.

महानोर केवळ निसर्गाचे वर्णन करीत नाही, तर ते हा निसर्ग स्वत: जगतात ते स्वत:चे अनुभव जीवन सांगू लागतात. तेव्हा आपोआप त्यांची कविता जन्माला येते. जवळजवळ मागील ६० ते ६५ वर्षांचा त्यांचा आणि माझा परिचय आहे. औरंगाबादला आपण यावं, आपल्या कवितेबद्दल येथील मित्रमंडळी काय म्हणतात, हे ऐकावं अशी त्यांची इच्छा असायची. यातूनच प्रा. चंद्रकांत पाटलांची आणि त्यांची मैत्री झाली. दोघांनी एक, दोन प्रातिनिधिक स्वरूपात कवितासंग्रहही काढले. पुढे त्यांच्या रानातल्या कवितेपासून वेगवेगळे कविता संग्रह प्रकाशित झाले. महाराष्ट्रातील शेती, संस्कृतीत ज्यांचे भावजीवन गुंतलेले होतं असा हा कवी, अनेक जाणत्या नेत्यांनाही आपला वाटत होता. मराठवाडा साहित्य परिषद आणि इतर सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा चांगला संबंध होता.

दोन गोष्टींचा लळात्यांना दोन गोष्टींनी लळा लावला होता. एकतर त्यांनीच सांगितल्याप्रमाणे या रानाने त्यांना लळा लावला होता. दुसरा लळा म्हणजे त्यांच्या आयुष्याची साथ थोड्याच दिवसापूर्वी सोडून गेलेल्या सुलोचनाबाईंचा. व्यावहारिक जीवनात अनेक संकटे महानोरांना भोगावी लागली. पण त्यांचं मन रसरशीत ठेवायला त्यांची कविताच उपयोगी पडली. माझ्या या मित्राला माझी मनपूर्वक श्रद्धांजली.

कॉलेज जीवनात घरी भेट झालेली मी आणि माझ्या बहिणी येथे शिक्षण घेत होतो. तेव्हा स.भु. कॉलनीत आम्ही राहत होतो. यावेळी ना.धों. महानोर आम्हाला भेटायला आमच्या घरी आले होते. ख्यातनाम समीक्षक सुधीर रसाळ, साहित्यिक वा.ल. कुलकर्णी यांच्याशी त्यांची भेट झाली. यानंतर त्यांनी आणि विजयाबाई राजाध्यक्ष यांनी महाराष्ट्रभर महानोरांच्या कविता पोहोचविण्यासाठी हातभार लावला.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यAurangabadऔरंगाबाद