शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
3
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
4
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
5
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
6
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
7
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
8
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
9
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
10
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
11
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
12
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
13
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
14
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
15
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
16
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
17
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
18
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
19
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
20
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर

ना. धो. महानोर केवळ निसर्गाचे वर्णन करीत नाही, तर ते हा निसर्ग स्वत: जगले: नरेंद्र चपळगावकर

By बापू सोळुंके | Updated: August 4, 2023 12:18 IST

महाराष्ट्रातील शेती, संस्कृतीत ज्यांचे भावजीवन गुंतलेले होतं असा हा कवी, अनेक जाणत्या नेत्यांनाही आपला वाटत होता.

- न्या. नरेंद्र चपळगावकर, अ.भा. मराठीसाहित्य संमेलनाध्यक्ष

बी. रघुनाथ यांच्यानंतर ज्याला ग्रामीण जीवनाची आणि त्यातही मराठवाड्याच्या आणि आसपासच्या भागाची नाडी लक्षात आली आणि जी ज्याच्या जीवनाचा भाग बनली असे कवी म्हणजे ना.धों. महानोर. ग्रामीण भागातला कवी, मराठवाड्यातला कवी, अशा वेगवेगळ्या विशेषणाने आपण कवींची ओळख करून देतो, खरं म्हणजे माणसाची अशी ओळख फार मर्यादितरित्या उपयोगाला पडते. कवी म्हणून त्याचं सामर्थ्य हे अगदीच स्वतंत्र असते. अर्थात त्याच्या लेखनातून त्याला भोवतालचा निसर्ग आणि संस्कृती प्रकट होते.

महानोर केवळ निसर्गाचे वर्णन करीत नाही, तर ते हा निसर्ग स्वत: जगतात ते स्वत:चे अनुभव जीवन सांगू लागतात. तेव्हा आपोआप त्यांची कविता जन्माला येते. जवळजवळ मागील ६० ते ६५ वर्षांचा त्यांचा आणि माझा परिचय आहे. औरंगाबादला आपण यावं, आपल्या कवितेबद्दल येथील मित्रमंडळी काय म्हणतात, हे ऐकावं अशी त्यांची इच्छा असायची. यातूनच प्रा. चंद्रकांत पाटलांची आणि त्यांची मैत्री झाली. दोघांनी एक, दोन प्रातिनिधिक स्वरूपात कवितासंग्रहही काढले. पुढे त्यांच्या रानातल्या कवितेपासून वेगवेगळे कविता संग्रह प्रकाशित झाले. महाराष्ट्रातील शेती, संस्कृतीत ज्यांचे भावजीवन गुंतलेले होतं असा हा कवी, अनेक जाणत्या नेत्यांनाही आपला वाटत होता. मराठवाडा साहित्य परिषद आणि इतर सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा चांगला संबंध होता.

दोन गोष्टींचा लळात्यांना दोन गोष्टींनी लळा लावला होता. एकतर त्यांनीच सांगितल्याप्रमाणे या रानाने त्यांना लळा लावला होता. दुसरा लळा म्हणजे त्यांच्या आयुष्याची साथ थोड्याच दिवसापूर्वी सोडून गेलेल्या सुलोचनाबाईंचा. व्यावहारिक जीवनात अनेक संकटे महानोरांना भोगावी लागली. पण त्यांचं मन रसरशीत ठेवायला त्यांची कविताच उपयोगी पडली. माझ्या या मित्राला माझी मनपूर्वक श्रद्धांजली.

कॉलेज जीवनात घरी भेट झालेली मी आणि माझ्या बहिणी येथे शिक्षण घेत होतो. तेव्हा स.भु. कॉलनीत आम्ही राहत होतो. यावेळी ना.धों. महानोर आम्हाला भेटायला आमच्या घरी आले होते. ख्यातनाम समीक्षक सुधीर रसाळ, साहित्यिक वा.ल. कुलकर्णी यांच्याशी त्यांची भेट झाली. यानंतर त्यांनी आणि विजयाबाई राजाध्यक्ष यांनी महाराष्ट्रभर महानोरांच्या कविता पोहोचविण्यासाठी हातभार लावला.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यAurangabadऔरंगाबाद