शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

ना. धो. महानोर केवळ निसर्गाचे वर्णन करीत नाही, तर ते हा निसर्ग स्वत: जगले: नरेंद्र चपळगावकर

By बापू सोळुंके | Updated: August 4, 2023 12:18 IST

महाराष्ट्रातील शेती, संस्कृतीत ज्यांचे भावजीवन गुंतलेले होतं असा हा कवी, अनेक जाणत्या नेत्यांनाही आपला वाटत होता.

- न्या. नरेंद्र चपळगावकर, अ.भा. मराठीसाहित्य संमेलनाध्यक्ष

बी. रघुनाथ यांच्यानंतर ज्याला ग्रामीण जीवनाची आणि त्यातही मराठवाड्याच्या आणि आसपासच्या भागाची नाडी लक्षात आली आणि जी ज्याच्या जीवनाचा भाग बनली असे कवी म्हणजे ना.धों. महानोर. ग्रामीण भागातला कवी, मराठवाड्यातला कवी, अशा वेगवेगळ्या विशेषणाने आपण कवींची ओळख करून देतो, खरं म्हणजे माणसाची अशी ओळख फार मर्यादितरित्या उपयोगाला पडते. कवी म्हणून त्याचं सामर्थ्य हे अगदीच स्वतंत्र असते. अर्थात त्याच्या लेखनातून त्याला भोवतालचा निसर्ग आणि संस्कृती प्रकट होते.

महानोर केवळ निसर्गाचे वर्णन करीत नाही, तर ते हा निसर्ग स्वत: जगतात ते स्वत:चे अनुभव जीवन सांगू लागतात. तेव्हा आपोआप त्यांची कविता जन्माला येते. जवळजवळ मागील ६० ते ६५ वर्षांचा त्यांचा आणि माझा परिचय आहे. औरंगाबादला आपण यावं, आपल्या कवितेबद्दल येथील मित्रमंडळी काय म्हणतात, हे ऐकावं अशी त्यांची इच्छा असायची. यातूनच प्रा. चंद्रकांत पाटलांची आणि त्यांची मैत्री झाली. दोघांनी एक, दोन प्रातिनिधिक स्वरूपात कवितासंग्रहही काढले. पुढे त्यांच्या रानातल्या कवितेपासून वेगवेगळे कविता संग्रह प्रकाशित झाले. महाराष्ट्रातील शेती, संस्कृतीत ज्यांचे भावजीवन गुंतलेले होतं असा हा कवी, अनेक जाणत्या नेत्यांनाही आपला वाटत होता. मराठवाडा साहित्य परिषद आणि इतर सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा चांगला संबंध होता.

दोन गोष्टींचा लळात्यांना दोन गोष्टींनी लळा लावला होता. एकतर त्यांनीच सांगितल्याप्रमाणे या रानाने त्यांना लळा लावला होता. दुसरा लळा म्हणजे त्यांच्या आयुष्याची साथ थोड्याच दिवसापूर्वी सोडून गेलेल्या सुलोचनाबाईंचा. व्यावहारिक जीवनात अनेक संकटे महानोरांना भोगावी लागली. पण त्यांचं मन रसरशीत ठेवायला त्यांची कविताच उपयोगी पडली. माझ्या या मित्राला माझी मनपूर्वक श्रद्धांजली.

कॉलेज जीवनात घरी भेट झालेली मी आणि माझ्या बहिणी येथे शिक्षण घेत होतो. तेव्हा स.भु. कॉलनीत आम्ही राहत होतो. यावेळी ना.धों. महानोर आम्हाला भेटायला आमच्या घरी आले होते. ख्यातनाम समीक्षक सुधीर रसाळ, साहित्यिक वा.ल. कुलकर्णी यांच्याशी त्यांची भेट झाली. यानंतर त्यांनी आणि विजयाबाई राजाध्यक्ष यांनी महाराष्ट्रभर महानोरांच्या कविता पोहोचविण्यासाठी हातभार लावला.

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्यAurangabadऔरंगाबाद