शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

राष्ट्रवादी ९० जागी स्वबळावर

By admin | Updated: April 7, 2015 01:28 IST

औरंगाबाद : काँग्रेससोबत आघाडी करण्याची बोलणी संपूर्णपणे फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी केली असून,

औरंगाबाद : काँग्रेससोबत आघाडी करण्याची बोलणी संपूर्णपणे फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी केली असून, सोमवारी दुपारपासून निश्चित केलेल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटपही सुरूकेले आहेत. सुमारे ९० जागांवर उमेदवार उभे केले जातील, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी दिली. काँग्रेसशी होणाऱ्या आघाडीत बिघाडी झाल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या असून, मंगळवारी सर्वच उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. पक्षाचे प्रवक्ते आ. सतीश चव्हाण, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, कार्याध्यक्ष विनोद पाटील, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, नगरसेवक अभिजित देशमुख यांच्या उपस्थितीत व्यापक बैठक होऊन त्यामध्ये पक्षाने निश्चित केलेल्या उमेदवारांंना एबी फॉर्म वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुपारपासून एबी फॉर्मचे वाटपही सुरूकरण्यात आले. सोमवारी सायंकाळपर्यंत ७५ उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. आणखी जागांवर एबी फॉर्म देण्याचे काम बुधवारी सकाळी होणार आहे. शिवसेना- भाजप तसेच एमआयएमला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली पाहिजे, असा विचार सुरू होता. माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ.सतीश चव्हाण या मंडळींनी काँग्रेससोबत आघाडीशी दोन ते तीन वेळा बोलणीही केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही चर्चा झाली. रविवारी रात्रीपर्यंत आघाडी होण्याचे संकेत मिळत नव्हते. दोन्ही पक्षांनी रविवारी रात्रीच निश्चित केलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासंबंधी सूचना देण्यास सांगितले होते. त्यामुळे आघाडी झाली नसल्याचे सोमवारी सकाळी स्पष्टपणे पुढे आले. त्यामुळे सोमवारी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्मचे वाटपही सुरू केले. आ. सतीश चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही जास्तीत जास्त जागा लढविण्याचा प्रयत्न करणार आहोत. पक्षाने सर्वच वॉर्डातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. ४आमच्याकडे सर्व ११३ वॉर्डासाठी उमेदवार आहेत. मात्र, ज्याठिकाणी पक्षाची फारशी शक्ती नाही, त्याठिकाणी आम्ही उमेदवार देणार नाही. ज्या वॉर्डात आमचा उमेदवार नसेल तेथे काय करायचे हे नंतर ठरविण्यात येईल.पक्षातर्फे मंगळवारी आणि बुधवारी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. उमेदवार निवड समितीमार्फत ज्यांची नावे अंतिम करण्यात आली आहेत, त्यातील बहुसंख्य उमेदवार बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर बुधवारी सायंकाळपर्यंत उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षातर्फे ‘आधी उमेदवारी; नंतर यादी’ असा नवा फॉर्म्युला अंमलात आणण्यात आला.