शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

राष्ट्रवादी ९० जागी स्वबळावर

By admin | Updated: April 7, 2015 01:28 IST

औरंगाबाद : काँग्रेससोबत आघाडी करण्याची बोलणी संपूर्णपणे फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी केली असून,

औरंगाबाद : काँग्रेससोबत आघाडी करण्याची बोलणी संपूर्णपणे फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याची तयारी केली असून, सोमवारी दुपारपासून निश्चित केलेल्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटपही सुरूकेले आहेत. सुमारे ९० जागांवर उमेदवार उभे केले जातील, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी दिली. काँग्रेसशी होणाऱ्या आघाडीत बिघाडी झाल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसने निश्चित केलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या असून, मंगळवारी सर्वच उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. पक्षाचे प्रवक्ते आ. सतीश चव्हाण, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, कार्याध्यक्ष विनोद पाटील, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, नगरसेवक अभिजित देशमुख यांच्या उपस्थितीत व्यापक बैठक होऊन त्यामध्ये पक्षाने निश्चित केलेल्या उमेदवारांंना एबी फॉर्म वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुपारपासून एबी फॉर्मचे वाटपही सुरूकरण्यात आले. सोमवारी सायंकाळपर्यंत ७५ उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. आणखी जागांवर एबी फॉर्म देण्याचे काम बुधवारी सकाळी होणार आहे. शिवसेना- भाजप तसेच एमआयएमला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली पाहिजे, असा विचार सुरू होता. माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ.सतीश चव्हाण या मंडळींनी काँग्रेससोबत आघाडीशी दोन ते तीन वेळा बोलणीही केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही चर्चा झाली. रविवारी रात्रीपर्यंत आघाडी होण्याचे संकेत मिळत नव्हते. दोन्ही पक्षांनी रविवारी रात्रीच निश्चित केलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्यासंबंधी सूचना देण्यास सांगितले होते. त्यामुळे आघाडी झाली नसल्याचे सोमवारी सकाळी स्पष्टपणे पुढे आले. त्यामुळे सोमवारी सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेसने एबी फॉर्मचे वाटपही सुरू केले. आ. सतीश चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही जास्तीत जास्त जागा लढविण्याचा प्रयत्न करणार आहोत. पक्षाने सर्वच वॉर्डातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. ४आमच्याकडे सर्व ११३ वॉर्डासाठी उमेदवार आहेत. मात्र, ज्याठिकाणी पक्षाची फारशी शक्ती नाही, त्याठिकाणी आम्ही उमेदवार देणार नाही. ज्या वॉर्डात आमचा उमेदवार नसेल तेथे काय करायचे हे नंतर ठरविण्यात येईल.पक्षातर्फे मंगळवारी आणि बुधवारी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. उमेदवार निवड समितीमार्फत ज्यांची नावे अंतिम करण्यात आली आहेत, त्यातील बहुसंख्य उमेदवार बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर बुधवारी सायंकाळपर्यंत उमेदवार यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे पक्षातर्फे ‘आधी उमेदवारी; नंतर यादी’ असा नवा फॉर्म्युला अंमलात आणण्यात आला.