शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

राष्ट्रीय पेयजलच्या १७ योजना रखडल्या

By admin | Updated: June 16, 2017 01:36 IST

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गतच्या १७ योजनांचे काम पावसाळा सुरू होऊनही पुर्ण होऊ शकले नाही.

पावसाळा सुरू : काम संथगतीने, ग्रामस्थांना योजनेचे पाणी मिळणार पुढील उन्हाळ्यातलोकमत न्यूज नेटवर्कयवतमळ : राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गतच्या १७ योजनांचे काम पावसाळा सुरू होऊनही पुर्ण होऊ शकले नाही. या गावांतील ग्रामस्थांना आता पुढील उन्हाळ्यातच पाणी मिळण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत ४६ गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांचे काम सुरू करण्यात आले. या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई असल्याने तेथे ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र काम संथगतीने होत असल्याने या योजना रखडल्या आहेत. उन्हाळा संपतासंपता त्यापैकी २९ योजना कशातरी पूर्णत्वास गेल्या आहेत. तथापि अद्याप उर्वरित १७ गावांमध्ये काम सुरूच आहे. आता पावसाळा सुरू झाल्याने या योजना पूर्णत्वास जाण्याची शक्यता दुरावली आहे.तीव्र पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे हाती घेण्यात आली. दिरंगाईमुळे या योजना अद्याप रखडल्या आहेत. आता पावसाळा सुरू झाल्याने काम करणे कठीण होणार आहे. परिणामी या १७ गावांमधील नागरिकांना आता पुढील वर्षीच्या उन्हाळ्यातच या योजनेचे पाणी मिळण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे ग्रामीण जनेतेत संताप व्यक्त होत आहे.