शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
2
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
3
भारतीय नौदल चीन, पाकिसातन, तुर्की अन् चीनला धक्का देणार! तीन पावले उचलली
4
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
5
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
6
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!
7
Railway: रेल्वे ट्रॅकजवळ रील बनवणाऱ्यांची आता खैर नाही; प्रशासनानं उचललं कठोर पाऊल!
8
मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
9
Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
10
Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
11
Social Media Earning: इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून कसे कमवता येतात पैसे? तुम्हीही बनू शकता लखपती! जाणून घ्या
12
एका जाहीरातीमुळे ट्रम्प यांची सटकली, थेट ट्रेड डीलवरील चर्चाच रद्द केली, काय होतं त्या जाहीरातीत?
13
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा
14
Womens World Cup 2025 Semi-Final Schedule : टीम इंडियासमोर कोणत्या संघाचं असेल आव्हान?
15
"अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास..."; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप
16
स्वतःला संपवू नका गं… तुम्हाला त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे - चित्रा वाघ
17
Phaltan Crime: संबंधित पोलिसांना निलंबित करा, महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश
18
Mumbai Crime: लालबागमध्ये थरार! बॉयफ्रेंडपासून वाचण्यासाठी रस्त्यावर धावत सुटली तरुणी; नर्सिंग होममध्ये घुसताच...
19
भारतानेही ट्रम्प यांच्या इशाऱ्यावरून रशियन तेल खरेदी कमी केले; अमेरिकेचा पुन्हा दावा
20
१०१ वर्ष जुनी कंपनी आयपीओ आणणार, १६६७ कोटी रुपये उभारणार; 'या' दिवसापासून करता येणार गुंतवणूक

नाथषष्ठी यात्रा रद्द मात्र २० मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार सोहळा; भाविकांचा सलग दुसऱ्या वर्षी हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 17:26 IST

Nathashthi Yatra is canceled due to corona नाथषष्ठीची ४०० वर्षाची परंपरा असून तुकाराम बीजेपासून नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.

ठळक मुद्देया सोहळ्यात मानकऱ्या व्यतिरिक्त इतर भाविकांना सहभागी होता येणार नाही

पैठण : कोरोनाचे नियम पाळून २० मानकऱ्यासह नाथषष्ठीचे सर्व धार्मिक व पारंपरिक सोहळे  पार पाडण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, या काळात भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद राहणार आहेत. सलग दुसऱ्या वर्षी नाथषष्ठी यात्रा रद्द झाल्याने वारकरी संप्रदायात नाराजगी आहे.

कोरोनामुळे यंदा नाथषष्ठी यात्रा महोत्सव  रद्द करण्यात आला असला तरी नाथषष्ठी दरम्यान होणारी धार्मिक पूजाविधी पारंपरिक सोहळे खंडीत करता येणार नसल्याने मानकऱ्यांना नाथषष्ठी यात्रा साजरी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी नाथवंशजांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली होती. या अनुषंगाने दि २५ रोजी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे व नाथवंशज यांची बैठक तहसील कार्यालयात घेण्यात आली. बैठकीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे , प्रभारी तहसीलदार दत्तात्रय निलावड , पोलीस निरीक्षक किशोर पवार, ज्येष्ठ नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी , रघुनाथ बुवा पालखीवाले, हरीपंडित महाराज गोसावी, आदीसह नाथवंशज उपस्थित होते.  

नाथषष्ठीची ४०० वर्षाची परंपरा असून तुकाराम बीजेपासून नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. बैठकीत इतर देवस्थानच्या धर्तीवर मानकऱ्यांना सोहळा साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जेष्ठ नाथवंशज रावसाहेब व हरिपंडीत महाराज यांनी केली. यानुसार २० मानकऱ्यासह सोहळा साजरा करण्याची परवानगी प्रशासनाने दिली. या सोहळ्यात मानकऱ्या व्यतिरिक्त इतर भाविकांना सहभागी होता येणार नसून  तसे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा ईशारा देत  यात्रा कालावधीत मंदीर बंद ठेवण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी सांगितले.

नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राजभरातील ४५० दिंडी प्रमुखांनी नोंदणी केली आहे. गत वर्षी नाथषष्ठी यात्रा महोत्सव प्रशासनाने रद्द केला होता तरीही वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून नाथमंदीराच्या बंद दरवाजाच्या बाहेरून दर्शन घेत वारी पूर्ण केली होती.  यंदाही वारकऱ्यांकडून गतवर्षीची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. पंढरपूर यात्रेनंतर वारकरी संप्रदायाच्या दृष्टीकोनातून पैठण यात्रेचे मोठे महत्त्व आहे. पंढरपूर प्रमाणेच लाखो वारकरी हरिनामाचा गजर करीत दिंड्या घेऊन पैठणची वारी पूर्ण करतात सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द झाल्याने वारकरी संप्रदायात मोठी नाराजगी पसरली असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या