शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

नाथषष्ठी यात्रा रद्द मात्र २० मानकऱ्यांच्या उपस्थितीत होणार सोहळा; भाविकांचा सलग दुसऱ्या वर्षी हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 17:26 IST

Nathashthi Yatra is canceled due to corona नाथषष्ठीची ४०० वर्षाची परंपरा असून तुकाराम बीजेपासून नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.

ठळक मुद्देया सोहळ्यात मानकऱ्या व्यतिरिक्त इतर भाविकांना सहभागी होता येणार नाही

पैठण : कोरोनाचे नियम पाळून २० मानकऱ्यासह नाथषष्ठीचे सर्व धार्मिक व पारंपरिक सोहळे  पार पाडण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, या काळात भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे बंद राहणार आहेत. सलग दुसऱ्या वर्षी नाथषष्ठी यात्रा रद्द झाल्याने वारकरी संप्रदायात नाराजगी आहे.

कोरोनामुळे यंदा नाथषष्ठी यात्रा महोत्सव  रद्द करण्यात आला असला तरी नाथषष्ठी दरम्यान होणारी धार्मिक पूजाविधी पारंपरिक सोहळे खंडीत करता येणार नसल्याने मानकऱ्यांना नाथषष्ठी यात्रा साजरी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी नाथवंशजांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली होती. या अनुषंगाने दि २५ रोजी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे व नाथवंशज यांची बैठक तहसील कार्यालयात घेण्यात आली. बैठकीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे , प्रभारी तहसीलदार दत्तात्रय निलावड , पोलीस निरीक्षक किशोर पवार, ज्येष्ठ नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी , रघुनाथ बुवा पालखीवाले, हरीपंडित महाराज गोसावी, आदीसह नाथवंशज उपस्थित होते.  

नाथषष्ठीची ४०० वर्षाची परंपरा असून तुकाराम बीजेपासून नाथषष्ठी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. बैठकीत इतर देवस्थानच्या धर्तीवर मानकऱ्यांना सोहळा साजरा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जेष्ठ नाथवंशज रावसाहेब व हरिपंडीत महाराज यांनी केली. यानुसार २० मानकऱ्यासह सोहळा साजरा करण्याची परवानगी प्रशासनाने दिली. या सोहळ्यात मानकऱ्या व्यतिरिक्त इतर भाविकांना सहभागी होता येणार नसून  तसे निदर्शनास आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा ईशारा देत  यात्रा कालावधीत मंदीर बंद ठेवण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांनी सांगितले.

नाथषष्ठी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राजभरातील ४५० दिंडी प्रमुखांनी नोंदणी केली आहे. गत वर्षी नाथषष्ठी यात्रा महोत्सव प्रशासनाने रद्द केला होता तरीही वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून नाथमंदीराच्या बंद दरवाजाच्या बाहेरून दर्शन घेत वारी पूर्ण केली होती.  यंदाही वारकऱ्यांकडून गतवर्षीची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. पंढरपूर यात्रेनंतर वारकरी संप्रदायाच्या दृष्टीकोनातून पैठण यात्रेचे मोठे महत्त्व आहे. पंढरपूर प्रमाणेच लाखो वारकरी हरिनामाचा गजर करीत दिंड्या घेऊन पैठणची वारी पूर्ण करतात सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द झाल्याने वारकरी संप्रदायात मोठी नाराजगी पसरली असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या