शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पाठोपाठ अहमदनगरचे पाणी जायकवाडीत दाखल; जलसाठा पोहचला ६२ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 20:22 IST

गोदावरी व प्रवरेचे पाणी एकत्रितपणे दाखल झाल्यानंतर आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्गास प्रारंभबुधवारपासून नाथसागरात मोठी आवक होणार

पैठण : अहमदनगर जिल्हातील धरण समुहातून  जायकवाडी धरणासाठी  आज सकाळी मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आले. नाशिक पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यात आल्याने बुधवारपासून नाथसागरात मोठी आवक होणार असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी धरणात २५१८५ क्युसेस आवक सुरू होती तर जलसाठा ६२% झाला होता. 

नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून जायकवाडी धरणासाठी २६१४६ क्युसेस क्षमतेने विसर्ग सुरू असताना आज अहमदनगर जिल्हातील  भंडारदरा ३२५२ क्युसेस, निळवंडे ६३७३ क्युसेक्स,  मुळा १०७५ क्युसेस व ओझर वेअर मधून प्रवरेत २०९०१ क्युसेस असा मोठा विसर्ग मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू करण्यात आला. यामुळे प्रवरा नदीस पुर आला असून  मंगळवारी मध्यरात्री हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होईल असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील दारणा १२७८८ क्युसेस, कडवा ४२४० क्युसेस, आळंदी ८० क्युसेस, वालदेवी ५९९ क्युसेस, गंगापूर २२१२ क्युसेस,  व नांदूर मधमे्श्वर वेअर मधून २६२४६ असा विसर्ग गोदावरी पात्रात सुरू आहे. 

गोदावरी व प्रवरेचे पाणी एकत्रितपणे दाखल झाल्यानंतर आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. मंगळवारी सायंकाळी धरणाची पाणी पातळी १५१४.३१ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा २०८४.०६६ दलघमी (७३.५९ टिएमसी) तर उपयुक्त जलसाठा १३४६.०६६ दलघमी (४७.५३ टिएमसी) झाला आहे. गोदावरीसह प्रवरेची आवक झाल्यानंतर धरणाच्या जलसाठ्यात गतीने वाढ होईल असे गणेश खराडकर व बबन बोधणे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण