शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नाशिक पाठोपाठ अहमदनगरचे पाणी जायकवाडीत दाखल; जलसाठा पोहचला ६२ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 20:22 IST

गोदावरी व प्रवरेचे पाणी एकत्रितपणे दाखल झाल्यानंतर आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

ठळक मुद्देअहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून विसर्गास प्रारंभबुधवारपासून नाथसागरात मोठी आवक होणार

पैठण : अहमदनगर जिल्हातील धरण समुहातून  जायकवाडी धरणासाठी  आज सकाळी मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू करण्यात आले. नाशिक पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्यात आल्याने बुधवारपासून नाथसागरात मोठी आवक होणार असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. मंगळवारी सायंकाळी धरणात २५१८५ क्युसेस आवक सुरू होती तर जलसाठा ६२% झाला होता. 

नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून जायकवाडी धरणासाठी २६१४६ क्युसेस क्षमतेने विसर्ग सुरू असताना आज अहमदनगर जिल्हातील  भंडारदरा ३२५२ क्युसेस, निळवंडे ६३७३ क्युसेक्स,  मुळा १०७५ क्युसेस व ओझर वेअर मधून प्रवरेत २०९०१ क्युसेस असा मोठा विसर्ग मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू करण्यात आला. यामुळे प्रवरा नदीस पुर आला असून  मंगळवारी मध्यरात्री हे पाणी जायकवाडी धरणात दाखल होईल असे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील दारणा १२७८८ क्युसेस, कडवा ४२४० क्युसेस, आळंदी ८० क्युसेस, वालदेवी ५९९ क्युसेस, गंगापूर २२१२ क्युसेस,  व नांदूर मधमे्श्वर वेअर मधून २६२४६ असा विसर्ग गोदावरी पात्रात सुरू आहे. 

गोदावरी व प्रवरेचे पाणी एकत्रितपणे दाखल झाल्यानंतर आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. मंगळवारी सायंकाळी धरणाची पाणी पातळी १५१४.३१ फूट झाली होती. धरणात एकूण जलसाठा २०८४.०६६ दलघमी (७३.५९ टिएमसी) तर उपयुक्त जलसाठा १३४६.०६६ दलघमी (४७.५३ टिएमसी) झाला आहे. गोदावरीसह प्रवरेची आवक झाल्यानंतर धरणाच्या जलसाठ्यात गतीने वाढ होईल असे गणेश खराडकर व बबन बोधणे यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादJayakwadi Damजायकवाडी धरण