शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

नरेंद्र चपळगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:48 IST

मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीसाठी लक्षणीय योगदान देणाऱ्या लेखक- कार्यकर्त्यांच्या साहित्याचा व संस्थात्मक कार्याचा गौरव करण्यासाठी परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा सहावा जीवनगौरव पुरस्कार न्या. नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीसाठी लक्षणीय योगदान देणाऱ्या लेखक- कार्यकर्त्यांच्या साहित्याचा व संस्थात्मक कार्याचा गौरव करण्यासाठी परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा सहावा जीवनगौरव पुरस्कार न्या. नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.न्या. चपळगावकर यांचा तरुणपणीच मराठवाडा साहित्य परिषदेशी संबंध आला. तेव्हापासून आजपर्यंत ते साहित्य परिषदेशी जोडलेले आहेत. १५ वर्षांहून अधिक काळ ते विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषदेसोबतच ते महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील वाङ्मय व्यवहाराशी निगडित असलेल्या अनेक संस्थांचे सभासद आहेत. साहित्य क्षेत्रातील आणि मराठवाडा साहित्य परिषदेतील त्यांचे योगदान लक्षात घेता जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांची एकमताने निवड झाली असून, लवकरच पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येईल, असे ठाले यांनी सांगितले.चौकट :हिंगोली येथे वर्धापन दिनयावेळी ठाले यांनी मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे राबविण्यात येणाºया उपक्रमांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, परिषदेच्या शाखेसाठी उस्मानाबाद येथे १० हजार चौरस फूट जागेवर संत गोरोबाकाका सभागृह बांधण्याचे काम तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच नांदेड येथे शाखेला जागा मिळण्यासाठी सतत प्रयत्न केले जात असून, तेथील महानगरपालिकेने जागा देण्याची घोषणा केली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा वर्धापन दिन यावर्षी दि. २९ सप्टेंबर रोजी हिंगोली येथे साजरा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.चौकट :आदिलाबादकडे देणार लक्षतेलंगणा राज्यातील आदिलाबाद हे शहर पूर्वी मराठवाड्याचाच भाग होते. भाषावार प्रांतरचनेमुळे ते तेलंगणात गेले आणि मराठीशी असलेली नैसर्गिक नाळ तुटत गेली. आज या गावाची ६६ टक्के लोकसंख्या मराठी भाषक असून, तिथे मराठी भाषक, शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषद प्रयत्नशील आहे. तेथे कविसंमेलन घेण्यात येऊन विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात येईल, असेही ठाले यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्य