शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
3
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
4
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
5
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
6
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
7
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
8
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
9
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
10
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
11
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
12
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
13
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
14
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
15
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
16
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
17
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
18
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
20
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

नरेंद्र चपळगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 23:48 IST

मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीसाठी लक्षणीय योगदान देणाऱ्या लेखक- कार्यकर्त्यांच्या साहित्याचा व संस्थात्मक कार्याचा गौरव करण्यासाठी परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा सहावा जीवनगौरव पुरस्कार न्या. नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीसाठी लक्षणीय योगदान देणाऱ्या लेखक- कार्यकर्त्यांच्या साहित्याचा व संस्थात्मक कार्याचा गौरव करण्यासाठी परिषदेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यावर्षीचा सहावा जीवनगौरव पुरस्कार न्या. नरेंद्र चपळगावकर यांना जाहीर झाल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.न्या. चपळगावकर यांचा तरुणपणीच मराठवाडा साहित्य परिषदेशी संबंध आला. तेव्हापासून आजपर्यंत ते साहित्य परिषदेशी जोडलेले आहेत. १५ वर्षांहून अधिक काळ ते विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष होते. मराठवाडा साहित्य परिषदेसोबतच ते महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील वाङ्मय व्यवहाराशी निगडित असलेल्या अनेक संस्थांचे सभासद आहेत. साहित्य क्षेत्रातील आणि मराठवाडा साहित्य परिषदेतील त्यांचे योगदान लक्षात घेता जीवनगौरव पुरस्कारासाठी त्यांची एकमताने निवड झाली असून, लवकरच पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येईल, असे ठाले यांनी सांगितले.चौकट :हिंगोली येथे वर्धापन दिनयावेळी ठाले यांनी मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे राबविण्यात येणाºया उपक्रमांबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, परिषदेच्या शाखेसाठी उस्मानाबाद येथे १० हजार चौरस फूट जागेवर संत गोरोबाकाका सभागृह बांधण्याचे काम तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच नांदेड येथे शाखेला जागा मिळण्यासाठी सतत प्रयत्न केले जात असून, तेथील महानगरपालिकेने जागा देण्याची घोषणा केली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचा वर्धापन दिन यावर्षी दि. २९ सप्टेंबर रोजी हिंगोली येथे साजरा करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.चौकट :आदिलाबादकडे देणार लक्षतेलंगणा राज्यातील आदिलाबाद हे शहर पूर्वी मराठवाड्याचाच भाग होते. भाषावार प्रांतरचनेमुळे ते तेलंगणात गेले आणि मराठीशी असलेली नैसर्गिक नाळ तुटत गेली. आज या गावाची ६६ टक्के लोकसंख्या मराठी भाषक असून, तिथे मराठी भाषक, शैक्षणिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी मराठवाडा साहित्य परिषद प्रयत्नशील आहे. तेथे कविसंमेलन घेण्यात येऊन विविध उपक्रमांची सुरुवात करण्यात येईल, असेही ठाले यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादliteratureसाहित्य