शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या इतिहासात दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या; ७५,२८६ कोटींची तरतूद; वित्तीय शिस्त बिघडल्याचा विरोधकांचा आरोप
2
सोनं झळकलं! वर्षभरात दिले ६७% रिटर्न्स, २०२६ मध्ये १० ग्रॅमचा भाव दीड लाखाच्या पुढे जाण्याचा अंदाज
3
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
आमदारांच्या फुटीवरून रंगले दावे अन् प्रतिदावे; मुख्यमंत्री म्हणाले, ते २२ आमदार आमचेच
5
हॉटेलमध्ये ‘आधार’ची फोटोकॉपी चालणार नाही; पडताळणी थांबवण्यासाठी नवीन नियम करणार
6
भाजपची गुगली; वडेट्टीवार यांना विधानसभेत तर परब यांना परिषदेत विरोधी पक्षनेतेपद!
7
आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक
8
धक्कादायक! एका बेडकाने घडविला २ रिक्षांचा अपघात; चालकांसह पाच जखमी; नेमकं काय घडलं?
9
प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
10
'वंदे मातरम्'चे काँग्रेसने तुकडे केले, तुष्टीकरणाचे राजकारण सुरूच : मोदी
11
इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल
12
गोव्यात कसिनोंवरील नाइट ‘जीवघेणा जुगार’; आग लागल्यास माराव्या लागतील मांडवी नदीत उड्या
13
विश्वस्त संस्थांतील विश्वस्त व्यवस्थांचे नियमन करणार, विधेयक सादर, चांगल्या कारभारासाठी तरतूद
14
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
15
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
16
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
17
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
18
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
19
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
20
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
Daily Top 2Weekly Top 5

'वंदे भारत'चा नांदेड मुहूर्त ठरला'; एक दिवसात छत्रपती संभाजीनगरहून मुंबई अपडाऊन विसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:50 IST

रेल्वेची मनमानी, लोकप्रतिनिधींच्या उदासीनता; वंदे भारत एक्स्प्रेस २६ ऑगस्टपासून सुटणार नांदेडहून

छत्रपती संभाजीनगर : मोठा गाजावाजा करून सुरू केलेली जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस अखेर २६ ऑगस्टपासून नांदेडहून धावणार आहे. ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्यास आणि वेळेत बदल करण्यास तीव्र विरोध झाला. मात्र, त्यानंतरही रेल्वेचा मनमानी कारभार आणि जालना, छत्रपती संभाजीनगरातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्यावर शिक्कामोर्तब झाले. याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगरकरांना बसणार आहे. ही रेल्वे नव्या वेळापत्रकानुसार अडीच तास उशिराने सुटेल. परिणामी, शहरवासीयांना रेल्वेने एका दिवसात मुंबईला ये-जा करणे थांबणार आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेस छत्रपती संभाजीनगरहून जालन्यापर्यंत आणि नंतर हिंगोलीपर्यंत नेण्यात आली. परिणामी, छत्रपती संभाजीनगरकरांचा मुंबईला एका दिवसात ये-जा करणेच थांबले. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर शहरवासीयांना एका दिवसात मुंबईला ये-जा करणे शक्य झाले; परंतु आता ही रेल्वे नांदेडपर्यंत नेली जात असल्याने मुंबईत मुक्काम करण्याचीच वेळ येईल. वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेण्याचा आणि वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतल्याचे १२ जून रोजी समजले. मात्र, गेल्या महिनाभरात जालना, छत्रपती संभाजीनगरातील लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा अपुरा पडल्यानेच ही रेल्वे नांदेडहून २६ ऑगस्टपासून सुटण्यावर आणि वेळापत्रकातील बदलावर शिक्कामाेर्तब झाल्याची ओरड सर्वसामान्य प्रवाशांतून होत आहे.

बोगींची संख्या ८ वरून २० वर; पण...सध्या वंदे भारत एक्स्प्रेस ही ८ बोगींची आहे. नांदेडहून सोडताना ती २० बोगींची होईल. त्यामुळे कोटा कमी होणार नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, ही रेल्वे सध्या छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ५:५० वाजता सुटते आणि दुपारी ११:५५ वाजेपर्यंत मुंबईला पोहोचते. नव्या वेळापत्रकानुसार ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ८:१५ वाजता सुटेल आणि दुपारी २:२५ वाजता मुंबईला पोहोचेल. त्यामुळे सकाळी मुंबईला गेल्यानंतर सायंकाळी रेल्वेने परतणे अशक्य आहे. ‘वंदे भारत’ची अवस्था ‘जनशताब्दी’प्रमाणे होईल आणि प्रवाशांसाठी ती उपयोगी ठरणार नाही.

वेळ बदलण्यासाठी पाठपुरावाया रेल्वेची सध्याची वेळ कायम राहावी, यासाठी पाठपुरावा केला जाईल. बोगी वाढल्याने कोटा कमी होणार नाही, इतकाच दिलासा आहे.- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती

वेळ बदलावंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेताना जे वेळापत्रक तयार करण्यात आले, ते बदलण्याची मागणी केली जाईल. प्रवाशांना सकाळी ६ वाजता मुंबईसाठी रेल्वे उपलब्ध असावी.- संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना

वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रकस्थानकाचे नाव -२६ ऑगस्टपासून आगमन/ प्रस्थान - सध्याचे आगमन/ प्रस्थानहुजूर साहिब नांदेड - पहाटे ५ वा. -परभणी - ५:४० वा. / ५:४२ वा.-जालना- ७:२० वा./ ०७:२२वा.- पहाटे ५:०५ वा.छत्रपती संभाजीनगर - ८:१३ वा./८:१५वा.- ५:४५वा./५:५० वा.-अंकाई ९:४० वा. - ७:२५ वा.मनमाड जंक्शन ९:५८ वा./ १०:०३वा.- ७:३८ वा./७:४० वा.नाशिक रोड - ११ वा./ ११:०२ वा.-८:३५ वा./८:३७ वा.कल्याण - १:२० वा. / १:२२ वा.-१०:५५ वा/१०:५७ वा.ठाणे - १:४० वा. /१:४२वा.- ११:१० वा/११:१२ वा.दादर - २:०८ वा./ २:१०वा.- ११:३२ वा/११:३४ वा.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई २:२५ वा- ११:५५ वा.

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNandedनांदेडtourismपर्यटन