शहरं
Join us  
Trending Stories
1
"मातृभाषा आईसारखी, तर हिंदी आपल्या आजीसारखी"; भाषा वादावर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण स्पष्टच बोलले!
2
इराणने 2 आठवड्यात देशाबाहेर काढले 5 लाखहून अधिक अफगाण लोक, समोर आलं धक्कादायक कारण!
3
IND vs ENG 3rd Test Day 2 Stumps : केएल राहुलची फिफ्टी; पंतनंही दिला मोठा दिलासा
4
महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत, CM फडणवीसांची माहिती
5
Wimbledon Final: जोकोविचचं विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगले; यानिक सिनरनं एकतर्फी मात देत गाठली फायनल
6
गुलमोहर विश्रामगृहात घबाड सापडल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल; अर्जुन खोतकरांच्या पीएसह दोघांवर कारवाई
7
महिलेनं रस्त्याची मागणी केली, खासदार भलतंच बरळले! म्हणाले- "डिलिव्हरीची तारीख सांगा, एक आठवडा आधीच..."
8
IND vs ENG : करुण नायर पुन्हा स्वस्तात खपला! जो रुटनं सुपर कॅचसह द्रविडचा विश्व विक्रम मोडला
9
"संजय शिरसाट यांची विकेट पडावी म्हणून तिन्ही पक्षात..."; भास्कर जाधवांनी व्यक्त केली शंका
10
दिल्ली-हरियाणा भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरलं; सलग दुसऱ्या दिवशी जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के
11
३० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणारा 'तो' विभागप्रमुख निलंबित; नाशिक जिल्हा परिषदेत १० वर्षांपासून सुरु होता छळ
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

'वंदे भारत'चा नांदेड मुहूर्त ठरला'; एक दिवसात छत्रपती संभाजीनगरहून मुंबई अपडाऊन विसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 17:50 IST

रेल्वेची मनमानी, लोकप्रतिनिधींच्या उदासीनता; वंदे भारत एक्स्प्रेस २६ ऑगस्टपासून सुटणार नांदेडहून

छत्रपती संभाजीनगर : मोठा गाजावाजा करून सुरू केलेली जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस अखेर २६ ऑगस्टपासून नांदेडहून धावणार आहे. ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्यास आणि वेळेत बदल करण्यास तीव्र विरोध झाला. मात्र, त्यानंतरही रेल्वेचा मनमानी कारभार आणि जालना, छत्रपती संभाजीनगरातील लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्यावर शिक्कामोर्तब झाले. याचा सर्वाधिक फटका छत्रपती संभाजीनगरकरांना बसणार आहे. ही रेल्वे नव्या वेळापत्रकानुसार अडीच तास उशिराने सुटेल. परिणामी, शहरवासीयांना रेल्वेने एका दिवसात मुंबईला ये-जा करणे थांबणार आहे.

जनशताब्दी एक्स्प्रेस छत्रपती संभाजीनगरहून जालन्यापर्यंत आणि नंतर हिंगोलीपर्यंत नेण्यात आली. परिणामी, छत्रपती संभाजीनगरकरांचा मुंबईला एका दिवसात ये-जा करणेच थांबले. मात्र, वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाल्यानंतर शहरवासीयांना एका दिवसात मुंबईला ये-जा करणे शक्य झाले; परंतु आता ही रेल्वे नांदेडपर्यंत नेली जात असल्याने मुंबईत मुक्काम करण्याचीच वेळ येईल. वंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेण्याचा आणि वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतल्याचे १२ जून रोजी समजले. मात्र, गेल्या महिनाभरात जालना, छत्रपती संभाजीनगरातील लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा अपुरा पडल्यानेच ही रेल्वे नांदेडहून २६ ऑगस्टपासून सुटण्यावर आणि वेळापत्रकातील बदलावर शिक्कामाेर्तब झाल्याची ओरड सर्वसामान्य प्रवाशांतून होत आहे.

बोगींची संख्या ८ वरून २० वर; पण...सध्या वंदे भारत एक्स्प्रेस ही ८ बोगींची आहे. नांदेडहून सोडताना ती २० बोगींची होईल. त्यामुळे कोटा कमी होणार नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, ही रेल्वे सध्या छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ५:५० वाजता सुटते आणि दुपारी ११:५५ वाजेपर्यंत मुंबईला पोहोचते. नव्या वेळापत्रकानुसार ही रेल्वे छत्रपती संभाजीनगरहून सकाळी ८:१५ वाजता सुटेल आणि दुपारी २:२५ वाजता मुंबईला पोहोचेल. त्यामुळे सकाळी मुंबईला गेल्यानंतर सायंकाळी रेल्वेने परतणे अशक्य आहे. ‘वंदे भारत’ची अवस्था ‘जनशताब्दी’प्रमाणे होईल आणि प्रवाशांसाठी ती उपयोगी ठरणार नाही.

वेळ बदलण्यासाठी पाठपुरावाया रेल्वेची सध्याची वेळ कायम राहावी, यासाठी पाठपुरावा केला जाईल. बोगी वाढल्याने कोटा कमी होणार नाही, इतकाच दिलासा आहे.- अनंत बोरकर, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे कृती समिती

वेळ बदलावंदे भारत एक्स्प्रेस नांदेडपर्यंत नेताना जे वेळापत्रक तयार करण्यात आले, ते बदलण्याची मागणी केली जाईल. प्रवाशांना सकाळी ६ वाजता मुंबईसाठी रेल्वे उपलब्ध असावी.- संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना

वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रकस्थानकाचे नाव -२६ ऑगस्टपासून आगमन/ प्रस्थान - सध्याचे आगमन/ प्रस्थानहुजूर साहिब नांदेड - पहाटे ५ वा. -परभणी - ५:४० वा. / ५:४२ वा.-जालना- ७:२० वा./ ०७:२२वा.- पहाटे ५:०५ वा.छत्रपती संभाजीनगर - ८:१३ वा./८:१५वा.- ५:४५वा./५:५० वा.-अंकाई ९:४० वा. - ७:२५ वा.मनमाड जंक्शन ९:५८ वा./ १०:०३वा.- ७:३८ वा./७:४० वा.नाशिक रोड - ११ वा./ ११:०२ वा.-८:३५ वा./८:३७ वा.कल्याण - १:२० वा. / १:२२ वा.-१०:५५ वा/१०:५७ वा.ठाणे - १:४० वा. /१:४२वा.- ११:१० वा/११:१२ वा.दादर - २:०८ वा./ २:१०वा.- ११:३२ वा/११:३४ वा.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई २:२५ वा- ११:५५ वा.

टॅग्स :Vande Mataramवंदे मातरमchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNandedनांदेडtourismपर्यटन