शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

दुष्काळी उपाययोजनांच्या नावाखाली फसवेपणा

By admin | Updated: April 28, 2016 00:18 IST

औरंगाबाद : राज्यातील भाजप सरकार दुष्काळाविषयी अजिबात गंभीर नाही. दुष्काळासंदर्भात सरकारने आतापर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.

औरंगाबाद : राज्यातील भाजप सरकार दुष्काळाविषयी अजिबात गंभीर नाही. दुष्काळासंदर्भात सरकारने आतापर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. उलट जलयुक्त शिवार, कर्ज पुनर्गठन, सावकारांची कर्जमाफी यासारख्या उपाययोजनांच्या नावाखाली निव्वळ फसवेपणा चालू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज येथे केला. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणीही तटकरे यांनी यावेळी केली. सुनील तटकरे हे बुधवारपासून दुष्काळ पाहणीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. औरंगाबादेत चिकलठाणा विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तटकरे यांनी याप्रसंगी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारने संपूर्ण राज्यात शक्य नसेल तर किमान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तरी पूर्ण कर्जमाफी देणे आवश्यक होते. त्याऐवजी सावकारांचे कर्ज माफ केले. मुळात कायद्याप्रमाणे कोणताही सावकार शेतकऱ्यांना कर्जच देऊ शकत नाही. तरीही त्यांचे कर्ज माफ केले. आता जलयुक्त शिवार अभियानाचा डांगोरा पिटला जात आहे. किती काम झाले याचे मोठमोठे आकडे दिले जात आहेत. परंतु त्यात सत्य दिसत नाही. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ झाले पाहिजे. परंतु अजूनही तसे झालेले नाही, असेही तटकरे म्हणाले. विमानतळावर आ. सतीश चव्हाण, आ. भाऊसाहेब चिकटगावकर, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे आदींनी तटकरे यांचे स्वागत केले. यावेळी प्रदीप साळुंके, विनोद पाटील, अभिजित देशमुख, सुरजितसिंग खुंगर, विलास चव्हाण आदींची उपस्थिती होती. वक्तव्य चुकीचेमहाराष्ट्रातील आधीच्या सरकारने राज्यात शेतकऱ्यांसाठी नाही तर साखर कारखान्यांसाठीच धरणे बांधली, या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या वक्तव्यावरही तटकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, देशाच्या कृषिमंत्र्यांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे. खरे तर गेल्या पन्नास-साठ वर्षांत देशाची जी काही प्रगती झाली आहे, त्यात सहकार क्षेत्राचाही वाटा आहे. सहकार चळवळीमुळे शेतकऱ्यांनाही फायदा झाला, त्यांचे उत्पन्न वाढले. याचा कृषिमंत्र्यांनी विचार केलेला दिसत नाही.