शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी उपाययोजनांच्या नावाखाली फसवेपणा

By admin | Updated: April 28, 2016 00:18 IST

औरंगाबाद : राज्यातील भाजप सरकार दुष्काळाविषयी अजिबात गंभीर नाही. दुष्काळासंदर्भात सरकारने आतापर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.

औरंगाबाद : राज्यातील भाजप सरकार दुष्काळाविषयी अजिबात गंभीर नाही. दुष्काळासंदर्भात सरकारने आतापर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. उलट जलयुक्त शिवार, कर्ज पुनर्गठन, सावकारांची कर्जमाफी यासारख्या उपाययोजनांच्या नावाखाली निव्वळ फसवेपणा चालू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज येथे केला. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणीही तटकरे यांनी यावेळी केली. सुनील तटकरे हे बुधवारपासून दुष्काळ पाहणीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. औरंगाबादेत चिकलठाणा विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तटकरे यांनी याप्रसंगी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारने संपूर्ण राज्यात शक्य नसेल तर किमान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तरी पूर्ण कर्जमाफी देणे आवश्यक होते. त्याऐवजी सावकारांचे कर्ज माफ केले. मुळात कायद्याप्रमाणे कोणताही सावकार शेतकऱ्यांना कर्जच देऊ शकत नाही. तरीही त्यांचे कर्ज माफ केले. आता जलयुक्त शिवार अभियानाचा डांगोरा पिटला जात आहे. किती काम झाले याचे मोठमोठे आकडे दिले जात आहेत. परंतु त्यात सत्य दिसत नाही. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ झाले पाहिजे. परंतु अजूनही तसे झालेले नाही, असेही तटकरे म्हणाले. विमानतळावर आ. सतीश चव्हाण, आ. भाऊसाहेब चिकटगावकर, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे आदींनी तटकरे यांचे स्वागत केले. यावेळी प्रदीप साळुंके, विनोद पाटील, अभिजित देशमुख, सुरजितसिंग खुंगर, विलास चव्हाण आदींची उपस्थिती होती. वक्तव्य चुकीचेमहाराष्ट्रातील आधीच्या सरकारने राज्यात शेतकऱ्यांसाठी नाही तर साखर कारखान्यांसाठीच धरणे बांधली, या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या वक्तव्यावरही तटकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, देशाच्या कृषिमंत्र्यांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे. खरे तर गेल्या पन्नास-साठ वर्षांत देशाची जी काही प्रगती झाली आहे, त्यात सहकार क्षेत्राचाही वाटा आहे. सहकार चळवळीमुळे शेतकऱ्यांनाही फायदा झाला, त्यांचे उत्पन्न वाढले. याचा कृषिमंत्र्यांनी विचार केलेला दिसत नाही.