शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

दुष्काळी उपाययोजनांच्या नावाखाली फसवेपणा

By admin | Updated: April 28, 2016 00:18 IST

औरंगाबाद : राज्यातील भाजप सरकार दुष्काळाविषयी अजिबात गंभीर नाही. दुष्काळासंदर्भात सरकारने आतापर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.

औरंगाबाद : राज्यातील भाजप सरकार दुष्काळाविषयी अजिबात गंभीर नाही. दुष्काळासंदर्भात सरकारने आतापर्यंत कोणत्याही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. उलट जलयुक्त शिवार, कर्ज पुनर्गठन, सावकारांची कर्जमाफी यासारख्या उपाययोजनांच्या नावाखाली निव्वळ फसवेपणा चालू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज येथे केला. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणीही तटकरे यांनी यावेळी केली. सुनील तटकरे हे बुधवारपासून दुष्काळ पाहणीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. औरंगाबादेत चिकलठाणा विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तटकरे यांनी याप्रसंगी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारने संपूर्ण राज्यात शक्य नसेल तर किमान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तरी पूर्ण कर्जमाफी देणे आवश्यक होते. त्याऐवजी सावकारांचे कर्ज माफ केले. मुळात कायद्याप्रमाणे कोणताही सावकार शेतकऱ्यांना कर्जच देऊ शकत नाही. तरीही त्यांचे कर्ज माफ केले. आता जलयुक्त शिवार अभियानाचा डांगोरा पिटला जात आहे. किती काम झाले याचे मोठमोठे आकडे दिले जात आहेत. परंतु त्यात सत्य दिसत नाही. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ झाले पाहिजे. परंतु अजूनही तसे झालेले नाही, असेही तटकरे म्हणाले. विमानतळावर आ. सतीश चव्हाण, आ. भाऊसाहेब चिकटगावकर, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे आदींनी तटकरे यांचे स्वागत केले. यावेळी प्रदीप साळुंके, विनोद पाटील, अभिजित देशमुख, सुरजितसिंग खुंगर, विलास चव्हाण आदींची उपस्थिती होती. वक्तव्य चुकीचेमहाराष्ट्रातील आधीच्या सरकारने राज्यात शेतकऱ्यांसाठी नाही तर साखर कारखान्यांसाठीच धरणे बांधली, या केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या वक्तव्यावरही तटकरे यांनी टीका केली. ते म्हणाले, देशाच्या कृषिमंत्र्यांचे हे वक्तव्य दुर्दैवी आहे. खरे तर गेल्या पन्नास-साठ वर्षांत देशाची जी काही प्रगती झाली आहे, त्यात सहकार क्षेत्राचाही वाटा आहे. सहकार चळवळीमुळे शेतकऱ्यांनाही फायदा झाला, त्यांचे उत्पन्न वाढले. याचा कृषिमंत्र्यांनी विचार केलेला दिसत नाही.