शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सर्वोच्च न्यायालयात मनपाचे नाव वगळले

By admin | Updated: November 8, 2016 01:29 IST

औरंगाबाद : शहर विकास आराखड्यास आव्हान देणाऱ्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने ५ आॅगस्ट रोजी दिलेल्या अंतिम आदेशाला स्थगिती द्यावी किंवा

औरंगाबाद : शहर विकास आराखड्यास आव्हान देणाऱ्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने ५ आॅगस्ट रोजी दिलेल्या अंतिम आदेशाला स्थगिती द्यावी किंवा परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश द्यावेत, या महापालिकेच्या विनंतीवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्या. आदर्शकुमार गोयल यांनी खंडपीठाचे यासंदर्भातील अंतरिम स्थगनादेशच कायम राहतील, असे स्पष्ट करून याचिकांमधील राज्य शासनासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी १० जानेवारी २०१७ रोजी ठेवण्यात आली आहे.औरंगाबाद शहराच्या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात दहा विशेष अनुमती याचिका महापौरांच्या वतीने सादर करण्यात आल्या असून, कारभारी देवकाते आणि इतर यांनीही विशेष अनुमती याचिका सादर केली आहे. या सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी आज झाली. यावेळी गोविंद नवपुते आणि इतरांच्या वतीने म्हणणे मांडण्यात आले की, महापालिकेच्या वतीने महापौरांनी सादर केलेल्या याचिका ‘मेटेंनेबल’ नाहीत. या मुद्यांवर झालेल्या युक्तिवादाअंती महापौरांच्या वकिलांनी सर्व याचिकांमधून औरंगाबाद महापालिकेचे याचिकाकर्ता म्हणून असलेले नाव काढून टाकण्याची विनंती केली. ती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्याने आता सर्वोच्च न्यायालयातील सर्व विशेष अनुमती याचिका केवळ महापौरांतर्फेच चालविल्या जातील.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ५ आॅगस्ट रोजी शासननियुक्त अधिकारी नेमण्याच्या आपल्या आदेशास मनपाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता यावे याकरिता सहा आठवड्यांची स्थगिती दिली होती. ४मात्र, मनपाने सर्वसाधारण सभेने प्रसिद्ध केलेल्या विकास आराखड्यावर आलेल्या आक्षेपांवर कोणताही अंतिम निर्णय घेऊ नये, तसेच प्रारूप विकास आराखड्यातील बदलांआधारे कोणतीही बांधकाम परवानगी देऊ नये, असे प्रतिबंधही मनपावर घातले होते. ४आज झालेल्या सुनावणीदरम्यान या प्रकरणात राज्य शासनाचे काय म्हणणे आहे, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली असता, या प्रकरणात राज्य शासनाला अजून नोटीसच काढण्यात आली नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावर सर्व बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने सर्व प्रतिवादींना नोटीस काढण्याचे आदेश दिले. राज्य शासनाच्या सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना नोटीस द्यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आणि पुढील सुनावणी १० जानेवारी २०१७ रोजी ठेवली.