शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

औरंगाबादसह १३ विमानतळांच्या नामकरणाचा प्रस्ताव;केंद्रात काय चालले आहे,हे खैरेंना माहिती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2022 11:49 IST

हरदीपसिंग पुरी हे नागरी उड्डयनमंत्री असताना विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याच्या मागणीचा प्रस्ताव आला आहे.

औरंगाबाद : राज्यातील औरंगाबादसह कोल्हापूर, शिर्डी विमानतळ नामकरणाचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे आले असून येत्या कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. केंद्र शासनाकडे १३ विमानतळ नामकरणाचे प्रस्ताव आल्याचे त्यांनी नमूद करीत माजी खा. चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire) यांना केंद्रात काय चालले आहे, हे माहिती नसल्याचा टोला लगावला. दोन दिवसांपूर्वी खैरेंनी केंद्रीय नागरी उड्डयनमंत्र्यांना भेटून विमानतळ नामकरणप्रकरणी निवेदन दिले होते.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर डॉ. कराड बुधवारी शहरात आले. यावेळी पत्रकारांनी त्यांना विमानतळ नामकरणप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, हरदीपसिंग पुरी हे नागरी उड्डयनमंत्री असताना विमानतळाचे नाव छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याच्या मागणीचा प्रस्ताव आला आहे. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्र दिले. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने पुन्हा नागरी उड्डयन मंत्रालयाला पत्र देऊन देशात किती विमानतळांचे नामकरणाचे प्रस्ताव आहेत, याची विचारणा केली. त्यानंतर प्रत्येक राज्याला उड्डयन मंत्रालयाने पत्र देऊन माहिती मागविल्यानंतर १३ विमानतळांच्या नामकरणाचे प्रस्ताव असल्याचे समाेर आले. यात औरंगाबादसह, कोल्हापूर आणि शिर्डी प्रस्ताव राज्यातून आहेत, अशी माहिती समोर आली. खात्याचे विद्यमान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया असून पूर्ण एकत्रित प्रस्ताव ते समोर ठेवतील, अशी शक्यता आहे. असे डॉ. कराड यांनी सांगितले.

खैरेंनी राज्य शासनाकडे जोर लावावामाजी खा. खैरे यांनी शहराचे नाव संभाजीनगर करा, यासाठी राज्याच्या कॅबिनेट किंवा विधानसभेने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी जोर लावावा. जेणेकरून विमानतळ आणि जिल्ह्याचे नामकरण सोबतच होऊ शकेल. रेल्वे, पोस्ट खात्यांतर्गतदेखील नावाचा बदल तातडीने होण्याची कार्यवाही होईल.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतAurangabadऔरंगाबादChandrakant Khaireचंद्रकांत खैरेAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ