शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

Namantar Andolan : ‘वसंतराव नाईक महाविद्यालय तर नामांतर चळवळीचे केंद्र बनले होते’ : राजाराम राठोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:46 IST

लढा नामाविस्ताराचा : त्यावेळी मी प्राचार्य मतदारसंघातून विद्यापीठ एक्झिक्युटिव्ह काऊन्सिलवर निवडून गेलो होतो. मला दिवंगत वसंतराव काळे व तरुण प्राध्यापकांचा मोेठा पाठिंबा राहिला. ईसीमध्ये बाबासाहेबांच्या नावाचा ठराव मांडण्याची संधी मला मिळाली. मी स्वत:ला धन्य समजतो. तसेच माझे महाविद्यालय नामांतर चळवळीचे केंद्र बनले, याचाही सार्थ अभिमान आहे. मिलिंद महाविद्यालयही नामांतर चळवळीचे केंद्र बनले होते, असे त्यांनी सांगितले.

- स. सो. खंडाळकर

वसंतराव नाईक महाविद्यालय तर शंभर टक्के नामांतरवादी होते. किंबहुना ते नामांतर चळवळीचे मुख्य केंद्र बनले होते. याचा मला काल, आज आणि उद्याही अभिमान आहे, अशा शब्दांत या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजाराम राठोड यांनी आपली बांधिलकी जाहीर केली. राजाराम राठोड हे आज वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.

राठोड यांनी प्रारंभापासूनच पुरोगामी विचारसरणीशी आपली नाळ घट्ट करून ठेवली आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापक हा नामांतरवादी होता. इतकेच नाही तर नामांतर लढ्याच्या अग्रभागी होता. दिवंगत प्रा. बापूराव जगताप, कबीरांच्या दोह्यांचे गाढे अभ्यासक प्रा. मोतीराज राठोड, प्रा. सुरेश पुरी, दिवंगत प्रा. जवाहर राठोड आदींनी, तर नामांतर चळवळीत सक्रिय सहभाग घेत नेतृत्वही केले. या सहभागातूनच प्रा. बापूराव जगताप यांनी ‘निळ्या पहाडाच्या कविता’ साकारल्या. मोतीराज आणि जवाहर राठोड यांनीही विपुल साहित्य लिहिले. नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकमतशी बोलताना प्राचार्य राठोड यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. 

१९७७ साली विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काऊन्सिलमध्ये नामांतराचा ठराव मंजूर झाल्यानंतर एक्झिक्युटिव्ह काऊन्सिलमध्ये हा ठराव मी मांडला. त्याला अहमदपूरचे किशनराव देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यावेळी शिवाजीराव  भोसले नव्हे तर दुसरे भोसले हे कुलगुरू होते. हे सारे रेकॉर्डवर आहे. एमसी आणि ईसीमध्ये ठराव मंजूर झाल्यानंतर नामांतर होईल, असा एक समज; परंतु तो खरा नव्हता. त्याकाळी वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. विद्यापीठात ठराव मंजूर झाल्यानंतर राज्याच्या विधिमंडळात हा ठराव २७ जुलै १९७८ रोजी मंजूर झाला आणि या ठरावाचे स्वागत होण्याऐवजी दंगली उसळू लागल्या. दलितांच्या घरादारांची राखरांगोळी सुरू झाली. हे सारेच मोठे दु:खदायी. वेदना देणारे होते, असे राजाराम राठोड यांनी नमूद केले.  नामांतराच्या निमित्ताने अन्याय-अत्याचाराच्या घटना कानावर येत होत्या. अत्याचारग्रस्तांना मदत व्हावी या भूमिकेतून आमची धडपड चाललेली असायची. अ‍ॅड. अंकुश भालेकर यांच्या गावापर्यंत जाऊन आम्ही ही मदत पुवरली होती, अशी आठवण राजाराम राठोड यांनी सांगितली.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा