शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Namantar Andolan : ‘वसंतराव नाईक महाविद्यालय तर नामांतर चळवळीचे केंद्र बनले होते’ : राजाराम राठोड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:46 IST

लढा नामाविस्ताराचा : त्यावेळी मी प्राचार्य मतदारसंघातून विद्यापीठ एक्झिक्युटिव्ह काऊन्सिलवर निवडून गेलो होतो. मला दिवंगत वसंतराव काळे व तरुण प्राध्यापकांचा मोेठा पाठिंबा राहिला. ईसीमध्ये बाबासाहेबांच्या नावाचा ठराव मांडण्याची संधी मला मिळाली. मी स्वत:ला धन्य समजतो. तसेच माझे महाविद्यालय नामांतर चळवळीचे केंद्र बनले, याचाही सार्थ अभिमान आहे. मिलिंद महाविद्यालयही नामांतर चळवळीचे केंद्र बनले होते, असे त्यांनी सांगितले.

- स. सो. खंडाळकर

वसंतराव नाईक महाविद्यालय तर शंभर टक्के नामांतरवादी होते. किंबहुना ते नामांतर चळवळीचे मुख्य केंद्र बनले होते. याचा मला काल, आज आणि उद्याही अभिमान आहे, अशा शब्दांत या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजाराम राठोड यांनी आपली बांधिलकी जाहीर केली. राजाराम राठोड हे आज वसंतराव नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत.

राठोड यांनी प्रारंभापासूनच पुरोगामी विचारसरणीशी आपली नाळ घट्ट करून ठेवली आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्रत्येक प्राध्यापक हा नामांतरवादी होता. इतकेच नाही तर नामांतर लढ्याच्या अग्रभागी होता. दिवंगत प्रा. बापूराव जगताप, कबीरांच्या दोह्यांचे गाढे अभ्यासक प्रा. मोतीराज राठोड, प्रा. सुरेश पुरी, दिवंगत प्रा. जवाहर राठोड आदींनी, तर नामांतर चळवळीत सक्रिय सहभाग घेत नेतृत्वही केले. या सहभागातूनच प्रा. बापूराव जगताप यांनी ‘निळ्या पहाडाच्या कविता’ साकारल्या. मोतीराज आणि जवाहर राठोड यांनीही विपुल साहित्य लिहिले. नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर लोकमतशी बोलताना प्राचार्य राठोड यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. 

१९७७ साली विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काऊन्सिलमध्ये नामांतराचा ठराव मंजूर झाल्यानंतर एक्झिक्युटिव्ह काऊन्सिलमध्ये हा ठराव मी मांडला. त्याला अहमदपूरचे किशनराव देशमुख यांनी अनुमोदन दिले. त्यावेळी शिवाजीराव  भोसले नव्हे तर दुसरे भोसले हे कुलगुरू होते. हे सारे रेकॉर्डवर आहे. एमसी आणि ईसीमध्ये ठराव मंजूर झाल्यानंतर नामांतर होईल, असा एक समज; परंतु तो खरा नव्हता. त्याकाळी वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते. विद्यापीठात ठराव मंजूर झाल्यानंतर राज्याच्या विधिमंडळात हा ठराव २७ जुलै १९७८ रोजी मंजूर झाला आणि या ठरावाचे स्वागत होण्याऐवजी दंगली उसळू लागल्या. दलितांच्या घरादारांची राखरांगोळी सुरू झाली. हे सारेच मोठे दु:खदायी. वेदना देणारे होते, असे राजाराम राठोड यांनी नमूद केले.  नामांतराच्या निमित्ताने अन्याय-अत्याचाराच्या घटना कानावर येत होत्या. अत्याचारग्रस्तांना मदत व्हावी या भूमिकेतून आमची धडपड चाललेली असायची. अ‍ॅड. अंकुश भालेकर यांच्या गावापर्यंत जाऊन आम्ही ही मदत पुवरली होती, अशी आठवण राजाराम राठोड यांनी सांगितली.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा