शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

Namantar Andolan : नामांतर लढ्यातील या दिग्गज दिवंगतांच्या योगदानाला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:58 IST

नामांतर प्रश्नाचे भलेबुरे अनुभव गाठीशी बांधत हा रौप्य महोत्सव साजरा करीत असताना या लढ्यातील दिवंगतांचे योगदान विसरणे हा कृतघ्नपणाच ठरेल.

औरंगाबाद : यंदाचे हे विद्यापीठ नामविस्ताराचे रौप्यमहोत्सवी वर्ष. नामांतर प्रश्नाचे भलेबुरे अनुभव गाठीशी बांधत हा रौप्य महोत्सव साजरा करीत असताना या लढ्यातील दिवंगतांचे योगदान विसरणे हा कृतघ्नपणाच ठरेल. कितीतरी जणांनी यात आपले योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना विनम्र सलामच. 

ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत व नेते कॉ. चंद्रगुप्त चौधरी आणि त्यांच्या पत्नी कॉ. करुणाभाभी चौधरी आज हयात नाहीत; पण हे दोघेही सामाजिक बांधिलकी ठेवून आयुष्यभर श्रमिक, कष्टकरी व उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहिले. मग नामांतरासारख्या समतेच्या लढ्यात ते नसतील तरच नवल. 

बापूसाहेब काळदाते आणि सुधा काळदाते ही जोडीही अशीच. आयुष्यभर त्यांनी दीनदलित, गोरगरिबांचीच चिंता वाहिली. ही जोडी पण नामांतराच्या लढ्यात अग्रभागी राहिली. दिवंगत बापूसाहेब काळदाते यांच्या विद्वतापूर्ण व ओजस्वी भाषणांनी त्याकाळी एक पिढी घडत गेली. म. भि. चिटणीस आणि म. य. ऊर्फ बाबा दळवी यांचे योगदान तर वादातीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास, विश्वास लाभलेले म. भि.सर तर नामांतरवादी कृती समितीचे अध्यक्ष राहिले. मोठ-मोठे मोर्चे त्यांच्या नेतृत्वाखाली निघाले. पुढे अध्यक्षपदाची धुरा अ‍ॅड. अंकुश भालेकर यांनी सांभाळली. म. य. ऊर्फ बाबा दळवी हे तर प्रारंभापासूनच लोकमतसारख्या मोठ्या दैनिकातून आपली लेखणी नामांतराच्या बाजूने चालवत होते. इतकेच नाही तर प्रत्यक्ष लढ्यातही ते सक्रिय राहिले होते. 

दिवंगत प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे हेही नामांतरवादी. नामांतरासाठी कारावास भोगलेले. दिवंगत प्राचार्य गजमल माळी यांचीही या लढ्यात महत्त्वाची भूमिका राहिली. माजी आमदार दिवंगत वसंतराव काळे यांनी तर विद्यापीठात नामांतराचा ठराव मांडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय हे पक्के आंबेडकरवादी. नामांतर लढ्यातही ते सक्रिय राहिले. माजी राज्यमंत्री दिवंगत अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर हे नामांतर लढ्याचे नेतृत्व करीत होते. कारावासही भोगत होते. 

आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्रा. एस. टी. प्रधान. ते रिपब्लिकन चळवळीत वाढलेले. पुढे काँग्रेसवासी झालेले; पण नामांतराची भूमिका त्यांनी सोडली नाही. याच मुद्यावरून त्यांना विधानसभा निवडणुकीत फटकाही बसला. जगन कांबळे, भाई चंद्रकांत जाधव, भीमराव जाधव, प्रा. अनंत मांजरमकर, प्रकाश जावळे, अ‍ॅड. प्रवीण वाघ, तातेराव ससाणे, पत्रकार प्रकाश देशमुख या दिवंगतांचा नामांतर लढ्यातील सहभाग आणि योगदान मोलाचेच. त्यांचे स्मरण आज झाल्याशिवाय राहत नाही. 

डॉ. गंगाधर पानतावणे आणि प्रा. अविनाश डोळस आज नाहीत. आपल्या लिखाणाद्वारे आणि व्याख्यानांद्वारे त्यांनी नामांतराची ज्योत सतत प्रज्वलित ठेवली. वसंतराव नाईक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक दिवंगत बापूराव जगताप यांनी नामांतराचा झंझावात महाराष्ट्रभर पोहोचवला.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा