शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Namantar Andolan : नामांतर लढ्यातील या दिग्गज दिवंगतांच्या योगदानाला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:58 IST

नामांतर प्रश्नाचे भलेबुरे अनुभव गाठीशी बांधत हा रौप्य महोत्सव साजरा करीत असताना या लढ्यातील दिवंगतांचे योगदान विसरणे हा कृतघ्नपणाच ठरेल.

औरंगाबाद : यंदाचे हे विद्यापीठ नामविस्ताराचे रौप्यमहोत्सवी वर्ष. नामांतर प्रश्नाचे भलेबुरे अनुभव गाठीशी बांधत हा रौप्य महोत्सव साजरा करीत असताना या लढ्यातील दिवंगतांचे योगदान विसरणे हा कृतघ्नपणाच ठरेल. कितीतरी जणांनी यात आपले योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना विनम्र सलामच. 

ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत व नेते कॉ. चंद्रगुप्त चौधरी आणि त्यांच्या पत्नी कॉ. करुणाभाभी चौधरी आज हयात नाहीत; पण हे दोघेही सामाजिक बांधिलकी ठेवून आयुष्यभर श्रमिक, कष्टकरी व उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहिले. मग नामांतरासारख्या समतेच्या लढ्यात ते नसतील तरच नवल. 

बापूसाहेब काळदाते आणि सुधा काळदाते ही जोडीही अशीच. आयुष्यभर त्यांनी दीनदलित, गोरगरिबांचीच चिंता वाहिली. ही जोडी पण नामांतराच्या लढ्यात अग्रभागी राहिली. दिवंगत बापूसाहेब काळदाते यांच्या विद्वतापूर्ण व ओजस्वी भाषणांनी त्याकाळी एक पिढी घडत गेली. म. भि. चिटणीस आणि म. य. ऊर्फ बाबा दळवी यांचे योगदान तर वादातीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास, विश्वास लाभलेले म. भि.सर तर नामांतरवादी कृती समितीचे अध्यक्ष राहिले. मोठ-मोठे मोर्चे त्यांच्या नेतृत्वाखाली निघाले. पुढे अध्यक्षपदाची धुरा अ‍ॅड. अंकुश भालेकर यांनी सांभाळली. म. य. ऊर्फ बाबा दळवी हे तर प्रारंभापासूनच लोकमतसारख्या मोठ्या दैनिकातून आपली लेखणी नामांतराच्या बाजूने चालवत होते. इतकेच नाही तर प्रत्यक्ष लढ्यातही ते सक्रिय राहिले होते. 

दिवंगत प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे हेही नामांतरवादी. नामांतरासाठी कारावास भोगलेले. दिवंगत प्राचार्य गजमल माळी यांचीही या लढ्यात महत्त्वाची भूमिका राहिली. माजी आमदार दिवंगत वसंतराव काळे यांनी तर विद्यापीठात नामांतराचा ठराव मांडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय हे पक्के आंबेडकरवादी. नामांतर लढ्यातही ते सक्रिय राहिले. माजी राज्यमंत्री दिवंगत अ‍ॅड. प्रीतमकुमार शेगावकर हे नामांतर लढ्याचे नेतृत्व करीत होते. कारावासही भोगत होते. 

आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे प्रा. एस. टी. प्रधान. ते रिपब्लिकन चळवळीत वाढलेले. पुढे काँग्रेसवासी झालेले; पण नामांतराची भूमिका त्यांनी सोडली नाही. याच मुद्यावरून त्यांना विधानसभा निवडणुकीत फटकाही बसला. जगन कांबळे, भाई चंद्रकांत जाधव, भीमराव जाधव, प्रा. अनंत मांजरमकर, प्रकाश जावळे, अ‍ॅड. प्रवीण वाघ, तातेराव ससाणे, पत्रकार प्रकाश देशमुख या दिवंगतांचा नामांतर लढ्यातील सहभाग आणि योगदान मोलाचेच. त्यांचे स्मरण आज झाल्याशिवाय राहत नाही. 

डॉ. गंगाधर पानतावणे आणि प्रा. अविनाश डोळस आज नाहीत. आपल्या लिखाणाद्वारे आणि व्याख्यानांद्वारे त्यांनी नामांतराची ज्योत सतत प्रज्वलित ठेवली. वसंतराव नाईक महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक दिवंगत बापूराव जगताप यांनी नामांतराचा झंझावात महाराष्ट्रभर पोहोचवला.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा