शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Namantar Andolan : ‘पँथर्सनी प्रारंभापासून ते शेवटपर्यंत नामांतर किल्ला लढवला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 12:21 IST

लढा नामविस्ताराचा : ‘पँथर्सनी जेल भोगले, मार खाल्ला, संसार सोडले, नोकऱ्या सोडल्या, सर्वस्वी त्याग केला. दलितांचे आक्राळ विक्राळ रूप पाहून सरकारला नामांतर करणे भाग पडले. म्हणून स्वताकदीवर जिंकलेल्या या स्वाभिमानी लढाईचा प्रत्येक दलितास अभिमान वाटतो’ असे नामांतर लढ्याचे अग्रणी व माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांनी सांगितले. 

- स. सो. खंडाळकर

गंगाधर गाडे हे नामांतर लढ्याचे अग्रणी राहिले आहेत. कितीतरी मोर्चे, आंदोलने, सत्याग्रह करून त्यांनी शेवटी नामविस्तार पदरात पाडून घेतला. या लढ्यातल्या एक ना अनेक कितीतरी आठवणी त्यांच्याकडे. एका दमात काय आणि किती सांगणार! पण ते सांगण्यापेक्षा या लढ्यातल्या प्रत्येकालाच त्यांनी केलेला त्याग, संघर्ष माहीत आहे. ते किती लढाऊ पँथर होते, त्यांची झेप कशी भल्याभल्यांना गारद करीत होती, हा स्वतंत्र  विषय होऊ शकतो. नामांतर लढ्यातील गंगाधर गाडे यावरच एक भले मोठे पुस्तक होऊ शकते. आजही गंगाधर गाडे आणि नामांतर हे समीकरण कुणी विसरू शकत नाही. 

१९७७ साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील बीडचा कार्यक्रम आटोपून औरंगाबाद मार्गे मुंबईकडे जाणार होते. विमानतळाच्या रस्त्यावर मी आणि पँथर कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडले. मी स्वत: वसंतदादांच्या गाडीवर झेप घेतली. गाडीसमोर आडवा पडलो. त्याचवेळी पोलिसांनी लाठीमार सुरू केला. अशाही वेळी मी वसंतदादा पाटील यांची गाडी ओढत होतो. माझी बोटे चिरली. 

हात रक्तबंबाळ झाला. अंगावर जखमा झाल्या. पोलिसांच्या लाठ्यांनी संपूर्ण शरीर हिरवे-निळे झाले. रक्त गोठले. या आंदोलनात महिला आपल्या कच्च्याबच्च्यांसह आडव्या पडल्या. कोवळी बालके गाडीसमोर भिरकावण्यात आली. उस्मानपुरा भागातील जमनाबाई गायकवाड यांची मुलगी कायमची अपंग झाली, असा अंगावर शहारे आणणारा प्रसंग गाडे यांनी यावेळी कथन केला. नामविस्ताराच्या रौप्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते.त्यांनी सांगितले, महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे हे स्वप्न पाहत होतो.

नवस्थापित पँथरचे सरचिटणीस या नात्याने ही मागणी मी ७ जुलै १९७७ रोजी केली. या मागणीसाठी पत्रके वाटणे, निदर्शने करणे, शिष्टमंडळे घेऊन जाणे, सभा-बैठका आयोजित करणे हे सातत्याने सुरू ठेवले. वसंतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार ही मागणी एखाद्या समाजापुरती मर्यादित ठेवू नका. तिला व्यापक रूप द्या आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे असे की, ही मागणी विद्यापीठामार्फत केली तर आणखी बरे होईल. तेव्हापासून ते नामविस्तार करण्यापर्यंतच्या घटना घडामोडींचा मी साक्षीदार राहिलो. किंबहुना यात माझी कामगिरी व मी केलेला संघर्ष ठळक राहिला. 

नांदेडला गौतम वाघमारे यांनी स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन केले. त्या घटनेने तर पुन्हा महाराष्ट्र हादरला. नामांतरासाठी वेळोवेळी केलेले बंद, काढलेले मोर्चे आजही आठवतात. बाबासाहेबांसारख्या महामानवाच्या नावासाठी, सामाजिक समतेसाठी, परिवर्तनासाठी, दलितांच्या स्वाभिमानासाठी १६ वर्षे हा लढा लढावा लागला. त्यासाठी खस्ता खाव्या लागल्या. अनेकांना जिवाची कुर्बानी द्यावी लागली.  

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा