शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Namantar Andolan : अत्याचाराला बळी पडलेल्यांची सिद्धार्थनगरमध्येच नामांतर कॉलनी वसवली : दौलत खरात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 12:59 IST

लढा नामविस्ताराचा : आणीबाणी संपल्यानंतर दलित पँथरतर्फे काय कृती कार्यक्रम सुरू करायचा यावर औरंगाबादेत आठवले वाड्यावर बैठक झाली. त्यातली चर्चा संपल्यानंतर आम्ही सारे कार्यकर्ते म.भि. चिटणीसांकडे गेलो. नामांतराच्या मुद्यावर लढा उभा करायला काहीच हरकत नाही, असा सल्ला त्यांनी दिला. त्यानंतर मग आम्ही प्राचार्य राजाराम राठोड यांच्याकडे आलो. त्यांनाही आमचे म्हणणे पटले. इतकचे नव्हे, तर त्यांनी आम्हाला सतत आर्थिक सहकार्यही केले. त्यावेळी या लढ्याचे एवढे गांभीर्य वाटत नव्हते. विद्यार्थी हाच याचा कणा होता. तेच त्यात सहभागी होत असत.

- स. सो. खंडाळकर

बदनापूरजवळील अकोला निकळक व गंगापूर तालुक्यातील आपेगावच्या दलितांच्या घरादारांची राखरांगोळी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे पुनवर्सन करणे गरजेचे होते. ज्या गावाने आमची घरेदारे जाळली, तेथे आम्ही पुन्हा राहायला जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. जिल्हा प्रशासनातर्फे हर्सूलच्या नदीत त्यांना राहण्यासाठी तात्पुरती जागा देण्यात आली; परंतु ती जागाही राहण्यायोग्य नसल्याने मी स्वत: पुढाकार घेऊन सिद्धार्थनगरातील जागा दिली. एकूण ३७ कुटंबांची त्याठिकाणी राहण्याची सोय केली. नामांतर कॉलनी म्हणून ही वसाहत ओळखली जाऊ लागली. पुढे माझी पत्नी नगरसेविका झाल्यानंतर नामांतर कॉलनीची कमान उभी केली गेली, अशी माहिती तत्कालीन दलित पँथरचे नेते व आता ‘रिपाइं-ए’चे वरिष्ठ नेते दौलत खरात यांनी दिली. नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘लोकमत’शी ते बोलत होते. 

‘लोकमत’मुळे ताकद मिळाली त्यांनी सांगितले की, १९८२ साली ‘लोकमत’औरंगाबादहून सुरू झाला आणि नामांतरवाद्यांना एक मोठी ताकद मिळाली. ‘लोकमत’मुळे नामांतर विरोधाची धार बोथट व्हायला फार मोठी मदत झाली. त्याआधी नामांतराच्या विरोधात विषारी लिखाण होत होते. दंगली भडकाविण्यास हे लिखाणच कारणीभूत होत गेले. ‘लोकमत’मुळे नामांतर लढ्याला बळ मिळाले आणि ही लढाई जोरात सुरू होऊन रंगत गेली व त्यात यशही मिळाले. नामांतर लढ्यामुळे दलित कार्यकर्ता धीट व स्वाभिमानी बनला. 

दलितांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले आणि देशभरात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची विद्यापीठे सुरू होत गेली. हे एक प्रकारचे मोठे योगदानच होय. शिवाय या लढ्यात जे शहीद झाले, त्यांची कुटुंबे खचून न जाता तेवढ्याच ताकदीने उभी राहिली. उलट त्यांना लढ्यातील बलिदानाबद्दल गर्व वाटू लागला. विद्यापीठ सिनेटमध्ये नामांतराचा ठराव संमत झाला, त्यादिवशी स.भु.च्या मैदानावरून मोठा मोर्चा काढण्यात आला होता. त्याचे नेतृत्व मी करीत होतो. पुढे २७ जुलै १९७८ रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत नामांतर ठराव मंजूर झाला आणि मराठवाडाभर दंगली उसळल्या, असा घटनाक्रम दौलत खरात एक-एक करून उलगडून सांगत होते. 

त्यांनी सांगितले, ६ डिसेंबर १९७९ च्या क्रांतीचौकातील सत्याग्रहात मलाही अटक करून हर्सूल जेलमध्ये ठेवण्यात आले. पुढे दलित पँथरच्या माध्यमातून आंदोलने होत राहिली. त्यात  माझा हिरीरीचा  सहभाग राहत असे. माईसाहेब आंबेडकर यांना अटक झाली. त्यावेळी आम्ही कार्यकर्ते त्यांच्याबोरबर जेलमध्ये राहिलो. किंबहुना हर्सूल जेलमध्ये एक ओपन जेलच उघडून त्याठिकाणी कार्यकर्त्यांना ठेवले जात असे.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा