शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

Namantar Andolan : ‘नामांतर आंदोलन हे माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन’ : निशा शिवूरकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 16:54 IST

लढा नामाविस्ताराचा : १४ जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाच्या बातम्या आल्या की, नामांतर आंदोलनाच्या आठवणी जाग्या होतात. नामांतर आंदोलन हे माझ्या आयुष्यातील पहिले आंदोलन होते. त्या काळात औरंगाबाद शहर नामांतरमय झाले होते. १९८० मध्ये माझ्यावर नामांतरवादी कृती समितीच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली. हे माझे पहिले सार्वजनिक पद. म.भि. चिटणीस यांच्या उपस्थितीत मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणात रोज बैठका होत. अशाच बैठका शहरातही होत. सतत कार्यक्रम सुरू असत, अशा शब्दांत अ‍ॅड. निशा शिवूरकर यांनी नामांतर लढ्यातील आपल्या आठवणींना उजाळा दिला. 

ठळक मुद्देत्यावेळी आम्ही समतेचे स्वप्न पाहिले होते... 

- स. सो. खंडाळकर

अ‍ॅड. निशा शिवूरकर यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. प्राचार्य उल्हास शिवूरकर हे त्यांचे भाऊ. अलीकडेच ते स.भु. शिक्षण संस्थेचे सहचिटणीस झाले. सध्या अ‍ॅड. शिवूरकर या संगमनेरला असतात. 

नामांतर आंदोलनातील घटनांचे प्रतिबिंब... अ‍ॅड. शिवूरकर म्हणाल्या, याच काळात मी दलित युवक आघाडी आणि दलित थिएटरसोबत काम करीत होते. अनेक कवी व लेखक नामांतराच्या पार्श्वभूमीवर लिहीत होते. मी विद्यापीठात एमबीए करीत होते. दलित थिएटरमार्फत आम्ही पथनाट्य करीत असत. आमच्या नाटकांमध्ये नामांतर आंदोलनातील घटनांचे प्रतिबिंब उमटत असे. विद्यापीठात नामांतरवादी व नामांतरविरोधी विद्यार्थ्यांचे गट आपापल्या आघाड्यांवर कार्यक्रम घेत असत; पण एकमेकांशी वागताना तणाव नसायचा.  

...आणि फलक लावला! एकदा, मी, प्रकाश सिरसाट, प्रा. साहेबराव गायकवाड, प्रा. अविनाश डोळस आणि अन्य मित्रांनी ठरवून रात्री १२ वा. विद्यापीठ गेटवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असा फलक लावला. दुसऱ्या दिवशी गेटवर मोठी गर्दी जमायला लागली. नामांतर झालेच पाहिजे अशा आम्ही घोषणा दिल्या. पोलिसांनी येऊन फलक काढला. नामांतर आंदोलनात तरुणांचा सहभाग मोठा होता. यात सवर्ण तरुणही होते. नामांतर आंदोलनाने भारतीय जातिव्यवस्थेच्या संदर्भात चिकित्सेच्या विचारांना बळ दिले. नामांतर आंदोलन फक्त मराठवाड्यापुरते मर्यादित नव्हते. महाराष्टÑभर पसरले होते. ठिकठिकाणचे समाजवादी, साम्यवादी व पुरोगामी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होते, असे त्यांनी नमूद केले.  

विलास ढाणेची आत्महत्या अ‍ॅड. शिवूरकर यांनी सांगितले, मला साताऱ्याचा तरुण मित्र विलास ढाणेची आठवण येत आहे. विलास समाजवादी युवक दलाचा कार्यकर्ता. संवेदनशील मनाचा. त्याने नामांतरासाठी आत्महत्या केली. त्याच्या खिशातील चिठ्ठीत‘ नामांतर होईल, असे वाटत नाही, म्हणून मी आत्महत्या करतोय,’ असे लिहिलेले होते. त्याच्या मृत्यूने आंदोलनातील सर्वांनाच चटका लागला. 

१९८१ ला मी संगमनेरला आले. आम्ही संगमनेरला नामांतरवादी कृती समितीची स्थापना केली. त्या माध्यमातून मोर्चा, जेलभरो, सभा सतत सुरू असे. सप्टेंबर १९८२ ला मुंबईत झालेला सत्याग्रह हा नामांतर लढ्यातील महत्त्वाचा टप्पा. या सत्याग्रहाच्या संयोजनाची जबाबदारी साथी महमंद खडस, गजानन खातू, प्रा. संजय म.गो., संजीव साने, मनोहर कदम आदी मित्रांवर होती. मीही सत्याग्रहाच्या तयारीसाठी महिनाभर मुंबईत राहिले. मुंबईच्या वस्त्यांची मला तेव्हाच माहिती झाली. दिवसभर सत्याग्रह व संध्याकाळी दुसऱ्या दिवसाचे नियोजन असा धबडगा होता. फार धावपळीचे अन् आंदोलनाच्या शिक्षणाचे दिवस होते ते, असे सांगत शिवूरकर म्हणाल्या, २०१४ नंतर अस्मितेच्या नावाने देशात गावांची, शहरांची, रस्त्यांची आणि रेल्वेस्थानकांची नावे बदलण्याची लाटच आली आहे. देशातील अल्पसंख्याक समूहांना लक्ष्य बनविण्यासाठी नामांतरे केली जात आहेत. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा तर हा राजकीय कार्यक्रम बनला आहे. अशी नामांतरे देशाच्या इतिहासाशी व देशातील गंगा-जमुना संस्कृतीशी प्रतारणा करणारी आहेत. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे म्हणून चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांपुढे समतेचे स्वप्न होते. मराठवाड्यात शिक्षणाचा वटवृक्ष उभा करणाऱ्या बाबासाहेबांचे स्मारक विद्यापीठाच्या रूपात उभे राहावे, ही तळमळ होती. 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा