शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Namantar Andolan : नामांतर लढ्यात ‘लोकमत’चा बहुमोल वाटा : रतन पंडागळे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:50 IST

लढा नामविस्ताराचा : विद्यापीठ नामांतर लढा आणि ‘लोकमत’ हे जणू त्याकाळी समीकरणच बनले होते. ‘लोकमत’ने अत्यंत जाणीवपूर्वक नामांतराची भूमिका घेतली. या लढ्यात ‘लोकमत’चा वाटा बहुमोल राहिला, याबद्दल दुमत नाहीच. ‘लोकमत’च्या खंबीर पाठिंब्यामुळेच हा लढा यशस्वीपणे लढता आला, असे उद्गार या लढ्यातील एक सेनानी रतनकुमार पंडागळे यांनी काढले. 

- स. सो. खंडागळे 

बघता-बघता या नामांतराला २५ वर्षे झाली; पण नव्या पिढीला नामांतराचा जाज्वल्य इतिहास कळावा म्हणून माझे प्रयत्न सुरू असतात. त्याचाच एक भाग म्हणून १७ सप्टेंबर २००६ रोजी ‘नामांतर पर्व’ हा ग्रंथ  प्रकाशित केला, तसेच ‘लढा नामांतराचा’ हा चित्रपटही प्रदर्शित केला, असे त्यांनी सांगितले. 

विद्यापीठ नामांतर रौप्य महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते ‘लोकमत’शी बोलत होते. दरवर्षी नामांतरदिनी जयभीमनगर चौकात या लढ्यातील दलितेतर नामांतरवाद्यांच्या योगदानाबद्दल सन्मान सोहळा आयोजित करण्यात येत असतो. यावर्षी हा सोहळा १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वा. होईल. त्यात बॅ. जवाहर गांधी, प्राचार्य राजाराम राठोड, प्रा. श्रीराम जाधव व माजी उपमहापौर तकी हसन यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघातर्फे स्मृतिचिन्ह देऊन व निळा फेटा बांधून सन्मान करण्यात येणार असल्याची माहितीही पंडागळे यांनी दिली. त्यांनी सांगितले की, नामांतर लढ्यातील शहीद पोचिराम कांबळे यांच्या पत्नी व सुनेने गतवर्षी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यांचा सत्कार करून त्यांना अर्थसाहाय्यही दिले होते.

त्यांनी सांगितले की, आम्ही सारे त्यावेळी दलित पँथरच्या वतीने या लढाईत सहभागी झालेलो होतो. जयभीमनगर तर नामांतर लढ्याचे केंद्र बनले होते, तसेही ते पूर्वीपासून आंबेडकरी चळवळीचे केंद्र आहेच, असे सांगत पंडागळे हे नामांतर लढ्यातील ‘लोकमत’च्या बहुमोल सहकार्याकडे पुन्हा वळले. यासंदर्भातील ‘लोकमत’ची सामाजिक बांधिलकी वाखाणण्यासारखी राहिली. एकीकडे काही वर्तमानपत्रे आगीत तेल ओतून नामांतराच्या प्रश्नावरून समाजा-समाजांत उभी दरी निर्माण करण्यात पुरुषार्थ मानत होती, तर त्याचवेळी  दिवंगत आदरणीय जवाहरलालजी दर्डा, तसेच विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांच्या खंबीर भूमिकेमुळे ‘लोकमत’च जणू  ‘नामांतर योद्धा’ बनून लढत राहिला.

तत्कालीन कार्यकारी संपादक दिवंगत म.य. ऊर्फ बाबा दळवी यांच्या वेळोवेळच्या अग्रलेखांनी हा लढा दिवसेंदिवस वैचारिक बनत गेला. ‘लोकमत’चीही कर्तबगारी नामांतर व आंबेडकरी चळवळ कधीच विसरू शकणार नाही. भीमसैनिक भीमऊर्जेने  पेटून उठले होते.  औरंगाबादेत व मुंबईत कितीतरी वेळा मोर्चे काढले गेले, सत्याग्रह केला गेला. कारावास झाला. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला व माझ्या सहकाऱ्यांना सहभागी होता आले. बाबासाहेबांच्या नावासाठी एवढा प्रदीर्घ संघर्ष करावा लागायला नको होता; पण तो करावा लागला, एवढे मात्र खरे!

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा