शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Namantar Andolan : नामांतराच्या लोकलढ्यात लोकमानस घडविण्यात ‘लोकमत’च अग्रेसर

By शांतीलाल गायकवाड | Updated: January 14, 2019 14:02 IST

मराठवाड्यात दीनदलितांच्या जीवनमरणाचे प्रश्नही लोकमतने वेशीला टांगले. मराठवाडा भूमीशी सेवा समर्पणाच्या भावनेने समरस  होऊन लोकमतने समाज प्रबोधनाचा घेतलेला वसा नामविस्तार होईपर्यंत १६ वर्षे सातत्याने माध्यमाच्या पातळीवर अक्षरश: एक हातीच लढला. त्यात आजही खंड नाही. 

‘ खींचो न कमानोंको न तलवार निकालोजब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो’  

अकबर इलाहाबादी यांचा हा शेर असो की, संत तुकडोजी महाराजांनी  ग्रामगीतेत म्हटल्यानुसार,  ‘न धरी हाती तलवार, बुद्ध राज्य करी जगावरीकारण असे एक, प्रचार’ . 

हा अभंग असो...ही कवने माध्यमांचे महत्व प्रचार, प्रसार करून जनमत  घडविण्यात अनन्यसाधारण असेच असल्याचे सांगते. नामांतराच्या मुद्द्यावरून मराठवाड्यात उसळलेला आगडोंब हा जातीच्या स्फोटक दारू कोठारावर प्रसारमाध्यमांनी, वृत्तपत्रांनी टाकलेल्या ठिणगीचे अमानवी रुपच होते. वृत्तपत्राच्या आगलाव्या, विषमतावादी व एकांगी भूमिकेमुळे मराठवाड्यातील दलित-नवबौद्धावर अनन्वीत अत्याचार झाले.  हा काळाकुट्ट इतिहास ताजा आहे. 

९ जानेवारी १९८२ रोजी मराठवाड्यात लोकमतचे आगमन होईपर्यंत नामांतर लढ्याने मन व मतभेदासह असहिष्णुतेचा प्रारंभिक अध्याय लिहून  काढला होता. महाराष्ट्राच्या १५० वर्षातील आगरकर, फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांनी  घडविलेली प्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचे ध्येय लोकमतने ठरविले व हाती समाजसेवेचे कंकण बांधले. याचे प्रत्यंतर अगदी प्रारंभीच्या दि. १० जानेवारी १९८२च्या ‘शुभारंभ विशेषांक’ातूनच आले. चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श सारख्या काही नियतकालीका वगळता एरव्ही दलित चळवळ, आंबेडकरी तत्वज्ञानाकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करणारी किंवा अनुल्लेखाने मारणारी वृत्तपत्रेच या संतभूमित मान्यता पावली होती. लोकमतने शुभारंभाच्या विशेषांकात ‘मराठवाड्यातील शैक्षणिक प्रगतीत डॉ. बाबासाहेबांचे योगदान’ व ‘दलितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळी’ हे अनुक्रमे प्राचार्य म.भि. चिटणीस व डॉ. गंगाधर पानतावणे यांचे विस्तृत लेख प्रकाशीत करून प्रस्थापितांना धक्का देत लोकांच्या आवाजाचा हुंकार आपण बनणार आहोत, हे दर्शविले. अर्थात लोकमत मराठवाड्यात येण्यापूर्वी नागपुरातही मुख्य संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या नेतृत्वाखाली आपली ही सामाजिक बांधिलकी कायम राखून होता. प्रा. सर कवाडे यांच्या नेतृत्वाखाली ११ नोव्हेंबर १९७९ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमिहून निघालेल्या नामांतर लॉगमार्चचे  ‘नामांतर करूनच परत येऊ’ अशा निर्धारात ‘लॉगमार्च’ला प्रारंभ’  असे भव्य वृत्त लोकमतने दिले होते. तत्पूर्वी नागपुरात निघालेला नामांतर मोर्चा व त्यात पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या ५ नागरिकांविषयीचे  वार्तांकनही मनाला गलबलून सोडणारे आहे. 

मराठवाड्यात दीनदलितांच्या जीवनमरणाचे प्रश्नही लोकमतने वेशीला टांगले. मराठवाडा भूमीशी सेवा समर्पणाच्या भावनेने समरस  होऊन लोकमतने समाज प्रबोधनाचा घेतलेला वसा नामविस्तार होईपर्यंत १६ वर्षे सातत्याने माध्यमाच्या पातळीवर अक्षरश: एक हातीच लढला. त्यात आजही खंड नाही. तत्कालीन कार्यकारी संपादक म.य. उर्फ बाबा दळवी यांनी या काळात लिहिलेले अग्रलेख, लेखातून लोकमतने नामांतराला वैचारिक मार्गदर्शनही केले. एव्हढेच नव्हे तर बाबा दळवी प्रत्यक्ष नामांतर लढ्यात ही अग्रभागी होते. नामांतरासाठी स्थापन झालेल्या विद्यार्थी नागरिक कृति समितीचे बाबा दळवी कार्याध्यक्ष होते.  त्यामुळे लोकमतने वैचारिकच नव्हे तर लढ्यात प्रत्यक्ष सहभागही दिला. 

१६ वर्षाच्या संघर्षात दलित - दलितेतर अनेक संघटनांनी नामांतरासाठी लढा दिला. या प्रत्येक घटनेची, आंदोलनाची नोंद लोकमतने तत्काळ घेऊन ती बाब समाजापुढे नेली आहे. अगदी बारिकातील बारिक तपशील लोकमतने नोंदविले आहेत. लोकमतमधून प्रसिद्ध होणाऱ्या बहुतांश सदरातून नामांतरास जागा मिळाली. साहित्याला वाहिलेली साहित्यजत्रा पुरवणी असो की चित्रपटांच्या रंगोली पुरवणीमध्येही, नामांतराविषयी मतमतांतरे आहेच.  लेख, अग्रलेख, वाचकांच्या  पत्रव्यवहाराचे ‘खुले व्यासपीठ’ , ‘झेप’ असो वा ‘औरंगाबादी फेरफटका’, ‘कॅमेरावाला’कुठेच नामांतराच्या बातम्या, लेख वर्ज्य नाहीत. यानिमित्ताने नामांतर आंदोलनाचे अनेक कंगोरे वाचकासमोर आणण्यात लोकमत यशस्वी ठरले. उण्यापुऱ्या दीड तपाच्या या काळात प्रत्येक महिन्यात अग्रलेख, लेख, पत्रे, बातम्या  असे नामांतराविषयी सरासरी १० ते १२ वृत्ते लोकमतमधून प्रसिद्ध झाले. त्यातील बहुतांश वृत्तांत सकारात्मक बाजू मांडणारे, माहिती देणारे आहेत. 

‘नामांतर लढा एक शोध यात्रा’ या पुस्तकात प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे लिहितात, ‘‘१९७७ व १९७८ साली मराठवाड्यात नामांतरविरोधी दैनिके  प्रमुख होती. १९९३-९४ साली मराठवाड्यात नामांतरवादी दैनिके सर्वाधिक खपाची व जास्त वितरण होणारी व संख्येनेही जास्त होती’. डॉ. गव्हाणे पुढे लिहितात, ‘‘ माझे एक अभ्यासू मित्र प्रकाश कापडे यांनी ‘ विद्यापीठ नामांतराबाबत वृत्तपत्रांची भूमिका : तुलनात्मक अभ्यास हा लघू प्रबंध मे ९३-९४मध्ये एम.एम.सी.जे. परीक्षेसाठी माझ्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे. त्या लघुप्रबंधात त्यांनी १ जानेवारी ते ३१ जानेवारी १९९४ या कालावधीत नामांतराबाबत दै. लोकमत, दै.मराठवाडा व दै. सामनाच्या बातम्या, लेख, छायाचित्रे यांचा अभ्यास केला. त्यात त्यांना असे आढळले की, दै. लोकमत (औरंगाबाद) ने महिन्यात छापलेल्या एकूण नामांतराच्या २६१ बातम्यांपैकी १७६ बातम्या (६२ टक्के नामांतर बातम्यांची जागा) नामांतरवादीच्या बाजूच्या दिल्या आहेत. तर ८५ बातम्या (३८ टक्के नामांतर बातम्यांची जागा) नामांतर विरोधीबाजुच्या दिल्या आहेत. दै. मराठवाडाने नामांतरच्या २५४  बातम्या छापल्या व त्यातील १३१ नामांतरवादी होत्या. त्यांना जागा मात्र ३६ टक्के मिळाली. तर नामांतरविरोधी १२३ बातम्या छापल्या.  ही संख्या नामांतरवादी बातम्यांच्या जवळपास वाटते, पण दै. मराठवाडाने नामांतरविरोधी बातम्यांना ६४ टक्के जागा दिली आहे. नामांतरविरोधी बातम्या आकाराने मोठ्या दै. मराठवाडाने दिल्या आहेत. यावरून दै. मराठवाडाची भूमिका दै. लोकमतपेक्षा भिन्न आणि १९७८ प्रमाणेच पण सौम्य होती असे म्हणावे लागते. ’’

अमृत महोत्सवी नागरी सत्काराला उत्तर देतांना बाबा दळवी म्हणतात, ‘ नामांतराच्या बाबतीत  लोकमतने जे काही केले ते कोणत्याही मराठी  वृत्तपत्राने केले नाही. दळवी पुढे म्हणतात, ‘‘गेल्या १६ वर्षापासून मी लोकमतमध्ये आहे. तुम्ही असे का केलं, तुम्ही असं का लिहिलं ? असं मला कधीही विचारले गेले नाही. लोकमतमध्ये राहूनच मी नामांतराच्या प्रश्नावर तुरुंगवास भोगला . नागपुरात अंधश्रद्धाविरोधी चळवळ चालविली, झोपडपट््टयांचे प्रश्न हाती घेतले. लोकमतने हे मला हे करू दिले त्याबद्दल त्यांनाही श्रेय जावे.’’

दबाब झुगारून भूमिकेवर ठाममानवतावादी प्रबोधनाची परंपरा जपण्याचे असीधारावृत्त लोकमतने प्रारंभापासूनच जोपासले व हा वसा कधीही सोडला नाही. नामांतर चळवळीत सामाजिक दुफळी झालेली असतांना नामांतरविषयी तुमची भुमिका बदला असा दबाब चोहीबाजूंनी लोकमतचे संपादक राजेंद्र दर्डा यांच्यावर येत होता. पण त्यांनी समता व ममत्वाला प्रधान्य देत आपल्या भुमिकेत तसूभरही बदल केला नाही.  ते नामांतराच्या भुमिकेवर ठामच राहिले. त्यामुळेच लोकमत नामांतराच्या लढ्यात सतत अग्रेसर राहिला. नामविस्ताराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त  सध्या प्रसिद्ध होत असलेल्या मुलाखतीमधूनही  जवळपास सर्वांनिच लोकमतचे बहुमूल्य योगदान आधोरेखित केले आहे.     लोकमतने घेतलेल्या खंद्या भुमिकेचे दलित समाज व चळवळीनेही उत्स्फूर्त स्वागतच केले व लोकमतवर सर्वस्वी प्रेमही केले. त्यात सातत्याने वाढतच होते आहे, अशी भावना  महापालिका स्थायीसमितीचे माजी सभापती  रतनकुमार पंडागळे यांनी व्यक्त केली. 

नामविस्ताराचा तिळगुळ मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठवाड्यातील  जनतेला दिला व लोकमतने या घटनेची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ अशी स्कायलाईन छापली. अशांतता ही विकासाला मारकच. म्हणून येथील जनतेची मने जुळायला हवी त्यातूनच विकास शक्य असल्याचे सांगत लोकमतचे तत्कालीन संपादक राजेंद्र दर्डा, ‘ आता हवे आहे... प्रेम आणि शांतता’ हा विशेष लेख लिहून भाईचारा वाढवा, शांती प्रस्थापित करण्याचे आवाहन करतात. या मातीविषयी असलेले प्रेमच त्यातून व्यक्त होते.     संत तुकारामांनी म्हटल्यानुसार, ‘ बुडती हे जन न देखवे डोळवा म्हणून कळवळा येतुयाशी.... 

- शांतीलाल गायकवाड 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा