शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

Namantar Andolan : नामांतराच्या लोकलढ्यात लोकमानस घडविण्यात ‘लोकमत’च अग्रेसर

By शांतीलाल गायकवाड | Updated: January 14, 2019 14:02 IST

मराठवाड्यात दीनदलितांच्या जीवनमरणाचे प्रश्नही लोकमतने वेशीला टांगले. मराठवाडा भूमीशी सेवा समर्पणाच्या भावनेने समरस  होऊन लोकमतने समाज प्रबोधनाचा घेतलेला वसा नामविस्तार होईपर्यंत १६ वर्षे सातत्याने माध्यमाच्या पातळीवर अक्षरश: एक हातीच लढला. त्यात आजही खंड नाही. 

‘ खींचो न कमानोंको न तलवार निकालोजब तोप मुकाबिल हो तो अखबार निकालो’  

अकबर इलाहाबादी यांचा हा शेर असो की, संत तुकडोजी महाराजांनी  ग्रामगीतेत म्हटल्यानुसार,  ‘न धरी हाती तलवार, बुद्ध राज्य करी जगावरीकारण असे एक, प्रचार’ . 

हा अभंग असो...ही कवने माध्यमांचे महत्व प्रचार, प्रसार करून जनमत  घडविण्यात अनन्यसाधारण असेच असल्याचे सांगते. नामांतराच्या मुद्द्यावरून मराठवाड्यात उसळलेला आगडोंब हा जातीच्या स्फोटक दारू कोठारावर प्रसारमाध्यमांनी, वृत्तपत्रांनी टाकलेल्या ठिणगीचे अमानवी रुपच होते. वृत्तपत्राच्या आगलाव्या, विषमतावादी व एकांगी भूमिकेमुळे मराठवाड्यातील दलित-नवबौद्धावर अनन्वीत अत्याचार झाले.  हा काळाकुट्ट इतिहास ताजा आहे. 

९ जानेवारी १९८२ रोजी मराठवाड्यात लोकमतचे आगमन होईपर्यंत नामांतर लढ्याने मन व मतभेदासह असहिष्णुतेचा प्रारंभिक अध्याय लिहून  काढला होता. महाराष्ट्राच्या १५० वर्षातील आगरकर, फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांनी  घडविलेली प्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचे ध्येय लोकमतने ठरविले व हाती समाजसेवेचे कंकण बांधले. याचे प्रत्यंतर अगदी प्रारंभीच्या दि. १० जानेवारी १९८२च्या ‘शुभारंभ विशेषांक’ातूनच आले. चळवळीला वाहिलेल्या अस्मितादर्श सारख्या काही नियतकालीका वगळता एरव्ही दलित चळवळ, आंबेडकरी तत्वज्ञानाकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करणारी किंवा अनुल्लेखाने मारणारी वृत्तपत्रेच या संतभूमित मान्यता पावली होती. लोकमतने शुभारंभाच्या विशेषांकात ‘मराठवाड्यातील शैक्षणिक प्रगतीत डॉ. बाबासाहेबांचे योगदान’ व ‘दलितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळी’ हे अनुक्रमे प्राचार्य म.भि. चिटणीस व डॉ. गंगाधर पानतावणे यांचे विस्तृत लेख प्रकाशीत करून प्रस्थापितांना धक्का देत लोकांच्या आवाजाचा हुंकार आपण बनणार आहोत, हे दर्शविले. अर्थात लोकमत मराठवाड्यात येण्यापूर्वी नागपुरातही मुख्य संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या नेतृत्वाखाली आपली ही सामाजिक बांधिलकी कायम राखून होता. प्रा. सर कवाडे यांच्या नेतृत्वाखाली ११ नोव्हेंबर १९७९ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमिहून निघालेल्या नामांतर लॉगमार्चचे  ‘नामांतर करूनच परत येऊ’ अशा निर्धारात ‘लॉगमार्च’ला प्रारंभ’  असे भव्य वृत्त लोकमतने दिले होते. तत्पूर्वी नागपुरात निघालेला नामांतर मोर्चा व त्यात पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या ५ नागरिकांविषयीचे  वार्तांकनही मनाला गलबलून सोडणारे आहे. 

मराठवाड्यात दीनदलितांच्या जीवनमरणाचे प्रश्नही लोकमतने वेशीला टांगले. मराठवाडा भूमीशी सेवा समर्पणाच्या भावनेने समरस  होऊन लोकमतने समाज प्रबोधनाचा घेतलेला वसा नामविस्तार होईपर्यंत १६ वर्षे सातत्याने माध्यमाच्या पातळीवर अक्षरश: एक हातीच लढला. त्यात आजही खंड नाही. तत्कालीन कार्यकारी संपादक म.य. उर्फ बाबा दळवी यांनी या काळात लिहिलेले अग्रलेख, लेखातून लोकमतने नामांतराला वैचारिक मार्गदर्शनही केले. एव्हढेच नव्हे तर बाबा दळवी प्रत्यक्ष नामांतर लढ्यात ही अग्रभागी होते. नामांतरासाठी स्थापन झालेल्या विद्यार्थी नागरिक कृति समितीचे बाबा दळवी कार्याध्यक्ष होते.  त्यामुळे लोकमतने वैचारिकच नव्हे तर लढ्यात प्रत्यक्ष सहभागही दिला. 

१६ वर्षाच्या संघर्षात दलित - दलितेतर अनेक संघटनांनी नामांतरासाठी लढा दिला. या प्रत्येक घटनेची, आंदोलनाची नोंद लोकमतने तत्काळ घेऊन ती बाब समाजापुढे नेली आहे. अगदी बारिकातील बारिक तपशील लोकमतने नोंदविले आहेत. लोकमतमधून प्रसिद्ध होणाऱ्या बहुतांश सदरातून नामांतरास जागा मिळाली. साहित्याला वाहिलेली साहित्यजत्रा पुरवणी असो की चित्रपटांच्या रंगोली पुरवणीमध्येही, नामांतराविषयी मतमतांतरे आहेच.  लेख, अग्रलेख, वाचकांच्या  पत्रव्यवहाराचे ‘खुले व्यासपीठ’ , ‘झेप’ असो वा ‘औरंगाबादी फेरफटका’, ‘कॅमेरावाला’कुठेच नामांतराच्या बातम्या, लेख वर्ज्य नाहीत. यानिमित्ताने नामांतर आंदोलनाचे अनेक कंगोरे वाचकासमोर आणण्यात लोकमत यशस्वी ठरले. उण्यापुऱ्या दीड तपाच्या या काळात प्रत्येक महिन्यात अग्रलेख, लेख, पत्रे, बातम्या  असे नामांतराविषयी सरासरी १० ते १२ वृत्ते लोकमतमधून प्रसिद्ध झाले. त्यातील बहुतांश वृत्तांत सकारात्मक बाजू मांडणारे, माहिती देणारे आहेत. 

‘नामांतर लढा एक शोध यात्रा’ या पुस्तकात प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे लिहितात, ‘‘१९७७ व १९७८ साली मराठवाड्यात नामांतरविरोधी दैनिके  प्रमुख होती. १९९३-९४ साली मराठवाड्यात नामांतरवादी दैनिके सर्वाधिक खपाची व जास्त वितरण होणारी व संख्येनेही जास्त होती’. डॉ. गव्हाणे पुढे लिहितात, ‘‘ माझे एक अभ्यासू मित्र प्रकाश कापडे यांनी ‘ विद्यापीठ नामांतराबाबत वृत्तपत्रांची भूमिका : तुलनात्मक अभ्यास हा लघू प्रबंध मे ९३-९४मध्ये एम.एम.सी.जे. परीक्षेसाठी माझ्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केला आहे. त्या लघुप्रबंधात त्यांनी १ जानेवारी ते ३१ जानेवारी १९९४ या कालावधीत नामांतराबाबत दै. लोकमत, दै.मराठवाडा व दै. सामनाच्या बातम्या, लेख, छायाचित्रे यांचा अभ्यास केला. त्यात त्यांना असे आढळले की, दै. लोकमत (औरंगाबाद) ने महिन्यात छापलेल्या एकूण नामांतराच्या २६१ बातम्यांपैकी १७६ बातम्या (६२ टक्के नामांतर बातम्यांची जागा) नामांतरवादीच्या बाजूच्या दिल्या आहेत. तर ८५ बातम्या (३८ टक्के नामांतर बातम्यांची जागा) नामांतर विरोधीबाजुच्या दिल्या आहेत. दै. मराठवाडाने नामांतरच्या २५४  बातम्या छापल्या व त्यातील १३१ नामांतरवादी होत्या. त्यांना जागा मात्र ३६ टक्के मिळाली. तर नामांतरविरोधी १२३ बातम्या छापल्या.  ही संख्या नामांतरवादी बातम्यांच्या जवळपास वाटते, पण दै. मराठवाडाने नामांतरविरोधी बातम्यांना ६४ टक्के जागा दिली आहे. नामांतरविरोधी बातम्या आकाराने मोठ्या दै. मराठवाडाने दिल्या आहेत. यावरून दै. मराठवाडाची भूमिका दै. लोकमतपेक्षा भिन्न आणि १९७८ प्रमाणेच पण सौम्य होती असे म्हणावे लागते. ’’

अमृत महोत्सवी नागरी सत्काराला उत्तर देतांना बाबा दळवी म्हणतात, ‘ नामांतराच्या बाबतीत  लोकमतने जे काही केले ते कोणत्याही मराठी  वृत्तपत्राने केले नाही. दळवी पुढे म्हणतात, ‘‘गेल्या १६ वर्षापासून मी लोकमतमध्ये आहे. तुम्ही असे का केलं, तुम्ही असं का लिहिलं ? असं मला कधीही विचारले गेले नाही. लोकमतमध्ये राहूनच मी नामांतराच्या प्रश्नावर तुरुंगवास भोगला . नागपुरात अंधश्रद्धाविरोधी चळवळ चालविली, झोपडपट््टयांचे प्रश्न हाती घेतले. लोकमतने हे मला हे करू दिले त्याबद्दल त्यांनाही श्रेय जावे.’’

दबाब झुगारून भूमिकेवर ठाममानवतावादी प्रबोधनाची परंपरा जपण्याचे असीधारावृत्त लोकमतने प्रारंभापासूनच जोपासले व हा वसा कधीही सोडला नाही. नामांतर चळवळीत सामाजिक दुफळी झालेली असतांना नामांतरविषयी तुमची भुमिका बदला असा दबाब चोहीबाजूंनी लोकमतचे संपादक राजेंद्र दर्डा यांच्यावर येत होता. पण त्यांनी समता व ममत्वाला प्रधान्य देत आपल्या भुमिकेत तसूभरही बदल केला नाही.  ते नामांतराच्या भुमिकेवर ठामच राहिले. त्यामुळेच लोकमत नामांतराच्या लढ्यात सतत अग्रेसर राहिला. नामविस्ताराच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त  सध्या प्रसिद्ध होत असलेल्या मुलाखतीमधूनही  जवळपास सर्वांनिच लोकमतचे बहुमूल्य योगदान आधोरेखित केले आहे.     लोकमतने घेतलेल्या खंद्या भुमिकेचे दलित समाज व चळवळीनेही उत्स्फूर्त स्वागतच केले व लोकमतवर सर्वस्वी प्रेमही केले. त्यात सातत्याने वाढतच होते आहे, अशी भावना  महापालिका स्थायीसमितीचे माजी सभापती  रतनकुमार पंडागळे यांनी व्यक्त केली. 

नामविस्ताराचा तिळगुळ मुख्यमंत्री शरद पवार यांनी मराठवाड्यातील  जनतेला दिला व लोकमतने या घटनेची ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ अशी स्कायलाईन छापली. अशांतता ही विकासाला मारकच. म्हणून येथील जनतेची मने जुळायला हवी त्यातूनच विकास शक्य असल्याचे सांगत लोकमतचे तत्कालीन संपादक राजेंद्र दर्डा, ‘ आता हवे आहे... प्रेम आणि शांतता’ हा विशेष लेख लिहून भाईचारा वाढवा, शांती प्रस्थापित करण्याचे आवाहन करतात. या मातीविषयी असलेले प्रेमच त्यातून व्यक्त होते.     संत तुकारामांनी म्हटल्यानुसार, ‘ बुडती हे जन न देखवे डोळवा म्हणून कळवळा येतुयाशी.... 

- शांतीलाल गायकवाड 

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा