शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

Namantar Andolan : टाडा कायद्याखाली अटक होणार होती... : श्रावण गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 20:06 IST

लढा नामविस्ताराचा : चर्मकार समाजातील मी कट्टर आंबेडकरवादी कार्यकर्ता. आक्रमकतेमुळे पोलिसांची माझ्यावर सतत करडी नजर असायची. नामांतराच्या मागणीसाठीच्या लढ्यात माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले. शहरात काही झाले की, पोलीस मला धरून न्यायचे व नंतर सोडून द्यायचे. याच काळात पोलिसांनी मला टाडा लावायचे ठरविले. तत्कालीन पोलीस आयुक्त चरणसिंग आझाद यांच्यासमोर हजर केले असता मी बाजू मांडली. तेव्हा त्यांनी समज देऊन मला सोडून दिले. म्हणून टाडा कायद्याखाली होणारी अटक टळली, असा अनुभव सांगितला श्रावण गायकवाड यांनी! 

- स. सो. खंडाळकर

चर्मकार समाज आजही पुरेसा आंबेडकरवादी नाही; पण या समाजातील श्रावण गायकवाड हे स्वत:चा विवाह बौद्ध पद्धतीने करून घेतात. मी कट्टर आंबेडकरवादी आहे’, असे अभिमानाने सांगतात. पूर्वी ते दलित पँथरमध्ये होते. आज रिपाइं ए मध्ये आहेत. नामविस्तार दिनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त ते लोकमतशी बोलत होते. ते म्हणाले, ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकात सत्याग्रह झाला. वयाच्या १५ व्या वर्षीच मी या सत्याग्रहात सामील झालो होतो. मलाही अटक झाली; पण वयाने लहान असल्याने सायंकाळी सोडून देण्यात आले. पुढे मी दलित पँथर या संघटनेच्या माध्यमातून नामांतराच्या लढ्यात सतत सहभागी होऊ लागलो. 

नामांतरवादी कृती समितीच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे ५ सप्टेंबर १९८२ रोजी जेलभरो आंदोलन करण्यात आले. त्यावेळीही अटक केल्यानंतर मला येरवडा जेलमध्ये १५ दिवस ठेवण्यात आले. १४ जानेवारी १९८४ रोजी नामविस्ताराचा निर्णय झाला; पण खबरदारीचा उपाय म्हणून १४ जानेवारीच्या पूर्वसंध्येलाच आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले. हर्सूल जेलमध्ये ठेवले; पण १६ वर्षांच्या संघर्षानंतर नामविस्तार झाल्याने अतीव आनंद झाला, असे श्रावण गायकवाड यांनी नमूद केले. 

ते म्हणाले, नामांतराचा लढा प्रदीर्घ चालला. अनेकांना शहीद व्हावे लागले. अनेकांचे रक्त सांडले; पण बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठाची आजची परिस्थिती बघवत नाही. तेच ते घाणेरडे, संकुचित राजकारण...! शिक्षण सोडून बाकीच्याच गोष्टी जास्त. आता तर विद्यापीठात शिकवायला प्राध्यापक नाहीत. विद्यार्थी सारे वाऱ्यावर. हे बाबासाहेबांना मुळीच अपेक्षित नव्हते. या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जासुद्धा मिळू शकत नाही. पुन्हा त्यासाठी संघर्षच करावा लागेल की काय, अशी परिस्थिती. बाबासाहेबांच्या नावाचे हे विद्यापीठ त्यांच्या विचारानुसार चालले पाहिजे, ही अपेक्षा.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा