शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Namantar Andolan : टाडा कायद्याखाली अटक होणार होती... : श्रावण गायकवाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 20:06 IST

लढा नामविस्ताराचा : चर्मकार समाजातील मी कट्टर आंबेडकरवादी कार्यकर्ता. आक्रमकतेमुळे पोलिसांची माझ्यावर सतत करडी नजर असायची. नामांतराच्या मागणीसाठीच्या लढ्यात माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले. शहरात काही झाले की, पोलीस मला धरून न्यायचे व नंतर सोडून द्यायचे. याच काळात पोलिसांनी मला टाडा लावायचे ठरविले. तत्कालीन पोलीस आयुक्त चरणसिंग आझाद यांच्यासमोर हजर केले असता मी बाजू मांडली. तेव्हा त्यांनी समज देऊन मला सोडून दिले. म्हणून टाडा कायद्याखाली होणारी अटक टळली, असा अनुभव सांगितला श्रावण गायकवाड यांनी! 

- स. सो. खंडाळकर

चर्मकार समाज आजही पुरेसा आंबेडकरवादी नाही; पण या समाजातील श्रावण गायकवाड हे स्वत:चा विवाह बौद्ध पद्धतीने करून घेतात. मी कट्टर आंबेडकरवादी आहे’, असे अभिमानाने सांगतात. पूर्वी ते दलित पँथरमध्ये होते. आज रिपाइं ए मध्ये आहेत. नामविस्तार दिनाच्या रौप्य महोत्सवानिमित्त ते लोकमतशी बोलत होते. ते म्हणाले, ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकात सत्याग्रह झाला. वयाच्या १५ व्या वर्षीच मी या सत्याग्रहात सामील झालो होतो. मलाही अटक झाली; पण वयाने लहान असल्याने सायंकाळी सोडून देण्यात आले. पुढे मी दलित पँथर या संघटनेच्या माध्यमातून नामांतराच्या लढ्यात सतत सहभागी होऊ लागलो. 

नामांतरवादी कृती समितीच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे ५ सप्टेंबर १९८२ रोजी जेलभरो आंदोलन करण्यात आले. त्यावेळीही अटक केल्यानंतर मला येरवडा जेलमध्ये १५ दिवस ठेवण्यात आले. १४ जानेवारी १९८४ रोजी नामविस्ताराचा निर्णय झाला; पण खबरदारीचा उपाय म्हणून १४ जानेवारीच्या पूर्वसंध्येलाच आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतले. हर्सूल जेलमध्ये ठेवले; पण १६ वर्षांच्या संघर्षानंतर नामविस्तार झाल्याने अतीव आनंद झाला, असे श्रावण गायकवाड यांनी नमूद केले. 

ते म्हणाले, नामांतराचा लढा प्रदीर्घ चालला. अनेकांना शहीद व्हावे लागले. अनेकांचे रक्त सांडले; पण बाबासाहेबांच्या नावाने असलेल्या या विद्यापीठाची आजची परिस्थिती बघवत नाही. तेच ते घाणेरडे, संकुचित राजकारण...! शिक्षण सोडून बाकीच्याच गोष्टी जास्त. आता तर विद्यापीठात शिकवायला प्राध्यापक नाहीत. विद्यार्थी सारे वाऱ्यावर. हे बाबासाहेबांना मुळीच अपेक्षित नव्हते. या विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जासुद्धा मिळू शकत नाही. पुन्हा त्यासाठी संघर्षच करावा लागेल की काय, अशी परिस्थिती. बाबासाहेबांच्या नावाचे हे विद्यापीठ त्यांच्या विचारानुसार चालले पाहिजे, ही अपेक्षा.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा