शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Namantar Andolan : नामांतरविरोधी असूनही गोविंदभाई म्हणाले, तू तुझ्या भूमिकेवर ठाम राहा : श्रीराम जाधव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 12:10 IST

लढा नामविस्ताराचा : मी नाशिकच्या जेलमधून बाहेर पडून औरंगाबादला आलो आणि आणखी एका केसमध्ये मला हर्सूलमध्ये दहा दिवस राहावं लागलं. अमीर हबीब आणि मला ही शिक्षा तत्कालीन जजने सुनावली होती.

- स. सो. खंडाळकर

मी त्यावेळी नामांतरविरोधी असलेल्या स.भु. शिक्षण संस्थेत कारकून म्हणून काम करीत होतो. नुकताच माझा आंतरजातीय विवाह झाला होता. आम्ही जयप्रकाश नारायण यांच्या छात्र युवा संघर्ष वाहिनीत काम करीत होतो. नामांतरासाठी ६ डिसेंबर १९७९ रोजी क्रांतीचौकातील सत्याग्रहात आम्ही उभयता भाग घेतला. अटक होऊन मला नाशिकच्या जेलमध्ये आणि माझ्या पत्नीला हर्सूल जेलमध्ये ठेवले. पुढे बाहेर आल्यावर मी कामावर रुजू झालो; पण नामांतर लढ्यात सहभाग घेतला हा जणू गुन्हाच ठरू लागला. कार्यालयातील अन्य सहकारी माझा राग करू लागले. मला त्रास देऊ लागले. तू इथं कसा राहतोस ते पाहू, असे धमकावू लागले. मग मी स.भु. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोविंदभाई श्रॉफ यांना भेटलो आणि घडत असलेला सारा प्रकार त्यांच्या कानी घातला. शांतपणे त्यांनी तो ऐकला अन् मला म्हणाले, भारतीय संविधानानुसार तू तुझं जे असेल ते मत जोपासू शकतो आणि मी माझं मत जोपासू शकतो. काळजी करू नको. जा आणि तू तुझं काम कर.’ 

हा किस्सा सांगितला प्रा. श्रीराम जाधव यांनी. नामविस्तार दिनाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ते ‘लोकमत’शी बोलत होते. प्रा. श्रीराम जाधव हे गांधीवादी, तेवढेच पुरोगामी मतांचे. नुकतेच ते पवनारला पाच वर्षे राहून आले आहेत आणि पुन्हा सामाजिक कार्याला वाहून घेतले आहे. बारा वर्षे स.भु.मध्ये कारकून म्हणून नोकरी केल्यानंतर प्रा. जाधव यांनी एम.ए., एम.फिल. करून परभणीला दोन वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. १९९२ पर्यंत ते देवगिरी महाविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक होते. सेवानिवृत्ती घेऊन ते पवनार आश्रमात गेले. लग्न झाल्यानंतर हनीमूनसाठी कुठेतरी बाहेर जाण्याचे ते दिवस; पण आम्ही नामांतर लढ्यात उडी घेऊन कारावास भोगला. गोविंदभाई  नामांतर विरोधी होते; तरी त्यांनी स.भु.मधील नामांतरवाद्यांना कधीच रोखले नाही. त्यासंदर्भात माझं उदाहरण पुरेसं बोलकं आहे. याकडे प्रा. जाधव यांनी लक्ष वेधले. नंतर मग नामांतर होईपर्यंत माझा त्यात सहभाग राहिला. नामांतर झालं, पुढं काय, हा प्रश्न आहेच. विद्यापीठ त्या गतीनं प्रगतिपथावर असायला हवं, असे ते म्हणाले.

टॅग्स :Namantar Andolanनामांतर आंदोलनDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादMarathwadaमराठवाडा