शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

ना गाजावाजा... ना पुरस्काराची हाव, उज्ज्वल भविष्यासाठी राबतेय गाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:22 IST

वज्रमूठ आवळली : वावन्यात उद्दिष्टापेक्षा अधिक कामे; गावशिवार ‘पाणीदार’ करण्याची जिद्द, पावसाळ्यात होणार श्रमदान सार्थक

रऊफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कफुलंब्री : तालुक्यातील अनेक गावांनी वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला असला तरी यापैकी वावना गावाने आगळावेगळा आदर्श निर्माण करून गावशिवार ‘पाणीदार’ करण्यासाठी वज्रमूठ आवळली आहे. ना गाजावाजा ना पुरस्काराची हाव, केवळ गावाचे भविष्य उज्ज्वल व्हावे, ही एकच जिद्द उराशी बाळगून अख्खे गाव सुरुवातीपासून पाणी फाऊंडेशनच्या कामात उतरले आहे. विशेष म्हणजे वज्रमूठ आणि इच्छाशक्तीच्या बळावर उद्दिष्टापेक्षा जास्तीचे काम वावना ग्रामस्थांनी करून दाखविले आहे. याचा फायदा येणाऱ्या काळात गावाला नक्कीच होईल, या आशेने भर उन्हात श्रमदानासाठी गावचे हात राबत असल्याचे चित्र आहे. गावकरी आता केवळ राहिलेल्या उणिवा दूर करून कामावर शेवटचा हात फिरवत आहेत.वावना गावची लोकसंख्या अवघी हजार-अकराशेच्या घरात असून, येथे ३८५ हेक्टर जमीन आहे. बहुतांश जमीन कोरडवाहू असून हंगामी बागायतक्षेत्र कमी आहे.गाव छोटे असले तरी गावचा ‘भाईचारा’ वाखाणण्याजोगा आहे. कुणाच्या घरी कुठलाही समारंभ असला की अख्खे गाव एकत्र येऊन मदत करतात. गावापासून एक कि.मी. अंतरावरील डोंगरावर वैष्णवदेवीचे मंदिर असून शुभकार्याची सुरुवात येथूनच केली जाते. गावात जात-पात, गट-तट नसून केवळ सर्व काही पाणीच असावे, या शिवाय आपली प्रगती नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधून अख्ख्यागावाने प्रारंभीपासूनच पाणी फाऊंडेशनच्या कामात आघाडी घेतली आहे.गेल्या ४५ दिवसांपासून दिवसभर श्रमदान, लोकसहभागातून कामे या विषयावरच चावडी, मंदिर, सार्वजनिक ठिकाणी एकच चर्चा होत आहे. पुरस्कार, बक्षीस मिळावे यापेक्षा या स्पर्धेच्या माध्यमातून गावाचे भविष्य पाणीदार करण्याची संधी दारी चालून आली आहे, याचे आपण सोने करावे, हीच जिद्द वावना गावात पाहायला मिळाली. शेवटी वॉटर कप स्पर्धा राबविणारी परीक्षक टीम वावन्यातील कामांबाबत काय निर्णय घेते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.‘बीजेएस’चे सहकार्यखोलीकरण, शेततळे करण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे मोठे सहकार्य लाभले. त्यांनी मशिनरी पुरविली, त्याला लागणारे इंधन गावकºयांनी वर्गणी करून दिले. आतापर्यंत दहा लाखांचे इंधन लागले असल्याची माहिती सरपंच सोमीनाथ जाधव यांनी दिली.कुठलाही स्वार्थ न ठेवता केवळ गावच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावाचा एकोपा राबत आहे, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, अशा प्रतिक्रिया गावातील नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या. आदर्श, पाणीदार, सुखी व समृद्ध गाव हीच आमची ‘मंझिल’ आहे, असे सरपंच सोमीनाथ जाधव अभिमानाने सांगत होते.पूर्ण झालेली कामेवावना गावाच्या सभोवताली दोन नद्या, सुमारे दहा नाले असून याचे खोलीकरण व रुंदीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. आतापर्यंत १६ कि.मी. लांबीची कामे करण्यात आली असल्याची माहिती गावकºयांनी दिली. यात सुमारे एक लाख ३५ हजार घनमीटर काम झालेले आहे.याशिवाय ३ हजार ५०० वृक्षांची लागवड, ४०० शेतकºयांकडून माती परीक्षण, यंत्राच्या साह्याने ७२ हजार घनमीटर, श्रमदानातून ६ हजार ६६० घनमीटर, माथा ते पायथा एरिया ट्रीटमेंट ५२ हजार घनमीटर, श्रमदानातून सलग समतल चर, बांध बंदिस्ती, दगडी बांध, यंत्राच्या साह्याने नदी-नाला खोलीकरण, रुंदीकरण, शेततळे आदी कामे पूर्ण झाली आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाRainपाऊस