शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

ना गाजावाजा... ना पुरस्काराची हाव, उज्ज्वल भविष्यासाठी राबतेय गाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:22 IST

वज्रमूठ आवळली : वावन्यात उद्दिष्टापेक्षा अधिक कामे; गावशिवार ‘पाणीदार’ करण्याची जिद्द, पावसाळ्यात होणार श्रमदान सार्थक

रऊफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कफुलंब्री : तालुक्यातील अनेक गावांनी वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला असला तरी यापैकी वावना गावाने आगळावेगळा आदर्श निर्माण करून गावशिवार ‘पाणीदार’ करण्यासाठी वज्रमूठ आवळली आहे. ना गाजावाजा ना पुरस्काराची हाव, केवळ गावाचे भविष्य उज्ज्वल व्हावे, ही एकच जिद्द उराशी बाळगून अख्खे गाव सुरुवातीपासून पाणी फाऊंडेशनच्या कामात उतरले आहे. विशेष म्हणजे वज्रमूठ आणि इच्छाशक्तीच्या बळावर उद्दिष्टापेक्षा जास्तीचे काम वावना ग्रामस्थांनी करून दाखविले आहे. याचा फायदा येणाऱ्या काळात गावाला नक्कीच होईल, या आशेने भर उन्हात श्रमदानासाठी गावचे हात राबत असल्याचे चित्र आहे. गावकरी आता केवळ राहिलेल्या उणिवा दूर करून कामावर शेवटचा हात फिरवत आहेत.वावना गावची लोकसंख्या अवघी हजार-अकराशेच्या घरात असून, येथे ३८५ हेक्टर जमीन आहे. बहुतांश जमीन कोरडवाहू असून हंगामी बागायतक्षेत्र कमी आहे.गाव छोटे असले तरी गावचा ‘भाईचारा’ वाखाणण्याजोगा आहे. कुणाच्या घरी कुठलाही समारंभ असला की अख्खे गाव एकत्र येऊन मदत करतात. गावापासून एक कि.मी. अंतरावरील डोंगरावर वैष्णवदेवीचे मंदिर असून शुभकार्याची सुरुवात येथूनच केली जाते. गावात जात-पात, गट-तट नसून केवळ सर्व काही पाणीच असावे, या शिवाय आपली प्रगती नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधून अख्ख्यागावाने प्रारंभीपासूनच पाणी फाऊंडेशनच्या कामात आघाडी घेतली आहे.गेल्या ४५ दिवसांपासून दिवसभर श्रमदान, लोकसहभागातून कामे या विषयावरच चावडी, मंदिर, सार्वजनिक ठिकाणी एकच चर्चा होत आहे. पुरस्कार, बक्षीस मिळावे यापेक्षा या स्पर्धेच्या माध्यमातून गावाचे भविष्य पाणीदार करण्याची संधी दारी चालून आली आहे, याचे आपण सोने करावे, हीच जिद्द वावना गावात पाहायला मिळाली. शेवटी वॉटर कप स्पर्धा राबविणारी परीक्षक टीम वावन्यातील कामांबाबत काय निर्णय घेते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.‘बीजेएस’चे सहकार्यखोलीकरण, शेततळे करण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे मोठे सहकार्य लाभले. त्यांनी मशिनरी पुरविली, त्याला लागणारे इंधन गावकºयांनी वर्गणी करून दिले. आतापर्यंत दहा लाखांचे इंधन लागले असल्याची माहिती सरपंच सोमीनाथ जाधव यांनी दिली.कुठलाही स्वार्थ न ठेवता केवळ गावच्या उज्ज्वल भविष्यासाठी गावाचा एकोपा राबत आहे, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, अशा प्रतिक्रिया गावातील नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळाल्या. आदर्श, पाणीदार, सुखी व समृद्ध गाव हीच आमची ‘मंझिल’ आहे, असे सरपंच सोमीनाथ जाधव अभिमानाने सांगत होते.पूर्ण झालेली कामेवावना गावाच्या सभोवताली दोन नद्या, सुमारे दहा नाले असून याचे खोलीकरण व रुंदीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. आतापर्यंत १६ कि.मी. लांबीची कामे करण्यात आली असल्याची माहिती गावकºयांनी दिली. यात सुमारे एक लाख ३५ हजार घनमीटर काम झालेले आहे.याशिवाय ३ हजार ५०० वृक्षांची लागवड, ४०० शेतकºयांकडून माती परीक्षण, यंत्राच्या साह्याने ७२ हजार घनमीटर, श्रमदानातून ६ हजार ६६० घनमीटर, माथा ते पायथा एरिया ट्रीटमेंट ५२ हजार घनमीटर, श्रमदानातून सलग समतल चर, बांध बंदिस्ती, दगडी बांध, यंत्राच्या साह्याने नदी-नाला खोलीकरण, रुंदीकरण, शेततळे आदी कामे पूर्ण झाली आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धाRainपाऊस