शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

‘माझ्या जीवनातील स्नेही मी तुम्हाला देत आहे’, बाबासाहेबांची ११०० ग्रंथ मिलिंदच्या ग्रंथालयात

By विजय सरवदे | Updated: December 6, 2022 13:38 IST

ग्रंथप्रेमी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः तयार केली होती ग्रंथालयाची नियमावली

- विजय सरवदेऔरंगाबाद : विद्यार्थी व प्राध्यापकांनी पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त संबंधित विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी पूरक ग्रंथांचे वाचन करावे, यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘सिद्धार्थ’ व ‘मिलिंद’ची ग्रंथालये ग्रंथांनी समृद्ध केली. डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या संग्रहातील सुमारे ११०० दुर्मीळ ग्रंथ सुरुवातीच्या काळात मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ठेवले होते. हे ग्रंथ प्राध्यापक व विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध व्हावेत आणि त्यांचे योग्य संवर्धनही व्हावे यासाठी त्यांनी स्वत:च एक नियमावली तयार केली होती. ते ग्रंथ आजही मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत.

बाबासाहेबांनी ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ ही शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेचे मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय, तर औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालय सुरू केले. या माध्यमातून त्यांनी सर्वच जाती-धर्माच्या मुला-मुलींसाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. समाजातील मुले शिकली. नोकरीलाही लागली; पण ती नंतर स्वतःच्याच कुटुंबात, ऐशोआरामात मग्न झाली. बाबासाहेबांना हे अपेक्षित नव्हते. ‘पदवी मिळविण्यासाठी तुम्ही पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करता; पण पदवी हेच ध्येय मानू नका. ज्ञानप्राप्ती हे ध्येय ठेवा. जीवनभर ज्ञानाची उपासना करा’, बाबासाहेबांचा असा आग्रह समाजातील नवतरुणांसाठी होता.

१९५२ साली सिद्धार्थ महाविद्यालयास आपला बहुमोल ग्रंथसंग्रह प्रदान करताना डॉ. बाबासाहेब अत्यंत भावविवश झाले होते. ‘समाजाने बहिष्कृत केलेल्या माझ्यासारख्याला या ग्रंथांनीच जवळ केले. मला आसरा दिला. त्यांच्या एवढा जगात मला दुसरा परमस्नेही कोणीच नाही. माझ्या जीवनातील स्नेही आज मी तुम्हाला देत आहे’, असे उद्गार बाबासाहेबांनी तेव्हा काढले. आपली ३५ हजारांहून अधिक असलेली ग्रंथसंपदा ठेवण्यासाठी त्यांनी मुंबईत एक स्वतंत्र बंगला ‘राजगृह’ बांधला होता.

डॉ. बाबासाहेबांची ग्रंथालयासंदर्भात नियमावलीवाचन कसे करावे, याविषयीदेखील बाबासाहेब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. २८ ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी ग्रंथालयातील पुस्तकांचे वितरण आणि तेथे वाचण्यासाठी एक नियमावली तयार केली. ती आजही प्रत्येक ग्रंथालयांसाठी अनुकरणीय आहे. 'मार्क केलेले ‘नॉट फॉर इश्यू’ आणि सर्व ‘रेफरन्स बुक’ ही पुस्तके ग्रंथालयाबाहेर देऊ नयेत, प्राध्यापक आणि ज्या विद्यार्थ्यांनी १० रुपये देऊन ग्रंथालयात नोंद केली आहे, त्यांनाच पुस्तके वितरित करावीत, पुस्तके जमा करताना ग्रंथपालांनी त्या पुस्तकांचे बारकाईने निरीक्षण करावे. पुस्तकातील पाने फाडलेली असतील अथवा पानांवर अंडरलाइन केलेली असेल, तर अशी पुस्तके जमा करून न घेता संबंधितांकडून पुस्तकाची पूर्ण किंमत वसूल करावी, प्राध्यापकांना दोनपेक्षा जास्त पुस्तके देऊ नयेत, प्राध्यापकांनी चार दिवसांत नेलेली पुस्तके जमा करावीत, एखादे पुस्तक परत करण्यासाठी ग्रंथपालाने नोटीस काढल्यास ते पुस्तक दोन दिवसांत ग्रंथालयात जमा करावे. त्या अवधीत परत केले नाही, तर त्यास दरदिवशी आठ आणे दंड आकारावा, या व्यतिरिक्त विद्यार्थ्याला ग्रंथालयातच अभ्यास करायचा असेल, तर त्याच्याकडून महिन्याला दोन रुपये आगाऊ रक्कम आकारावी. बाबासाहेबांनी घालून दिलेली नियमावली किती दूरदृष्टीपणाची होती यावरून कळते.

समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र दिलाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय संघर्षातून शिक्षण घेतले. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जाेरावर ते जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, बॅरिस्टर, पत्रकार, जलतज्ज्ञ, उत्कृष्ट संसदपटू, स्त्रियांचे कैवारी याशिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित- पददलितांचे उद्धारक, स्वतंत्र भारताचे पहिले ‘कायदा मंत्री’ आणि राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. अस्पृश्य केलेल्या समाजातून हा माणूस एवढा मोठा होतो? ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’, बाबासाहेबांनी असे या समाजव्यवस्थेला सडेतोड उत्तर दिले. आपल्या समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र दिला आणि समाजाने त्याचे पालनही केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरAurangabadऔरंगाबादNagsen vanनागसेन वन