शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

‘माझ्या जीवनातील स्नेही मी तुम्हाला देत आहे’, बाबासाहेबांची ११०० ग्रंथ मिलिंदच्या ग्रंथालयात

By विजय सरवदे | Updated: December 6, 2022 13:38 IST

ग्रंथप्रेमी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः तयार केली होती ग्रंथालयाची नियमावली

- विजय सरवदेऔरंगाबाद : विद्यार्थी व प्राध्यापकांनी पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त संबंधित विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी पूरक ग्रंथांचे वाचन करावे, यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘सिद्धार्थ’ व ‘मिलिंद’ची ग्रंथालये ग्रंथांनी समृद्ध केली. डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या संग्रहातील सुमारे ११०० दुर्मीळ ग्रंथ सुरुवातीच्या काळात मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ठेवले होते. हे ग्रंथ प्राध्यापक व विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध व्हावेत आणि त्यांचे योग्य संवर्धनही व्हावे यासाठी त्यांनी स्वत:च एक नियमावली तयार केली होती. ते ग्रंथ आजही मिलिंद महाविद्यालयाच्या ग्रंथालयात उपलब्ध आहेत.

बाबासाहेबांनी ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ ही शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेचे मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालय, तर औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालय सुरू केले. या माध्यमातून त्यांनी सर्वच जाती-धर्माच्या मुला-मुलींसाठी उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. समाजातील मुले शिकली. नोकरीलाही लागली; पण ती नंतर स्वतःच्याच कुटुंबात, ऐशोआरामात मग्न झाली. बाबासाहेबांना हे अपेक्षित नव्हते. ‘पदवी मिळविण्यासाठी तुम्ही पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करता; पण पदवी हेच ध्येय मानू नका. ज्ञानप्राप्ती हे ध्येय ठेवा. जीवनभर ज्ञानाची उपासना करा’, बाबासाहेबांचा असा आग्रह समाजातील नवतरुणांसाठी होता.

१९५२ साली सिद्धार्थ महाविद्यालयास आपला बहुमोल ग्रंथसंग्रह प्रदान करताना डॉ. बाबासाहेब अत्यंत भावविवश झाले होते. ‘समाजाने बहिष्कृत केलेल्या माझ्यासारख्याला या ग्रंथांनीच जवळ केले. मला आसरा दिला. त्यांच्या एवढा जगात मला दुसरा परमस्नेही कोणीच नाही. माझ्या जीवनातील स्नेही आज मी तुम्हाला देत आहे’, असे उद्गार बाबासाहेबांनी तेव्हा काढले. आपली ३५ हजारांहून अधिक असलेली ग्रंथसंपदा ठेवण्यासाठी त्यांनी मुंबईत एक स्वतंत्र बंगला ‘राजगृह’ बांधला होता.

डॉ. बाबासाहेबांची ग्रंथालयासंदर्भात नियमावलीवाचन कसे करावे, याविषयीदेखील बाबासाहेब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचे. २८ ऑक्टोबर रोजी बाबासाहेबांनी ग्रंथालयातील पुस्तकांचे वितरण आणि तेथे वाचण्यासाठी एक नियमावली तयार केली. ती आजही प्रत्येक ग्रंथालयांसाठी अनुकरणीय आहे. 'मार्क केलेले ‘नॉट फॉर इश्यू’ आणि सर्व ‘रेफरन्स बुक’ ही पुस्तके ग्रंथालयाबाहेर देऊ नयेत, प्राध्यापक आणि ज्या विद्यार्थ्यांनी १० रुपये देऊन ग्रंथालयात नोंद केली आहे, त्यांनाच पुस्तके वितरित करावीत, पुस्तके जमा करताना ग्रंथपालांनी त्या पुस्तकांचे बारकाईने निरीक्षण करावे. पुस्तकातील पाने फाडलेली असतील अथवा पानांवर अंडरलाइन केलेली असेल, तर अशी पुस्तके जमा करून न घेता संबंधितांकडून पुस्तकाची पूर्ण किंमत वसूल करावी, प्राध्यापकांना दोनपेक्षा जास्त पुस्तके देऊ नयेत, प्राध्यापकांनी चार दिवसांत नेलेली पुस्तके जमा करावीत, एखादे पुस्तक परत करण्यासाठी ग्रंथपालाने नोटीस काढल्यास ते पुस्तक दोन दिवसांत ग्रंथालयात जमा करावे. त्या अवधीत परत केले नाही, तर त्यास दरदिवशी आठ आणे दंड आकारावा, या व्यतिरिक्त विद्यार्थ्याला ग्रंथालयातच अभ्यास करायचा असेल, तर त्याच्याकडून महिन्याला दोन रुपये आगाऊ रक्कम आकारावी. बाबासाहेबांनी घालून दिलेली नियमावली किती दूरदृष्टीपणाची होती यावरून कळते.

समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र दिलाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय संघर्षातून शिक्षण घेतले. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जाेरावर ते जागतिक दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, बॅरिस्टर, पत्रकार, जलतज्ज्ञ, उत्कृष्ट संसदपटू, स्त्रियांचे कैवारी याशिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित- पददलितांचे उद्धारक, स्वतंत्र भारताचे पहिले ‘कायदा मंत्री’ आणि राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. अस्पृश्य केलेल्या समाजातून हा माणूस एवढा मोठा होतो? ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’, बाबासाहेबांनी असे या समाजव्यवस्थेला सडेतोड उत्तर दिले. आपल्या समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र दिला आणि समाजाने त्याचे पालनही केले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरAurangabadऔरंगाबादNagsen vanनागसेन वन